शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे कंपन्यांवरील दाखल गुन्ह्यांचा अहवाल मागितला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 15:42 IST

कित्येक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही. अशा कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले असून या दाखल गुन्ह्यांचा अहवाल गुणवत्ता नियंत्रण संचालकांनी (पुणे) मागितला आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना न जुमानणाऱ्या कंपन्या निशाण्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात हजारो हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली. परंतु कित्येक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही. अशा कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले असून या दाखल गुन्ह्यांचा अहवाल गुणवत्ता नियंत्रण संचालकांनी (पुणे) मागितला आहे.सोयाबीनच्या बियाणे कंपन्यांनी यावर्षी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. एक तर मुळात यावेळी बियाण्यांच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. शेतकऱ्यांकडून अवघ्या ४० रुपये किलोने सोयाबीन खरेदी केले गेले. परंतु हेच सोयाबीन बियाणे म्हणून विकताना कंपन्यांनी त्याचा दर ८० ते ९० रुपये प्रति किलो असा निश्चित केला. ठोक बियाणे वितरक व कंपन्यांच्या संगनमताने या वाढीव दराने एमआरपी नोंदविली गेली. एवढ्या महागीचे बियाणे घेऊनही ते उगवलेच नाही. तपासणीअंती या बियाण्यांची उगवण क्षमता अवघे २५ टक्के असल्याचे आढळून आले. नामांकित कंपन्यांचे महागडे बियाणे घेऊनही शेतकऱ्यांची फसवणूक झाली. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. कंपन्या मात्र पावसाने दगा दिल्याचे कारण पुढे करीत आहे.

परवाना निलंबन-रद्दचे आदेशबियाणे न उगवल्याच्या राज्यभरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. त्या पार्श्वभूमीवर आता बियाणे न उगवलेल्या कंपन्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदोष बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुनश्च बियाणे उपलब्ध करून देऊन कंपन्यांनी नुकसानभरपाई देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी तक्रार करूनही दखल न घेणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी कारवाईसोबतच परवाना निलंबन, रद्द करणे आदी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.कृषी आयुक्तालयातील संचालक (गुणवत्ता नियंत्रण) यांनी राज्यातील सर्व विभागीय कृषी सहसंचालकांना किती कंपन्यांविरुद्ध कुठे कुठे गुन्हे दाखल झाले, याचा अहवाल मागितला आहे. नांदेड, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये गुन्हे नोंदविले गेले आहे.यवतमाळात पोलीस संरक्षण मागितलेमहाबीजच्या बियाण्यांबाबतही काही ठिकाणी तक्रारी आहेत. त्यावर बियाणे तत्काळ बदलवून देण्याच्या सूचना महाबीजला करण्यात आल्या आहे. अन्य काही कंपन्यांची मात्र मुजोरी कायम आहे. मध्यप्रदेशातील एका कंपनीविरुद्ध सर्वाधिक तक्रारी आहेत. यवतमाळ जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांच्या प्रचंड तक्रारी आहेत. शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे यवतमाळातील प्रमुख वितरकांनी कृषी केंद्रांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

टॅग्स :agricultureशेती