शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

जलयुक्त शिवार योजनेबाबत निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:41 IST

जलयुक्त शिवार योजनेतून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे पाणीटंचाई मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेचा अद्याप आढावाच घेण्यात आला नाही,....

ठळक मुद्देआजपर्यंत काय केले : थेट मुख्यमंत्र्यांना केला सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : जलयुक्त शिवार योजनेतून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे पाणीटंचाई मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेचा अद्याप आढावाच घेण्यात आला नाही, असा आरोप मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअरने मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या निवेदनातून केला आहे.५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात ‘सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’, ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला. त्यानुसार जलयुक्त शिवार योजनेचे नियोजन करण्यात आले. या योजनेअंतर्गत दरवर्षी महाराष्ट्रातील पाच हजार गावे पाणीटंचाईमुक्त करण्याचे ठरविण्यात आले. मात्र आजपर्यंत या अभियानाची तपासणीच झाली नसल्याचा आरोप ‘एमपीजे’चे जिल्हाध्यक्ष प्रा.सय्यद मोहसीन यांनी केला आहे.या योजनेच्या लाभाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या अभियानाच्या पारदर्शकतेबाबत जनतेत असंतोष असल्याचा दावाही प्रा.मोहसीन यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या कामांचा आढावा घ्यावा, संकेत स्थळावर त्याची सविस्तर माहिती द्यावी, कामांचे निष्पक्ष व स्वतंत्र सर्वेक्षण करावे व जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे कमीतकमी ७५ टक्के कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.हे निवेदन येथील नायब तहसीलदार संजय राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले, निवेदनावर शहर अध्यक्ष अब्दुल रफीक, धर्मराज गायकवाड, कल्पना पवार, साजीद पतलेवाले, उज्वल इंगोले, उद्धव अंबुरे, किशोर कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.