शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शिक्षणच ठरणार शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरील उत्तर

By admin | Updated: December 31, 2015 02:47 IST

गेल्या काही काळापासून मराठवाड्यात दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

भारतीय जैन संघटना : शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पुण्यात शिकविणारयवतमाळ : गेल्या काही काळापासून मराठवाड्यात दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे तेथील मुलांच्या शिक्षणाची आबाळ टाळण्यासाठी २३० मुलांना वाघोली, पुणेच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात आसरा देण्यात आला आहे. ही मुले उत्तम शिक्षण घेऊन आयुष्य घडवत आहेत. मराठवाड्यासोबतच विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थितीही अत्यंत शोचनीय आहे. विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आणि होत आहेत. त्यामुळे यवतमाळवर भारतीय जैन संघटनेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ५० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे येथे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासंदर्भात भारतीय जैन संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पुनर्वसन प्रकल्पाचा उद्देशशेतकरी आत्महत्यांची जी विविध कारणे आहेत, त्यामध्ये शिक्षणाचा अभाव हेही एक महत्त्वाचे कारण आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था पैशाच्या किंवा वस्तूंच्या रूपात मदत करीत आहेत. सरकारही कर्ज कमी करणे किंवा कर्जमाफी करणे अशा माध्यमातून प्रयत्नरत आहे. मात्र, हे उपाय तात्पुरत्या स्वरुपाचे आहेत. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने प्रगत करायचे असेल तर या समाजात शिक्षणाचा टक्का वाढविण्याची गरज आहे. पैशाअभावी शेतकऱ्यांची मुले योग्य त्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकत नाही. शिक्षणाचा अभाव असल्याने समोर आलेल्या आर्थिक अडचणीला किंवा सामाजिक-कौटुंबिक समस्यांना कसे तोंड द्यावे, याचे उत्तर शेतकऱ्यांना गवसत नाही. त्यामुळेच ते आत्महत्येच्या निर्णयाकडे वळतात. ही स्थिती बदलण्यासाठी शेतकरी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. म्हणूनच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात सहभागी करून घेण्यात येणार आहे. ही शिक्षित झालेली मुले निश्चितच आपल्या समाजात जीवनाविषयीचा सकारात्मक विचार पेरण्यासाठी सहाय्यभूत ठरतील, असा विश्वास भारतीय जैन संघटनेला वाटतो.मुलींना समानतेची संधीशैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात शेतकऱ्यांच्या मुलींनाही समान संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थिनींचीही निवड करून त्यांना योग्य ते शैक्षणिक वातावरण या प्रकल्पात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकरी वर्गातील महिलांमध्ये शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी मुलींची प्राधान्याने निवड करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सुरक्षेचीही हमी घेतली जाणार आहे. याच मुली आपल्या समाजात महिला सबलीकरण घडवून आणि जीवनाविषयचा सकारात्मक संदेश पोहोचवून शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकतील, असा विश्वास भारतीय जैन संघटनेने व्यक्त केला.