शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शेतकºयांवर अस्मानी व सुलतानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:28 IST

‘जीवाची करायची असेल माती, त्यातनेच करावी शेती’, अशी अवस्था शेती व्यवसायाची झाली आहे. शेती व्यवसाय हा आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे.

ठळक मुद्दे शेतीव्यवसायच धोक्यात : एका मागून एक आंदोलनांची साखळी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : ‘जीवाची करायची असेल माती, त्यातनेच करावी शेती’, अशी अवस्था शेती व्यवसायाची झाली आहे. शेती व्यवसाय हा आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. निसर्ग पिकू देत नाही आणि शासन पिकलेला विकू देत नाही. त्यामुळे शेतकरी आता अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांना तोंड देत नाईलाजाने शेती व्यवसाय करीत आहे. वणी परिसरात मागील दोन महिन्यापासून शासनाशी लढा देण्यासाठी कोठे ना कोठे असंघटीत आंदोलन करीत आहे.कृषी प्रधान म्हणून मिरविणाºया देशात शेती व्यवसाय नापसंतीला उतरला आहे. उत्तम नोकरी-मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असा व्यवसायाचा उलटा क्रम येण्याला कारणीभूत कोण, यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकरी नको रे बाप्पा शेतीचा व्यवसाय म्हणून आपली शेती मक्त्याने देण्याच्या मानसीकतेत आले आहे, कधी अतिवृष्टीने तर कधी पावसाअभावीव शेतीवर दुष्काळाची वेळ येते, हे अस्मानी संकट शेतकºयांच्या पाचविलाच पुजलेले असते, तर एखादे वर्षी निसर्गाने साथ दिली, तर उत्पन्न वाढलेले दिसते पण शासनाकडून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळत नाही. हे सुलतानी संकट शेतकºयांच्या मानगुटीवर असतेच. शेतकºयांच्या हतबलतेचा आधार घेऊन विरोधी पक्षाकडून शासनाच्या या सुलतानशाहीवर तोंडसुख घेण्याची संधी विरोधक सोडत नाही. मात्र हेच बोंबा मारणारे नेते शासनाच्या राजगादीवर स्वार झाले की शेतकºयांच्या यातना विसरून जातात, याचा अनुभव शेतकरी घेत आहे. विरोधात असताना कापसाला सात हजार रूपये व सोयाबीनला पाच हजार रूपये भाव मागणारे आता सत्तेवर असूनही भाव का देऊ शकत नाही, याचे उत्तर शेतकºयांनाही शोधता आले नाही. शेतीत काम करणारे मजुरही आता मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मानवनिर्मीत हे तिसरे संकट अलीकडे शेतकºयांना त्रासून सोडत आहे. त्यात वाघाची दहशत मजुरांना शेती कामाकडे वळू न देण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.जंगलातील रोही व रानडुकरांचे कळप शेतकºयांच्या उभ्या पिकांचा फडशा पाडत आहे. या जंगली प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा म्हणून अनेक गावातील शेतकºयांनी गावोगावी उपोषण सुरू केले होते. वनमंत्र्याने शेतकºयांना आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली. शेतकºयांना शेतीला कुंपन करण्यासाठी अनुदानावर मदत पुरविल्याशिवाय या संकटातून शेतकरी मुक्त होणार नाही. आता परतीच्या पावसाने कापूस पिकावर संकट आणले. कापसाची बोंडे सडून जमिनीवर सडा पडला. काही बोंडे झाडालाच काळी पडली. शिल्लक राहिलेल्या बोंडावर अळींनी एवढे आक्रमण केले आहे, की बोंडातून कापसाऐवजी गुलाबी अळ्या निघत आहे. या नुकसानीची पाहणी करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी म्हणून ब्राम्हणी व निळापूरचे शेतकरी गावातच उपोषणाला बसले आहे. त्यांच्याकडे शासनाचे अजूनही लक्ष गेले नाही.भाववाढीची मागणीशासन कर्मचाºयांचा महागाई भत्ता वर्षातून दोनवेळा वाढविले. खासदार-आमदार यांचे वेतन व भत्ते बिना आंदोलनाने झटक्यात वाढविते. तर मग शेतकºयांच्या शेतमालाचे हमी भाव मागणी असूनही का वाढविले जात नाही. हा शेतकºयांचा सवाल आहे. महागाईची झळ शेतकºयांना बसत नाही काय, याचे उत्तर शासनाने द्यावे म्हणजे झाले.