शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

बेंबळाच्या पाण्यासाठी एप्रिलचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:17 IST

आॅक्टोबर २०१९ पर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे नियोजन होते. मात्र, यावर्षीची भीषण पाणीटंचाई बघता येत्या मार्च-एप्रिलपर्यंतच पाणी आणण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देजीवन प्राधिकरणाची माहिती : पालकमंत्र्यांचा पाठपुरावा, युद्धपातळीवर काम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आॅक्टोबर २०१९ पर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे नियोजन होते. मात्र, यावर्षीची भीषण पाणीटंचाई बघता येत्या मार्च-एप्रिलपर्यंतच पाणी आणण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले.यावर्षी जिल्ह्यात अपुरा पाऊस झाला. त्यामुळे शहरातील पाणीटंचाई निवारणार्थ अमृत योजनेतून बेंबळा प्रकल्पातील पाणी आणण्याचे काम सुरू आहे. संबंधित कंपनीकडून पाईपचा पुरवठा नियमित होण्यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने पाईपलाईनचा पुरवठा नियमित करण्यासाठी विशेष तरतूद मंजूर केली. ३०२ कोटी रूपये खर्चाची अमृत योजना ३० महिन्यांत पूर्ण होऊन आॅक्टोबर २०१९ पर्यंत यवतमाळात पाणी पोहोचणार होते. तथापि यावर्षीची पाणीटंचाई लक्षात घेऊन येत्या मार्च-एप्रिलपर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे प्रयत्न आहे.बेंबळा ते टाकळी फाटापर्यंत तब्बल १९.७५ किलोमीटरची एक हजार एम.एम.(डीआय) डकटाईल आर्यन पाईपलाईन जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यत आणली जात आहे. या पाईपसाठी आत्तापर्यंत जीवन प्राधिकरण कंत्राटदाराला ६० टक्के रक्कम अदा करीत होते. मात्र आता पालकमंत्री मदन येरावार यांच्या प्रयत्नामुळे नगरविकास विभागाने पाईपसाठी जीवन प्राधिकरणाकडून १०० टक्के निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश काढले.१८ टक्के कामानंतर पंपिंगचे टेंडर५० टक्के नागरी काम झाल्याशिवाय पंपिंग मशीनची निविदा काढता येत नाही. मात्र पालकमंत्री मदन येरावार यांनी विशेष तरतूद म्हणून केवळ १८ टक्के नागरी काम झाल्यास पंपिंग मशीनची निविदा काढण्यासाठी पाठपुरावा केला. परिणामी जीवन प्राधिकरणाने बेंबळावर ५५० हॉर्स पॉवरचे ४ पंपिंग मशीन आणि टाकळी येथील फिल्टर प्लाँटवर २०० हॉर्स पॉवरच्या ४ पंपिंग मशीनच्या निविदा काढण्यास मंजुरी दिल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी दिली.