शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार शेतकऱ्यांच्या बोगस नोंदणीला ‘एपीएमसी’ जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 07:00 IST

शेतकऱ्यांच्या नावावर झालेल्या बोगस नोंदणीला कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि सातबारा देणारी महसूल यंत्रणा जबाबदार असल्याचे सीसीआयने म्हटले आहे.

ठळक मुद्दे‘सीसीआय’ने हात झटकलेसातबारा देणाऱ्या महसूल यंत्रणेकडेही संशयाचे बोट

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियामधील कोट्यवधी रुपयांच्या कापूस खरेदी घोटाळ्यात ‘सीसीआय’ने हात झटकले आहे. शेतकऱ्यांच्या नावावर झालेल्या बोगस नोंदणीला कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि सातबारा देणारी महसूल यंत्रणा जबाबदार असल्याचे सीसीआयने म्हटले आहे.‘लोकमत’ने ‘सीसीआय’मधील कापूस खरेदी घोटाळा उघडकीस आणला. त्याची दखल घेऊन सीसीआयचे मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पानीग्रही यांनी यवतमाळ जिल्ह्यातून या घोटाळ्याच्या चौकशीला प्रारंभ केला. यवतमाळात आलेल्या पानीग्रही यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. सहकार विभागाच्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ११ हजार ६०० शेतकऱ्यांच्या नावावर बोगस नोंदणी केली गेल्याचे आढळून आले. मात्र या बोगस नोंदणीला सीसीआय जबाबदार नसल्याचे त्यांनी सांगितले. पानीग्रही म्हणाले, महसूल विभागाचा घटक असलेला तलाठी शेतकऱ्यांना सातबारा देतो, हा सातबारा कृषी उत्पन्न बाजार समिती नोंदणीच्या वेळी प्रमाणित करते. मग त्याला सीसीआय दोषी कसे ?. सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर सातबारा घेऊन येणारा व्यक्ती शेतकरी की व्यापारी हे ओळखायचे कसे ?, सातबारा आणला म्हणजे तोच शेतकरी असे गृहित धरुन त्याचा कापूस खरेदी केला जातो. सातबारावर केवळ कापूस व सोयाबीन असा उल्लेख असतो. अनेकदा त्यावरील सोयाबीन आपल्या सोईने हटविले जाते.

म्हणे, शेतकरीच व्यापारी बनलेसातबारा मिळविणे व त्यावर व्यापाऱ्यांचा कापूस विकणे यामागे अर्थकारण असल्याची बाब त्यांनी मान्य केली. अनेक ठिकाणी शेतकरीच व्यापारी बनल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल विभागाने शेतकऱ्यांना बोगस सातबारा देणे बंद केल्यास कापूस खरेदीत गैरप्रकार करण्यास वावच राहणार नाही, असे पानीग्रही यांनी सांगितले.

सीसीआयच्या काही ग्रेडर्सकडून गैरप्रकारसीसीआयच्या काही केंद्रांवर ग्रेडर्सकडून गैरप्रकार झाला असण्याची शक्यता आहे. मात्र तो सरसकट व सर्वत्र नाही. गैरप्रकार शोधले जात असून संबंधितावर कारवाईही केली जाईल, असे पानीग्रही यांनी स्पष्ट केले. विशेष असे, अनेक खरेदी केंद्रांवर ग्रेडर्स व जिनिंग-प्रेसिंग मालकांच्या संगनमताने अन्य जिल्ह्यातील कापूस आणूनही विकला गेला आहे.सातबारा आम्ही प्रमाणित करतो, त्यामुळे त्याला कृषी उत्पन्न बाजार समित्या जबाबदार आहे, हे मान्य. पण कोणत्याही शेतकऱ्याने नोंदणीसाठी आणलेला सातबारा आम्ही नाकारू शकत नाही. यवतमाळ जिल्ह्यात ११ हजार ६०० पैकी सर्वच नोंदणी बोगस नाही. आधी नोंदणी केली व नंतर कापूस बाहेर विकला असे प्रकार घडले आहे. कळंब बाजार समितीने सर्वप्रथम सर्वेक्षण करून अशी नावे हटविली होती.- प्रवीण देशमुख, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, कळंब.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती