शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

‘त्या’ नेत्याचे दुसरे प्रकरणही झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:15 IST

तालुक्यातील तिरझडा येथील एका वृद्धेला रेल्वे भूसंपादनात मिळालेली रक्कम हडप केल्याच्या तक्रारीवरुन तीन राजकीय नेत्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तालुक्यातीलच घोटी येथील नागरिकांचेही त्यांनी लाखो रुपये हडप केल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

ठळक मुद्देपैसे हडपले : रेल्वे भूसंपादनाचा मोबदला गिळंकृत

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यातील तिरझडा येथील एका वृद्धेला रेल्वे भूसंपादनात मिळालेली रक्कम हडप केल्याच्या तक्रारीवरुन तीन राजकीय नेत्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तालुक्यातीलच घोटी येथील नागरिकांचेही त्यांनी लाखो रुपये हडप केल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.तिरझडा येथील वृद्धा राधाबाई नेहारे यांचे चापर्डा शिवारात शेत होते. ते रेल्वेने संपादित केली. त्यापोटी त्यांना २७ लाख ८७ हजार २८५ रुपये मोबदला देण्यात आला. ही रक्कम वारसांमध्ये वाटप करुन देतो, अशी बतावणी करुन विलास मुके, अजय कारमोरे व संदीप कारमोरे यांनी कोऱ्या धनादेशावर राधाबाईची स्वाक्षरी व अंगठे घेतले. त्यांच्या खात्यातून लाखो रुपये स्वत: व इतरांच्या खात्यात वळते करुन पैसे हडपले. हा प्रकार लक्षात येताच गणेश गोसावी नेहारे यांच्या तक्रारीवरुन ३० एप्रिल रोजी विविध कलमान्वये या तिाांविरूद्ध कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला.या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच घोटी येथील काहींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. राधाबाई नेहारे यांचे घोटी येथे नातेवाईक आहे. विलास मुके याने त्यांच्याजवळूनही लाखो रुपये हडप केल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. या त्रिकुटाने आणखी कुठे-कुठे ‘हात’ मारला, याचा तपास सुरू आहे. काही पुरावे पोलिसांच्या ‘हाती’ लागले असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संघरक्षक भगत यांनी दिली. य प्रकरणात बँकेचे अधिकारी तर सहभागी नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.आरोपींची जामिनासाठी धावपळया प्रकरणातील तिनही आरोपी सध्या पोलीस दप्तरी फरार आहे. पोलिसांना अद्याप ते गवसले नाही. आता तिघांनीही जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र पोलिसांनी जामिनीला विरोध केला आहे. काही आरोपी राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे तर या प्रकरणात त्यांना गजाआड करण्यात विलंब होत नाही ना, अशी शंका वर्तविली जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा