शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

जलयुक्त शिवार योजनेबाबत निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:41 IST

जलयुक्त शिवार योजनेतून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे पाणीटंचाई मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेचा अद्याप आढावाच घेण्यात आला नाही,....

ठळक मुद्देआजपर्यंत काय केले : थेट मुख्यमंत्र्यांना केला सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : जलयुक्त शिवार योजनेतून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे पाणीटंचाई मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेचा अद्याप आढावाच घेण्यात आला नाही, असा आरोप मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअरने मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या निवेदनातून केला आहे.५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात ‘सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’, ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला. त्यानुसार जलयुक्त शिवार योजनेचे नियोजन करण्यात आले. या योजनेअंतर्गत दरवर्षी महाराष्ट्रातील पाच हजार गावे पाणीटंचाईमुक्त करण्याचे ठरविण्यात आले. मात्र आजपर्यंत या अभियानाची तपासणीच झाली नसल्याचा आरोप ‘एमपीजे’चे जिल्हाध्यक्ष प्रा.सय्यद मोहसीन यांनी केला आहे.या योजनेच्या लाभाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या अभियानाच्या पारदर्शकतेबाबत जनतेत असंतोष असल्याचा दावाही प्रा.मोहसीन यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या कामांचा आढावा घ्यावा, संकेत स्थळावर त्याची सविस्तर माहिती द्यावी, कामांचे निष्पक्ष व स्वतंत्र सर्वेक्षण करावे व जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे कमीतकमी ७५ टक्के कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.हे निवेदन येथील नायब तहसीलदार संजय राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले, निवेदनावर शहर अध्यक्ष अब्दुल रफीक, धर्मराज गायकवाड, कल्पना पवार, साजीद पतलेवाले, उज्वल इंगोले, उद्धव अंबुरे, किशोर कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.