शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आर्णी, घाटंजी, दारव्हात कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:18 IST

आर्णी, घाटंजी, दारव्हात पावसाचा कहर असून मागील १२ तासात तब्बल ४० मि.मी. इतका पाऊस नोंदविला आहे. दारव्हा शहरात बसस्थानकासह संपूर्ण परिसरच पुराच्या पाण्याने व्यापला. येथील वाहतूक बंद होती.

ठळक मुद्देमूसळधार पाऊस : १२ तासात ३५ मि.मी.च्या सरासरीने कोसळला, वस्त्यांमध्ये शिरले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आर्णी, घाटंजी, दारव्हात पावसाचा कहर असून मागील १२ तासात तब्बल ४० मि.मी. इतका पाऊस नोंदविला आहे. दारव्हा शहरात बसस्थानकासह संपूर्ण परिसरच पुराच्या पाण्याने व्यापला. येथील वाहतूक बंद होती. अशीच स्थिती आर्णी, घाटंजी व नेर या शहरासह ग्रामीण भागातही अनुभवास मिळाली.दारव्हा शहरात लेंडी नाल्याला पूर आल्याने समस्या निर्माण झाली. या पुराचे पाणी थेट शहरात घुसून येथील मुख्य गोळीबार चौक, आर्णी रोड, बसस्थानक चौक आणि कारंजा मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले, रेल्वे स्टेशन परिसरात पाणी साचले. स्वामी समर्थनगरमधील नाल्याचे पाणी परिसरात शिरल्याने बिकट स्थिती निर्माण झाली. दारव्हा तालुक्यातील तेलगव्हाणचा पाझर तलाव फुटला. चोर(खोपडी), खोपडी आणि जांभोरा येथील तलाव कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती आहे. तोरनाळा येथील चार माती बंधारे वाहून गेले. अडाण नदीला प्रचंड पूर असून दारव्हा-कारंजा मार्गावरील बोदेगाव येथील पुलावरून तब्बल सात फूट पाणी होते. त्यामुळे तेथील वाहतूक पूर्णत: बंद होती. तालुक्यातील सर्वच नदीनाल्यांना एकाचवेळी पूर आल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. रामगाव व निळोणा या दोन गावातील आठ जनावरे पुरात वाहून गेली. बोथ येथील शेतजमीन पूर्णत: पाण्याखाली आली आहे. नुकसानीचा अंदाज पावसामुळे बांधणे यंत्रणेलाही शक्य होत नाही.आर्णी तालुक्यात पावसामुळे ग्रामीण भाग पाण्याखाली आला आहे. शहरातील उत्तम टॉकीज परिसरात पाणी साचले आहे. व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. कृषी केंद्रांच्या गोडाऊनमधील रासायनिक खते या पाण्यात विरघळले आहे. रस्त्यांमध्ये पाणी साचल्याने तारांबळ उडत आहे. आर्णीतील बाजारपेठेत तळघरांमध्ये असलेल्या सर्व व्यापारी संकुलात पाणी साचल्याने लाखो रुपयांचा माल पाण्यात भिजला. नागपूर-तुळजापूर मार्गावरील पुलांवरून पाणी असल्याने वाहतूक बंद होती. पावसाचा जोर पाहता अनेक शाळांना सुटी देण्यात आली. पैनगंगा, अडाण या नद्यांना पूर असल्याने राणीधानोरा, साकूर, कवठाबाजार, मुकिंदपूर या भागात शेतीचे मोठे नुकसान झाले. प्रशासनानेही आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत पोहोचविण्यासाठी सतर्कतेचा इशारा देत पथक तैनात केले. तहसीलदार, ठाणेदार, नगरपरिषद मुख्याधिकारी पूरपरिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.नेर तालुक्यात पुरामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. पहिल्यांदाच येथील नद्यांना पूर आला असून मिलमिली नदी दुथडी भरून वाहात आहे. तालुक्यातील काही सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.घाटंजी तालुक्यात संततधार पावसामुळे घाटंजी-आर्णी मार्ग व किन्ही रस्ता पूर्णत: बंद होता. चिंचोली येथील पुलावरून अडाण नदीचे पाणी वाहात होते. कुऱ्हाड, डांगरगाव येथेही अडाण नदी पुलावरून वाहात असल्याने ताडसावळी, सायफळ या गावातील शेतशिवारात पुराचे पाणी घुसले. संध्याकाळपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र पावसाचा जोर कायम असल्याने येथील यंत्रणा सतर्क असल्याचे तहसीलदार जी.के. हामंद यांनी सांगितले. सरासरी ३५ मि.मी. इतका पाऊस कोसळल्याने सर्वच जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पाण्याने पिकांना संजीवनी मिळाल्याचे समाधानही आहे.

टॅग्स :Rainपाऊस