शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

शेतकºयांवर अस्मानी व सुलतानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:28 IST

‘जीवाची करायची असेल माती, त्यातनेच करावी शेती’, अशी अवस्था शेती व्यवसायाची झाली आहे. शेती व्यवसाय हा आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे.

ठळक मुद्दे शेतीव्यवसायच धोक्यात : एका मागून एक आंदोलनांची साखळी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ‘जीवाची करायची असेल माती, त्यातनेच करावी शेती’, अशी अवस्था शेती व्यवसायाची झाली आहे. शेती व्यवसाय हा आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. निसर्ग पिकू देत नाही आणि शासन पिकलेला विकू देत नाही. त्यामुळे शेतकरी आता अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांना तोंड देत नाईलाजाने शेती व्यवसाय करीत आहे. वणी परिसरात मागील दोन महिन्यापासून शासनाशी लढा देण्यासाठी कोठे ना कोठे असंघटीत आंदोलन करीत आहे.कृषी प्रधान म्हणून मिरविणाºया देशात शेती व्यवसाय नापसंतीला उतरला आहे. उत्तम नोकरी-मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असा व्यवसायाचा उलटा क्रम येण्याला कारणीभूत कोण, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकरी नको रे बाप्पा शेतीचा व्यवसाय म्हणून आपली शेती मक्त्याने देण्याच्या मानसीकतेत आले आहे, कधी अतिवृष्टीने तर कधी पावसाअभावीव शेतीवर दुष्काळाची वेळ येते, हे अस्मानी संकट शेतकºयांच्या पाचविलाच पुजलेले असते, तर एखादे वर्षी निसर्गाने साथ दिली, तर उत्पन्न वाढलेले दिसते पण शासनाकडून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. हे सुलतानी संकट शेतकºयांच्या मानगुटीवर असतेच. शेतकºयांच्या हतबलतेचा आधार घेऊन विरोधी पक्षाकडून शासनाच्या या सुलतानशाहीवर तोंडसुख घेण्याची संधी विरोधक सोडत नाही. मात्र हेच बोंबा मारणारे नेते शासनाच्या राजगादीवर स्वार झाले की शेतकºयांच्या यातना विसरून जातात, याचा अनुभव शेतकरी घेत आहे. विरोधात असताना कापसाला सात हजार रूपये व सोयाबीनला पाच हजार रूपये भाव मागणारे आता सत्तेवर असूनही भाव का देऊ शकत नाही, याचे उत्तर शेतकºयांनाही शोधता आले नाही. शेतीत काम करणारे मजुरही आता मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मानवनिर्मीत हे तिसरे संकट अलीकडे शेतकºयांना त्रासून सोडत आहे. त्यात वाघाची दहशत मजुरांना शेती कामाकडे वळू न देण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.जंगलातील रोही व रानडुकरांचे कळप शेतकºयांच्या उभ्या पिकांचा फडशा पाडत आहे. या जंगली प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा म्हणून अनेक गावातील शेतकºयांनी गावोगावी उपोषण सुरू केले होते. वनमंत्र्याने शेतकºयांना आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली. शेतकºयांना शेतीला कुंपन करण्यासाठी अनुदानावर मदत पुरविल्याशिवाय या संकटातून शेतकरी मुक्त होणार नाही. आता परतीच्या पावसाने कापूस पिकावर संकट आणले. कापसाची बोंडे सडून जमिनीवर सडा पडला. काही बोंडे झाडालाच काळी पडली. शिल्लक राहिलेल्या बोंडावर अळींनी एवढे आक्रमण केले आहे, की बोंडातून कापसाऐवजी गुलाबी अळ्या निघत आहे. या नुकसानीची पाहणी करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी म्हणून ब्राम्हणी व निळापूरचे शेतकरी गावातच उपोषणाला बसले आहे. त्यांच्याकडे शासनाचे अजूनही लक्ष गेले नाही.भाववाढीची मागणीशासन कर्मचाºयांचा महागाई भत्ता वर्षातून दोनवेळा वाढविले. खासदार-आमदार यांचे वेतन व भत्ते बिना आंदोलनाने झटक्यात वाढविते. तर मग शेतकºयांच्या शेतमालाचे हमी भाव मागणी असूनही का वाढविले जात नाही. हा शेतकºयांचा सवाल आहे. महागाईची झळ शेतकºयांना बसत नाही काय, याचे उत्तर शासनाने द्यावे म्हणजे झाले.