शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कधी तपासले का? पित असलेले बाटलीबंद पाणी खरंच शुद्ध आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 19:06 IST

पाण्याच्या शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष नको : बाजारात विविध कंपन्यांच्या बॉटल

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी शहराला नगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. तेच पाणी आपण घरात पिण्यासाठी साठवून ठेवतो. घराबाहेर पडल्यानंतर आपण बंद बाटलीतील पाणी पिण्यासाठी वापरतो. सर्रास बाटली घेऊन थेट पाणी पितो, परंतु ते पाणी शुध्द आहे का? याचा साधा विचारही आपल्या डोक्यात येत नाही. पावसाळ्यात पाण्याच्या शुद्धतेची काळजी घेतली, तर आजारांना पळवून लावू शकतो.

राज्यात बोटावर मोजता येतील इतक्या पाण्याच्या कंपन्या मिनरल वॉटर पुरवतात. परंतु, परवाना नसणारे अनेकजण सर्रास बाटलीबंद पाणी विकतात. त्यामुळे गंभीर आजारांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण पितो ते पाणी खरचं शुद्ध आहे का, याचा विचार करूनच पाणी पिल्यास संकट टाळता येऊ शकते. प्रवास असो की, कोणताही कार्यक्रम बॉटल बंद पाणी घेणे ही काळाची गरज झाली आहे. 

यामुळे बाजारात विविध कंपन्यांचे पाणी आले आहे. पण, नोंदणीकृत नसलेल्या कंपन्याही पाणी विकत आहेत. काहीवेळा पाणी घेताना फसवणूक होऊ शकते. पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या नावावर फसवूणक होते. जुन्या बाटलीत साधे पाणी भरून विकले जाते. मग, पाणी शुद्ध आहे, हे कसे ओळखावे. जेव्हा तुम्ही पाण्याची बॉटल घेता, तेव्हा आयएसआय मार्कवर एक कोड असतो. (आयएस- १४५४३) हा कोड पाहिल्यावर बॉटल असली की नकली हे स्पष्ट होते.

असे ओळखावे पिण्यासाठी योग्य पाणीगुगल प्ले स्टोरवरून (बीआयएस केअर) अॅप डाऊनलोड करून घ्या. त्यानंतर त्या बॉटलवरील कोडसंदर्भात सर्व माहिती मिळेल, तसेच हे पॅक कुठे झाले. त्याची माहिती मिळेल. अॅपमध्ये आयएसआय लिहिलेले असणार आहे. त्यावर व्हेरिफाय लायसन्स डिटेल या ऑप्शनवर क्लिक करा. त्यावेळी दहा आकडी कोड मागितला जाईल. हा कोड बॉटलवर पॅकेजिंगवरून कॉपी करून टाकावा. कोड पाणी बॉटल पॅकेजिंगवर आयएसआय मार्कच्या खाली असतो. १० अंक असणारा कोड टाकल्यावर गो ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर सर्वच माहिती येईल, म्हणजेच हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही?, पाण्यात मिनरल्स आहेत की नाही ? यामुळे पाण्यापासून होणाऱ्या अनेक गंभीर आजारांपासून सुटका मिळू शकते. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ