शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणच ठरणार शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरील उत्तर

By admin | Updated: December 31, 2015 02:47 IST

गेल्या काही काळापासून मराठवाड्यात दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

भारतीय जैन संघटना : शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पुण्यात शिकविणारयवतमाळ : गेल्या काही काळापासून मराठवाड्यात दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे तेथील मुलांच्या शिक्षणाची आबाळ टाळण्यासाठी २३० मुलांना वाघोली, पुणेच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात आसरा देण्यात आला आहे. ही मुले उत्तम शिक्षण घेऊन आयुष्य घडवत आहेत. मराठवाड्यासोबतच विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थितीही अत्यंत शोचनीय आहे. विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आणि होत आहेत. त्यामुळे यवतमाळवर भारतीय जैन संघटनेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ५० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे येथे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासंदर्भात भारतीय जैन संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पुनर्वसन प्रकल्पाचा उद्देशशेतकरी आत्महत्यांची जी विविध कारणे आहेत, त्यामध्ये शिक्षणाचा अभाव हेही एक महत्त्वाचे कारण आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था पैशाच्या किंवा वस्तूंच्या रूपात मदत करीत आहेत. सरकारही कर्ज कमी करणे किंवा कर्जमाफी करणे अशा माध्यमातून प्रयत्नरत आहे. मात्र, हे उपाय तात्पुरत्या स्वरुपाचे आहेत. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने प्रगत करायचे असेल तर या समाजात शिक्षणाचा टक्का वाढविण्याची गरज आहे. पैशाअभावी शेतकऱ्यांची मुले योग्य त्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकत नाही. शिक्षणाचा अभाव असल्याने समोर आलेल्या आर्थिक अडचणीला किंवा सामाजिक-कौटुंबिक समस्यांना कसे तोंड द्यावे, याचे उत्तर शेतकऱ्यांना गवसत नाही. त्यामुळेच ते आत्महत्येच्या निर्णयाकडे वळतात. ही स्थिती बदलण्यासाठी शेतकरी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. म्हणूनच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात सहभागी करून घेण्यात येणार आहे. ही शिक्षित झालेली मुले निश्चितच आपल्या समाजात जीवनाविषयीचा सकारात्मक विचार पेरण्यासाठी सहाय्यभूत ठरतील, असा विश्वास भारतीय जैन संघटनेला वाटतो.मुलींना समानतेची संधीशैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात शेतकऱ्यांच्या मुलींनाही समान संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थिनींचीही निवड करून त्यांना योग्य ते शैक्षणिक वातावरण या प्रकल्पात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकरी वर्गातील महिलांमध्ये शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी मुलींची प्राधान्याने निवड करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सुरक्षेचीही हमी घेतली जाणार आहे. याच मुली आपल्या समाजात महिला सबलीकरण घडवून आणि जीवनाविषयचा सकारात्मक संदेश पोहोचवून शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकतील, असा विश्वास भारतीय जैन संघटनेने व्यक्त केला.