शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

शेतकºयांवर अस्मानी व सुलतानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:28 IST

‘जीवाची करायची असेल माती, त्यातनेच करावी शेती’, अशी अवस्था शेती व्यवसायाची झाली आहे. शेती व्यवसाय हा आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे.

ठळक मुद्दे शेतीव्यवसायच धोक्यात : एका मागून एक आंदोलनांची साखळी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ‘जीवाची करायची असेल माती, त्यातनेच करावी शेती’, अशी अवस्था शेती व्यवसायाची झाली आहे. शेती व्यवसाय हा आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. निसर्ग पिकू देत नाही आणि शासन पिकलेला विकू देत नाही. त्यामुळे शेतकरी आता अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांना तोंड देत नाईलाजाने शेती व्यवसाय करीत आहे. वणी परिसरात मागील दोन महिन्यापासून शासनाशी लढा देण्यासाठी कोठे ना कोठे असंघटीत आंदोलन करीत आहे.कृषी प्रधान म्हणून मिरविणाºया देशात शेती व्यवसाय नापसंतीला उतरला आहे. उत्तम नोकरी-मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असा व्यवसायाचा उलटा क्रम येण्याला कारणीभूत कोण, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकरी नको रे बाप्पा शेतीचा व्यवसाय म्हणून आपली शेती मक्त्याने देण्याच्या मानसीकतेत आले आहे, कधी अतिवृष्टीने तर कधी पावसाअभावीव शेतीवर दुष्काळाची वेळ येते, हे अस्मानी संकट शेतकºयांच्या पाचविलाच पुजलेले असते, तर एखादे वर्षी निसर्गाने साथ दिली, तर उत्पन्न वाढलेले दिसते पण शासनाकडून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. हे सुलतानी संकट शेतकºयांच्या मानगुटीवर असतेच. शेतकºयांच्या हतबलतेचा आधार घेऊन विरोधी पक्षाकडून शासनाच्या या सुलतानशाहीवर तोंडसुख घेण्याची संधी विरोधक सोडत नाही. मात्र हेच बोंबा मारणारे नेते शासनाच्या राजगादीवर स्वार झाले की शेतकºयांच्या यातना विसरून जातात, याचा अनुभव शेतकरी घेत आहे. विरोधात असताना कापसाला सात हजार रूपये व सोयाबीनला पाच हजार रूपये भाव मागणारे आता सत्तेवर असूनही भाव का देऊ शकत नाही, याचे उत्तर शेतकºयांनाही शोधता आले नाही. शेतीत काम करणारे मजुरही आता मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मानवनिर्मीत हे तिसरे संकट अलीकडे शेतकºयांना त्रासून सोडत आहे. त्यात वाघाची दहशत मजुरांना शेती कामाकडे वळू न देण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.जंगलातील रोही व रानडुकरांचे कळप शेतकºयांच्या उभ्या पिकांचा फडशा पाडत आहे. या जंगली प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा म्हणून अनेक गावातील शेतकºयांनी गावोगावी उपोषण सुरू केले होते. वनमंत्र्याने शेतकºयांना आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली. शेतकºयांना शेतीला कुंपन करण्यासाठी अनुदानावर मदत पुरविल्याशिवाय या संकटातून शेतकरी मुक्त होणार नाही. आता परतीच्या पावसाने कापूस पिकावर संकट आणले. कापसाची बोंडे सडून जमिनीवर सडा पडला. काही बोंडे झाडालाच काळी पडली. शिल्लक राहिलेल्या बोंडावर अळींनी एवढे आक्रमण केले आहे, की बोंडातून कापसाऐवजी गुलाबी अळ्या निघत आहे. या नुकसानीची पाहणी करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी म्हणून ब्राम्हणी व निळापूरचे शेतकरी गावातच उपोषणाला बसले आहे. त्यांच्याकडे शासनाचे अजूनही लक्ष गेले नाही.भाववाढीची मागणीशासन कर्मचाºयांचा महागाई भत्ता वर्षातून दोनवेळा वाढविले. खासदार-आमदार यांचे वेतन व भत्ते बिना आंदोलनाने झटक्यात वाढविते. तर मग शेतकºयांच्या शेतमालाचे हमी भाव मागणी असूनही का वाढविले जात नाही. हा शेतकºयांचा सवाल आहे. महागाईची झळ शेतकºयांना बसत नाही काय, याचे उत्तर शासनाने द्यावे म्हणजे झाले.