शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

कृउबासमध्ये ‘बॅक डोअर’ एन्ट्रीला चाप

By admin | Updated: September 21, 2015 02:14 IST

मुदत संपून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणुका घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

न्यायालयाचा आदेश : निवडणुकीचा मार्ग मोकळा लोकमत विशेषयवतमाळ : मुदत संपून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणुका घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. जिल्ह्यात सात बाजार समित्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासक मंडळ नेमून सहकारात ‘बॅक डोअर एन्ट्री’ घेण्याच्या भाजपा-सेनेच्या प्रयत्नांना यामुळे चाप बसला आहे. जिल्ह्यातील यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, नेर, दारव्हा, वणी, बोरीअरब येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत केव्हाच संपली आहे. त्यानंतर संचालक मंडळाने न्यायालयातून मिळविलेला मुदतवाढीचा कालावधीही संपला आहे. मात्र त्यानंतरही येथे पुन्हा प्रशासक मंडळ बसविण्याच्या हालचाली सुरू आहे. यवतमाळमध्ये संचालक मंडळाचा कार्यकाळ ७ जुलै २०१३ मध्येच पूर्ण झाला होता. त्यानंतर संचालकांनी न्यायालयात धाव घेत प्रशासक नेमण्याच्या प्रक्रियेवर स्थगनादेश मिळवित एप्रिल २०१४ पर्यंत ताबा कायम ठेवला. त्यानंतर सहकार विभागाकडून येथे प्रशासक नेमण्यात आले आहे. त्यांनासुद्धा सव्वावर्ष झाले आहे. आता येथे प्रशासकीय मंडळ नियुक्तीच्या हालचाली सुरू आहे. या प्रशासकीय मंडळामध्ये स्थानिक आमदारांच्या सोईने सदस्यांची नावे सूचविली जात आहे. त्यांंनाच मंडळात संधी मिळणार आहे. थेट निवडणूक टाळून संचालक मंडळ बसविण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. असेच प्रयत्न इतरही मुदत संपलेल्या बाजार समितीत करण्यात येत आहे. यासाठी सहकार विभागाने २३ जुलै रोजी स्वतंत्र आदेश काढून प्रशासकीय मंडळ निवडण्याचे निर्देश दिले आहे. राज्य शासनाच्या या आदेशाविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. खंडपीठाचे न्यायमूर्ती ए.बी.चौधरी व न्यायमूर्ती इंदिरा जैन यांनी शासनाचा आदेशच रद्दबातल ठरविला आहे. दुष्काळी परिस्थितीने राज्यातील बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक घेता येणार नाही, अशी सबब पुढे करून सहा महिने निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याच आधारावर सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने २३ जुलै २०१५ चा आदेश काढला आहे. या आदेशा विरोधात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा बाजार समितीची निवडणूक घेण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने शासनाचा आदेश रद्दबातल ठरविल्यामुळे आता मुदत संपलेल्या बाजार समितीची निवडणूक घ्यावी लागणार आहे. या निर्णयाने यवतमाळ जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे बॅक डोअर एन्ट्रीचे अनेकांचे मनसुबे उधळले जाणार आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)