शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

विदर्भात होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 15:49 IST

पावसाअभावी मराठवाड्यासोबतच विदर्भाची स्थिती गंभीर झाली आहे. खरिपातील पिके संकटात सापडली आहे. यामुळे विदर्भात आता कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे.

ठळक मुद्देनागपूरवरून डाफलर रडार सुटणार४०० किलोमीटर अंतरापर्यंत कार्यक्षेत्र निर्धारित

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाअभावी मराठवाड्यासोबतच विदर्भाची स्थिती गंभीर झाली आहे. खरिपातील पिके संकटात सापडली आहे. यामुळे विदर्भात आता कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. त्याकरिता नागपूर विमानतळावरून डाफलर रडार सोडण्याची तयारी सुरू झाली आहे. या रडारवरून ४०० किलोमीटर कार्यक्षेत्रात अचूक मारा करून कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे.गेल्यावर्षीपासून मराठवाडा आणि विदर्भात पावसाची स्थिती चिंताजनक आहे. यंदा तर पावसाने दडी मारल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील दुष्काळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ११ इंचापर्यंत खाली मुरला आहे. यानंतरही जलप्रकल्प तळाला गेले आहे. विदर्भाकडेही मान्सूनने पाठ फिरविली आहे. परिणामी पेरण्या खोळंबल्या. जलाशयातील पाणी पातळीही खाली गेली आहे. विदर्भात कुठेच मान्सूनचा जोर नाही. मान्सून सक्रिय नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची कबुली हवामन विभागाच्या संचालकांनी दिली आहे.पावसाने दडी मारल्याने विदर्भात पिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे आता अखेरचा पर्याय म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अथवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी दिली. त्या दृष्टीने कृत्रिम पावसासाठी डाफलर रडार नागपूर विमानतळावर सज्ज ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून ४०० किलोमीटर परिघात पाण्याच्या उपलब्धतेचा ढग दिसताच कॅल्शीयम क्लोराईडची फवारणी करून पाऊस पाडला जाणार आहे. यामुळे विदर्भातील दुष्काळी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात मदत होणार आहे. पिकांनाही त्याचा लाभ कृषी क्षेत्रालाही मोठा आधार मिळणार आहे. दरम्यान, पावसाअभावी पेरणी न झालेल्या क्षेत्रात कृत्रिम पाऊस बरसल्यानंतर अथवा दुबार पेरणी करावयाची असल्यास तूर किंवा मका या पिकांचीच लागवड करावी लागणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने या दोन्ही बियाण्यांची मागणी नोंदविली आहे.नागपूर, सोलापूर आणि औरंगाबादकृत्रिम पावसासाठी नागपूर, सोलापूर आणि औरंगाबाद या तीन केंद्रांवर डाफलर रडार सज्ज ठेवण्यात आले आहे. तेथून पाऊस नसणाऱ्या भागात पाऊस पाडता येणार आहे. तत्पूर्वी आयएमडीच्या अधिकाऱ्यांशी कृषीमंत्र्यांनी चर्चा केली आहे.विदर्भात मान्सून सक्रिय नाही. तूर्तास पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही. अशा स्थितीत कुठल्या भागात कृत्रिम पाऊस पाडायचा, याबाबतचा निर्णय शासनाचा असेल. शासनाच्या सूचनेनुसार कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल.- ए.के.श्रीवास्तवसंचालक, हवामान विभाग प्रमुख, पुणे

टॅग्स :Rainपाऊस