शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

एसटी अधिकाऱ्यांच्या मनमानीला बसला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

बसस्थानकावरून नेमक्या बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. सर्वच आगाराची ही परिस्थिती आहे. तरीही कर्मचाऱ्यांची गर्दी वाढविण्याचा प्रकार स्थानिक अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. काही वेळातर संचारबंदी काळात अर्थात पहाटे ६.३० वाजता कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली होती. अलीकडे हजेरी देण्यासाठी कर्मचाऱ्यांना बोलाविले जात आहे. हा सर्व प्रकार लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम तोडणारा आहे.

ठळक मुद्देकामांचे नियोजन करा : गरज असेल तरच कर्मचाऱ्यांना बोलवा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू केली आहे. तथापि कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक प्रवासाकरिता धजावत नाही. अनेक बसफेऱ्या नेमके प्रवासी घेऊन मार्गावर धावत आहे. तरीही महामंडळाच्या स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. ड्यूटीवर बोलाविणे, ताटकळत ठेवणे आदी प्रकार घडत आहे. याला महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी चाप लावला आहे. कामांचे नियोजन करा, गरज असेल तरच कर्मचाऱ्यांना बोलवा अशा कडक सूचना त्यांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.बसस्थानकावरून नेमक्या बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. सर्वच आगाराची ही परिस्थिती आहे. तरीही कर्मचाऱ्यांची गर्दी वाढविण्याचा प्रकार स्थानिक अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. काही वेळातर संचारबंदी काळात अर्थात पहाटे ६.३० वाजता कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली होती. अलीकडे हजेरी देण्यासाठी कर्मचाऱ्यांना बोलाविले जात आहे. हा सर्व प्रकार लॉकडाऊन आणि संचारबंदीचे नियम तोडणारा आहे. प्रामुख्याने चालक आणि वाहकांना या प्रकारात मानसिक त्रास सहन करावा लागतो. कामगिरी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागते. ‘लॉकडाऊनमुळे जिल्ह्यांतर्गत मार्गावरील वाहतूक सुरू आहे तरीही सर्व चालक-वाहकांची कामगिरी लावली जाते. त्यांना हजर राहण्यास सांगितले जाते. प्रत्यक्षात लावण्यात आलेल्या कामगिरीपैकी सर्व कामगिरी चालविली जात नाही. या सर्व बाबी ‘लोकमत’ने पुढे आणल्या होत्या.दुसºया दिवशी करावयाच्या वाहतुकीचे पूर्वनियोजन करून त्याप्रमाणे आवश्यक त्या प्रमाणातच चालक-वाहकांची कामगिरी लावा’, अशा शब्दात महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रक आणि सर्व संबंधितांना बजावले आहे.रोजंदारी कामगारांना कामगिरी द्यामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नव्यानेच रुजू झालेल्या कामगारांना आठवड्यातून किमान एक कामगिरी द्या, त्या पद्धतीने नियोजन करा, असे बजावले आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ‘वाहकाकडे वाहतूक नियंत्रणाचे काम’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखलही वाहतूक महाव्यवस्थापकांनी घेतली आहे. वाहकांवर वाहतूक नियंत्रकाची जबाबदारी सोपवू नका, अशी सूचना करण्यात आली. तरीही यवतमाळ विभागात मनमानी सुरू आहे. ११ जून रोजी महाव्यवस्थापकांनी या सर्व सूचना परिपत्रकातून दिल्यानंतरही १२ जून रोजी काही ठिकाणी वाहतुकीचे नियंत्रण वाहकच करत होते.

टॅग्स :state transportएसटी