शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

६० वन कर्मचाऱ्यांची फौज वाघांच्या मागावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:51 IST

१५ शेतकरी-शेतमजूर-गुराख्यांची शिकार करणाºया वाघाच्या शोधार्थ वन खात्याच्या ६० अधिकारी-कर्मचाºयांची फौज पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाºया जंगलात तैनात करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘एसटीपीएफ’ला पाचारण : मादी-पिलांना एकाच वेळी पकडण्याचा पहिलाच प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : १५ शेतकरी-शेतमजूर-गुराख्यांची शिकार करणाऱ्या वाघाच्या शोधार्थ वन खात्याच्या ६० अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाºया जंगलात तैनात करण्यात आली आहे. या मोहिमेत वाघाला घेरण्यासाठी चार हत्ती दाखल होण्याची वन खात्याला प्रतीक्षा आहे.पांढरकवडा वन विभागांतर्गत आतापर्यंत वाघाने १५ जणांची शिकार केली. बुधवारी हा १५ वा बळी घेतला. या शिकारीमुळे एकीकडे गावकऱ्यांमधून वाघाला पकडण्याची मागणी होत असताना वाघाकडून एका पाठोपाठ शिकारीही केल्या जात आहे. बुधवारच्या घटनेनंतर वाघ शोध मोहिमेला प्रचंड वेग आला आहे. पुसद, यवतमाळ येथील वाहने तसेच ६० पेक्षा अधिक वन अधिकारी-कर्मचाºयांची नियुक्ती वाघाच्या शोधार्थ करण्यात आली आहे. पेंच-नवेगावबांध व नागझिरा अभयारण्यातील स्पेशल टायगर्स प्रोटेक्शन फोर्सच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. एकाच वेळी मादी आणि तिच्या पिलांना पकडण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जाते.वाघाच्या या वाढत्या हैदोसाच्या पार्श्वभूमीवर वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच सर्व संबंधितांची बैठक बोलविली होती. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक, वन विकास महामंडळाचे उच्च पदस्थ अधिकारी, पांढरकवडाच्या उपवनसंरक्षक, राळेगावचे उपविभागीय महसूल अधिकारी आदी मंडळी या बैठकीला उपस्थित होती. त्यात आयएफएस के.अभर्णा यांनी वाघाला पकडण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या आहेत व त्याकरिता काय-काय व्यवस्था लागणार आहे, याचे प्रेझेन्टेशन या बैठकीत सादर केले. त्यात त्यांनी वाघाला घेरता यावे म्हणून चार हत्तींची मागणी नोंदविली. कारण ज्या भागात वाघ शिकारी करतो आहे ते ९५ टक्के क्षेत्र वन विकास महामंडळाचे आहेत. त्यातील काही भाग अतिशय दुर्गम असल्याने तेथे वाहन जाणे शक्य नाही. अशा वेळी हत्तीची मदत घेऊन वाघाला बेशुद्ध करता येऊ शकते. मात्र वन विकास महामंडळाकडून वाघ पकडण्याबाबत तेवढे ताकदीचे प्रयत्न होताना दिसत नाही.या वाघाला पकडण्यासाठी नागपूरच्या वन मुख्यालयातून वेगाने सूत्रे न हलविली गेल्यास वाघाकडून आणखी काहींची शिकार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाघ पकडण्यासंबंधी मार्गदर्शक तत्वे आधीच जारी करण्यात आली आहे. त्या तत्वानुसारच मोहीम राबवावी लागते. वाघ पकडण्यासंबंधी पांढरकवडाच्या उपवनसंरक्षक के.अभर्णा यांनी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची बैठक घेऊन मोहिमेसंबंधी आवश्यक सूचना दिल्या असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.वाघाच्या बेशुद्धीचे तीन प्रयत्न फसलेयापूर्वी या वाघाला पकडण्यासाठी बेशुद्ध करण्याचे दोन ते तीन प्रयत्न झाले. तेव्हापासून सदर वाघीण मनुष्य दिसला की, चवताळून त्याच्यावर थेट झडप घालते. त्यामुळे एक्सपर्ट वन कर्मचारीही पुरेशा तयारी अभावी त्या वाघासमोर सहजासहजी व एकटे-दुकटे जाणे टाळत आहेत. वाघिणीचे तीनही पिले मोठे झाल्याने कदाचित तेसुद्धा शिकार करीत असावे, अशी शंका वन खात्याला आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणामुळे वाघाला जीवानिशी ठार मारता येत नाही. त्यामुळे त्याचा शोध घेणे, त्याला बेशुद्ध करणे व पकडून व्याघ्र प्रकल्पात नेऊन सोडण्याचे आव्हान पांढरकवडा वन विभागापुढे आहे.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग