शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

आर्णी हे शांतताप्रिय लोकांचे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST

आमदार ख्वाजा बेग यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. आर्णी शहराची परंपरा शांतताप्रिय आहे. आर्णीत राहणारे लोक चांगले असून त्यांचा चांगुलपणा वेळोवेळी सिद्धही झाला आहे, असे मत आमदार ख्वाजा बेग यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनुरुल हसन : शांतता समितीची बैठक, नागरिकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येथील व्यापारपेठ पाहिल्यानंतर खात्री पटते की आर्णी हे शांतताप्रिय लोकांचे शहर आहे. येथे सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने राहतात, असे गौरवोद्गार अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी काढले.सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. यावेळी हसन अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करीत होते. यावेळी आमदार ख्वाजा बेग यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. आर्णी शहराची परंपरा शांतताप्रिय आहे. आर्णीत राहणारे लोक चांगले असून त्यांचा चांगुलपणा वेळोवेळी सिद्धही झाला आहे, असे मत आमदार ख्वाजा बेग यांनी व्यक्त केले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी उदयसिंह चंदेल, आर्णी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे विलास राऊत, प्रहारचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे राजाभाऊ पद्मावार, प्रा. विनित माहूरे यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर प्रेस क्लबचे अध्यक्ष नौशाद अली, पत्रकार संघाचे अध्यक्ष मन्नान बेग, ठाणेदार यशवंत बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तर शांततेसाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थित सर्वच नागरिकांनी दिले.बैठकीला गणेश मंडळाचे अध्यक्ष, पोलीस पाटील, पत्रकार, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, तथा विविध क्षेत्रातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजू बुटले यांनी तर आभार पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र तिडके यांनी मानले.

टॅग्स :Policeपोलिस