शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

बियाणे कंपन्यांवरील दाखल गुन्ह्यांचा अहवाल मागितला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 15:42 IST

कित्येक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही. अशा कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले असून या दाखल गुन्ह्यांचा अहवाल गुणवत्ता नियंत्रण संचालकांनी (पुणे) मागितला आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना न जुमानणाऱ्या कंपन्या निशाण्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात हजारो हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली. परंतु कित्येक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही. अशा कंपन्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले असून या दाखल गुन्ह्यांचा अहवाल गुणवत्ता नियंत्रण संचालकांनी (पुणे) मागितला आहे.सोयाबीनच्या बियाणे कंपन्यांनी यावर्षी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. एक तर मुळात यावेळी बियाण्यांच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. शेतकऱ्यांकडून अवघ्या ४० रुपये किलोने सोयाबीन खरेदी केले गेले. परंतु हेच सोयाबीन बियाणे म्हणून विकताना कंपन्यांनी त्याचा दर ८० ते ९० रुपये प्रति किलो असा निश्चित केला. ठोक बियाणे वितरक व कंपन्यांच्या संगनमताने या वाढीव दराने एमआरपी नोंदविली गेली. एवढ्या महागीचे बियाणे घेऊनही ते उगवलेच नाही. तपासणीअंती या बियाण्यांची उगवण क्षमता अवघे २५ टक्के असल्याचे आढळून आले. नामांकित कंपन्यांचे महागडे बियाणे घेऊनही शेतकऱ्यांची फसवणूक झाली. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. कंपन्या मात्र पावसाने दगा दिल्याचे कारण पुढे करीत आहे.

परवाना निलंबन-रद्दचे आदेशबियाणे न उगवल्याच्या राज्यभरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. त्या पार्श्वभूमीवर आता बियाणे न उगवलेल्या कंपन्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदोष बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुनश्च बियाणे उपलब्ध करून देऊन कंपन्यांनी नुकसानभरपाई देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी तक्रार करूनही दखल न घेणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी कारवाईसोबतच परवाना निलंबन, रद्द करणे आदी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.कृषी आयुक्तालयातील संचालक (गुणवत्ता नियंत्रण) यांनी राज्यातील सर्व विभागीय कृषी सहसंचालकांना किती कंपन्यांविरुद्ध कुठे कुठे गुन्हे दाखल झाले, याचा अहवाल मागितला आहे. नांदेड, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये गुन्हे नोंदविले गेले आहे.यवतमाळात पोलीस संरक्षण मागितलेमहाबीजच्या बियाण्यांबाबतही काही ठिकाणी तक्रारी आहेत. त्यावर बियाणे तत्काळ बदलवून देण्याच्या सूचना महाबीजला करण्यात आल्या आहे. अन्य काही कंपन्यांची मात्र मुजोरी कायम आहे. मध्यप्रदेशातील एका कंपनीविरुद्ध सर्वाधिक तक्रारी आहेत. यवतमाळ जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांच्या प्रचंड तक्रारी आहेत. शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे यवतमाळातील प्रमुख वितरकांनी कृषी केंद्रांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

टॅग्स :agricultureशेती