शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

कृउबासमध्ये ‘बॅक डोअर’ एन्ट्रीला चाप

By admin | Updated: September 21, 2015 02:14 IST

मुदत संपून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणुका घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाचा आदेश : निवडणुकीचा मार्ग मोकळा लोकमत विशेषयवतमाळ : मुदत संपून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणुका घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. जिल्ह्यात सात बाजार समित्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासक मंडळ नेमून सहकारात ‘बॅक डोअर एन्ट्री’ घेण्याच्या भाजपा-सेनेच्या प्रयत्नांना यामुळे चाप बसला आहे. जिल्ह्यातील यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, नेर, दारव्हा, वणी, बोरीअरब येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत केव्हाच संपली आहे. त्यानंतर संचालक मंडळाने न्यायालयातून मिळविलेला मुदतवाढीचा कालावधीही संपला आहे. मात्र त्यानंतरही येथे पुन्हा प्रशासक मंडळ बसविण्याच्या हालचाली सुरू आहे. यवतमाळमध्ये संचालक मंडळाचा कार्यकाळ ७ जुलै २०१३ मध्येच पूर्ण झाला होता. त्यानंतर संचालकांनी न्यायालयात धाव घेत प्रशासक नेमण्याच्या प्रक्रियेवर स्थगनादेश मिळवित एप्रिल २०१४ पर्यंत ताबा कायम ठेवला. त्यानंतर सहकार विभागाकडून येथे प्रशासक नेमण्यात आले आहे. त्यांनासुद्धा सव्वावर्ष झाले आहे. आता येथे प्रशासकीय मंडळ नियुक्तीच्या हालचाली सुरू आहे. या प्रशासकीय मंडळामध्ये स्थानिक आमदारांच्या सोईने सदस्यांची नावे सूचविली जात आहे. त्यांंनाच मंडळात संधी मिळणार आहे. थेट निवडणूक टाळून संचालक मंडळ बसविण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. असेच प्रयत्न इतरही मुदत संपलेल्या बाजार समितीत करण्यात येत आहे. यासाठी सहकार विभागाने २३ जुलै रोजी स्वतंत्र आदेश काढून प्रशासकीय मंडळ निवडण्याचे निर्देश दिले आहे. राज्य शासनाच्या या आदेशाविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. खंडपीठाचे न्यायमूर्ती ए.बी.चौधरी व न्यायमूर्ती इंदिरा जैन यांनी शासनाचा आदेशच रद्दबातल ठरविला आहे. दुष्काळी परिस्थितीने राज्यातील बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक घेता येणार नाही, अशी सबब पुढे करून सहा महिने निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याच आधारावर सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने २३ जुलै २०१५ चा आदेश काढला आहे. या आदेशा विरोधात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा बाजार समितीची निवडणूक घेण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने शासनाचा आदेश रद्दबातल ठरविल्यामुळे आता मुदत संपलेल्या बाजार समितीची निवडणूक घ्यावी लागणार आहे. या निर्णयाने यवतमाळ जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बॅक डोअर एन्ट्रीचे अनेकांचे मनसुबे उधळले जाणार आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)