शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

वृक्ष लागवड जनचळवळ करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 21:27 IST

वृक्ष लागवड मोहिमेला जन चळवळ करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहे. या चळवळीला प्रत्येकाचा हातभार लागला , तर निसर्गाचे सौंदर्य परत येण्यास वेळ लागणार नाही. याकरिता वृक्ष लागवड गरजेची आहे. याबाबत यवतमाळचे विभागीय वन अधिकारी भाऊराव राठोड यांच्याशी साधलेला संवाद.

ठळक मुद्देभविष्यात जिल्हा होणार हिरवागार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वृक्ष लागवड मोहिमेला जन चळवळ करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहे. या चळवळीला प्रत्येकाचा हातभार लागला , तर निसर्गाचे सौंदर्य परत येण्यास वेळ लागणार नाही. याकरिता वृक्ष लागवड गरजेची आहे. याबाबत यवतमाळचे विभागीय वन अधिकारी भाऊराव राठोड यांच्याशी साधलेला संवाद.त्याच त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वृक्ष लावले जातात काय?वृक्ष लागवड करण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत पूर्णत: पारदर्शकता आणली आहे. विशेष म्हणजे वृक्ष लागवड करणारे सर्व स्पॉट आॅनलाईन आहेत. यात कुणाला शंका वाटली, तर ते त्या संकेतस्थळावर जाऊन पाहणी करू शकतात. प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटही देऊ शकतात. यामुळे त्याच जागी पुन्हा वृक्ष लागवड होण्याचा प्रकार थांबला आहे.वृक्ष लागवडीत गैरप्रकार झाला तर?वृक्ष लागवडीत गैरप्रकार घडू नये म्हणून पारदर्शकता आणली. स्मार्टफोनचा वापर करून एका विशिष्ट सॉफ्टवेअरने संकेतस्थळ जोडले. ज्या ठिकाणी वृक्षांची लागवड झाली, त्याचा अक्षांश आणि रेखांश या ठिकाणी दिसतो. एक अक्षांश आणि रेखांश पुन्हा ओव्हरलॅप होत नाही. तेच ठिकाण दाखविले तर हे ओव्हरलॅप दृष्टीस पडेल. अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई व महाराष्ट्र शिस्त नियमानुसार कारवाई होणार आहे.जंगल का वाढत नाही?वृक्षारोपणाचे काम गत तीन-चार वर्षांपासून सुरू झाले. नवीन जंगल तयार होत आहे. प्रत्यक्षस्थळी भेट दिल्यास नवीन जंगल आपल्या दृष्टीस पडतील. सध्या झाडे लहान आहेत. ती मोठी झाल्यानंतर येत्या काळात जंगल वाढलेले दिसतील. यवतमाळ जिल्हा आधीच वनसंपदेने नटलेला आहे. वनांच्या सौंदर्यात भविष्यात भर पडेल. यवतमाळ जिल्हा वनसंपदेने नटलेला आहे. मात्र बेसुमार वृक्षतोड झाल्याने जंगलाच्या सौंदर्याला बाधा पोहोचली. तथा भविष्यात जंगलामध्ये मोठी वाढ होणार आहे.जिल्ह्यातील १४२ नर्सरीमधून यावर्षी रोपटी आणली जाईल. या नर्सरीत एक कोटी १४ लाख ३७ हजार रोपटी तयार आहे. यवतमाळ, पांढरकवडा आणि पुसद विभागातील यंत्रणा वृक्ष लागवड करण्यासाठी तयार आहे. खड्डे खोदले जात आहे. त्यात पुढे रोपटी लावली जातील.यंदा दीड कोटी झाडे लावणारवृक्ष लागवड करताना अनेक बारकावे टिपण्यात आले आहे. कमी पाण्यात जगणारे आणि अधिक काळ टिकणारे वृक्ष लावण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार विविध नर्सरीमध्ये रोपटी तयार करण्यात आली आहे. कडूनिंबासारख्या रोपट्यांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात यावर्षी एक कोटी ३७ लाग रोपटी लावण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये वनविभागाला ६४ लाख ४७ हजार रोपटी लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींसह विविध संघटना आणि शासकीय विभागांचे सहकार्य मिळणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग