शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जलयुक्त शिवार योजनेबाबत निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:41 IST

जलयुक्त शिवार योजनेतून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे पाणीटंचाई मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेचा अद्याप आढावाच घेण्यात आला नाही,....

ठळक मुद्देआजपर्यंत काय केले : थेट मुख्यमंत्र्यांना केला सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : जलयुक्त शिवार योजनेतून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे पाणीटंचाई मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेचा अद्याप आढावाच घेण्यात आला नाही, असा आरोप मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअरने मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या निवेदनातून केला आहे.५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात ‘सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’, ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला. त्यानुसार जलयुक्त शिवार योजनेचे नियोजन करण्यात आले. या योजनेअंतर्गत दरवर्षी महाराष्ट्रातील पाच हजार गावे पाणीटंचाईमुक्त करण्याचे ठरविण्यात आले. मात्र आजपर्यंत या अभियानाची तपासणीच झाली नसल्याचा आरोप ‘एमपीजे’चे जिल्हाध्यक्ष प्रा.सय्यद मोहसीन यांनी केला आहे.या योजनेच्या लाभाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या अभियानाच्या पारदर्शकतेबाबत जनतेत असंतोष असल्याचा दावाही प्रा.मोहसीन यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या कामांचा आढावा घ्यावा, संकेत स्थळावर त्याची सविस्तर माहिती द्यावी, कामांचे निष्पक्ष व स्वतंत्र सर्वेक्षण करावे व जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे कमीतकमी ७५ टक्के कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.हे निवेदन येथील नायब तहसीलदार संजय राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले, निवेदनावर शहर अध्यक्ष अब्दुल रफीक, धर्मराज गायकवाड, कल्पना पवार, साजीद पतलेवाले, उज्वल इंगोले, उद्धव अंबुरे, किशोर कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.