शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

२७ लाख नागरिकांच्या दारावर ‘आशा’ देणार दस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्याच्या संपर्कात असलेल्या घनिष्ट व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाळीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर सर्वेक्षण : आरोग्य विभागाची सावधगिरी, घरोघरी जाऊन मिळविणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोव्हीड-१९ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील २७ लाख नागरिकांचे दररोज ‘डोअर टू डोअर’ सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारपासून या सर्व्हेक्षणाला गावपातळीेवर सुरूवात झाली आहे. कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहे.कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्याच्या संपर्कात असलेल्या घनिष्ट व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाळीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाने सुरू केली आहे.छोट्या गावामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा यांच्या मदतीने हा सर्व्हे केला जात आहे. तर मोठ्या गावामध्ये आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका मदतीला आहे. हा सर्व्हे पूर्ण करताना सर्दी, खोकला आणि ताप याची स्वतंत्र कॅटेगरी करण्याचे आदेश आहेत. तर कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या व्यक्तीचा स्वतंत्र वर्ग तयार करण्यात आला. या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तत्काळ तालुक्याला ‘रेफर’ करण्याच्या सूचना आहेत.हे सर्व्हेक्षण पार पाडणाºया वक्तीची आरोग्य विभाग विशेष काळजी घेणार आहे. त्यांना मास्क, सॅनेटायझर पुरविले जाणार आहे. गोळा झालेली माहिती दररोज अपडेट करून ऑनलाईन पाठविण्याच्या सूचना आहे. यामुळे गावात कुठला नवीन रूग्ण आढळल्यास तत्काळ माहिती मिळणार आहे.मजुरांसाठी उघडले जाणार अन्नछत्रमजुरांच्या मदतीसाठी अन्नछत्र उघडले जाणार आहे. त्याकरिता कम्यनिटीबेस किचन गावपातळीवर उभारले जाणार आहे. स्लम भागातही याची अंमलबजावणी होणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहे. स्वयंसेवी संस्थांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. ज्या भागात ही मदत मिळणार नाही, अशा ठिकाणी कम्युनिटीबेस किचन उघडले जाणार आहे. एकाच ठिकाणी अशा व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील गर्दी रोखण्यासाठी एकाच वाहनातून सर्वत्र अन्न वितरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व स्वयंसेवकांना एकत्र बोलविण्यात आले आहे. यामुळे शहरातील वर्दळ कमी होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहे. समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची यासाठी चमू तयार करण्यात आली आहे. यासोबतच विविध स्वयंसेवी संघटनांना मदतीसाठी बोलविण्यात आले. त्यांचा पत्ता आणि विविध विषयाची माहिती नोंदविण्यात आली.‘त्या’ विद्यार्थ्यांना शिधापरजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सध्या यवतमाळबाहेर जाण्यास बंदी आहे. अशा विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्य घरपोच दिले जाणार आहे. त्याकरिता प्रशासनाकडे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आपली नोंद करावी लागणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस