शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

२७ लाख नागरिकांच्या दारावर ‘आशा’ देणार दस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्याच्या संपर्कात असलेल्या घनिष्ट व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाळीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर सर्वेक्षण : आरोग्य विभागाची सावधगिरी, घरोघरी जाऊन मिळविणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोव्हीड-१९ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील २७ लाख नागरिकांचे दररोज ‘डोअर टू डोअर’ सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारपासून या सर्व्हेक्षणाला गावपातळीेवर सुरूवात झाली आहे. कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहे.कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्याच्या संपर्कात असलेल्या घनिष्ट व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाळीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.छोट्या गावामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा यांच्या मदतीने हा सर्व्हे केला जात आहे. तर मोठ्या गावामध्ये आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका मदतीला आहे. हा सर्व्हे पूर्ण करताना सर्दी, खोकला आणि ताप याची स्वतंत्र कॅटेगरी करण्याचे आदेश आहेत. तर कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या व्यक्तीचा स्वतंत्र वर्ग तयार करण्यात आला. या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तत्काळ तालुक्याला ‘रेफर’ करण्याच्या सूचना आहेत.हे सर्व्हेक्षण पार पाडणाºया वक्तीची आरोग्य विभाग विशेष काळजी घेणार आहे. त्यांना मास्क, सॅनेटायझर पुरविले जाणार आहे. गोळा झालेली माहिती दररोज अपडेट करून ऑनलाईन पाठविण्याच्या सूचना आहे. यामुळे गावात कुठला नवीन रूग्ण आढळल्यास तत्काळ माहिती मिळणार आहे.मजुरांसाठी उघडले जाणार अन्नछत्रमजुरांच्या मदतीसाठी अन्नछत्र उघडले जाणार आहे. त्याकरिता कम्यनिटीबेस किचन गावपातळीवर उभारले जाणार आहे. स्लम भागातही याची अंमलबजावणी होणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहे. स्वयंसेवी संस्थांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. ज्या भागात ही मदत मिळणार नाही, अशा ठिकाणी कम्युनिटीबेस किचन उघडले जाणार आहे. एकाच ठिकाणी अशा व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील गर्दी रोखण्यासाठी एकाच वाहनातून सर्वत्र अन्न वितरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व स्वयंसेवकांना एकत्र बोलविण्यात आले आहे. यामुळे शहरातील वर्दळ कमी होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहे. समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची यासाठी चमू तयार करण्यात आली आहे. यासोबतच विविध स्वयंसेवी संघटनांना मदतीसाठी बोलविण्यात आले. त्यांचा पत्ता आणि विविध विषयाची माहिती नोंदविण्यात आली.‘त्या’ विद्यार्थ्यांना शिधापरजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सध्या यवतमाळबाहेर जाण्यास बंदी आहे. अशा विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्य घरपोच दिले जाणार आहे. त्याकरिता प्रशासनाकडे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपली नोंद करावी लागणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस