शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

कृउबासमध्ये ‘बॅक डोअर’ एन्ट्रीला चाप

By admin | Updated: September 21, 2015 02:14 IST

मुदत संपून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणुका घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाचा आदेश : निवडणुकीचा मार्ग मोकळा लोकमत विशेषयवतमाळ : मुदत संपून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणुका घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. जिल्ह्यात सात बाजार समित्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासक मंडळ नेमून सहकारात ‘बॅक डोअर एन्ट्री’ घेण्याच्या भाजपा-सेनेच्या प्रयत्नांना यामुळे चाप बसला आहे. जिल्ह्यातील यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, नेर, दारव्हा, वणी, बोरीअरब येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत केव्हाच संपली आहे. त्यानंतर संचालक मंडळाने न्यायालयातून मिळविलेला मुदतवाढीचा कालावधीही संपला आहे. मात्र त्यानंतरही येथे पुन्हा प्रशासक मंडळ बसविण्याच्या हालचाली सुरू आहे. यवतमाळमध्ये संचालक मंडळाचा कार्यकाळ ७ जुलै २०१३ मध्येच पूर्ण झाला होता. त्यानंतर संचालकांनी न्यायालयात धाव घेत प्रशासक नेमण्याच्या प्रक्रियेवर स्थगनादेश मिळवित एप्रिल २०१४ पर्यंत ताबा कायम ठेवला. त्यानंतर सहकार विभागाकडून येथे प्रशासक नेमण्यात आले आहे. त्यांनासुद्धा सव्वावर्ष झाले आहे. आता येथे प्रशासकीय मंडळ नियुक्तीच्या हालचाली सुरू आहे. या प्रशासकीय मंडळामध्ये स्थानिक आमदारांच्या सोईने सदस्यांची नावे सूचविली जात आहे. त्यांंनाच मंडळात संधी मिळणार आहे. थेट निवडणूक टाळून संचालक मंडळ बसविण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. असेच प्रयत्न इतरही मुदत संपलेल्या बाजार समितीत करण्यात येत आहे. यासाठी सहकार विभागाने २३ जुलै रोजी स्वतंत्र आदेश काढून प्रशासकीय मंडळ निवडण्याचे निर्देश दिले आहे. राज्य शासनाच्या या आदेशाविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. खंडपीठाचे न्यायमूर्ती ए.बी.चौधरी व न्यायमूर्ती इंदिरा जैन यांनी शासनाचा आदेशच रद्दबातल ठरविला आहे. दुष्काळी परिस्थितीने राज्यातील बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक घेता येणार नाही, अशी सबब पुढे करून सहा महिने निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याच आधारावर सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने २३ जुलै २०१५ चा आदेश काढला आहे. या आदेशा विरोधात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा बाजार समितीची निवडणूक घेण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने शासनाचा आदेश रद्दबातल ठरविल्यामुळे आता मुदत संपलेल्या बाजार समितीची निवडणूक घ्यावी लागणार आहे. या निर्णयाने यवतमाळ जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बॅक डोअर एन्ट्रीचे अनेकांचे मनसुबे उधळले जाणार आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)