शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भूखंड माफियांवर आणखी एक गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:22 IST

लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड हडपणाऱ्या राकेश यादव टोळीवर आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात भूखंड खरेदीत साक्षीदार म्हणून भूमिका वठविणाºया दोघांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदोघांना अटक : २५ हजार चौरस फूट भूखंड हडपला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड हडपणाऱ्या राकेश यादव टोळीवर आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात भूखंड खरेदीत साक्षीदार म्हणून भूमिका वठविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.गजानन नरहरी धोंडगे रा. मेहकर जि. बुलडाणा यांनी लोहारा पोलीस ठाण्यात २१ जुलै रोजी फिर्याद नोंदविली. त्यावरून भूमाफिया राकेश दीपक यादव रा. पवारपुरा, भोसा रोड यवतमाळ, त्याचे साथीदार नीलेश लहुराव बनोरे रा. जामनकरनगर उमरसरा यवतमाळ व नीलेश वलजीभाई उनडकर रा. हनुमान आखाडा चौक यवतमाळ या तिघांविरुद्ध भादंवि ४२०, ४६५, ४६८, ४६९, ४७१, ४७४, १२० (ब) भादंवि व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुख्य आरोपी राकेश यादव अद्याप पसार असून त्याच्या दोन्ही साथीदारांना पोलिसांनी रात्रीच अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून भूमाफियांच्या एकूणच कारनाम्यांचा, त्यात सहभागी पडद्यामागील चेहऱ्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहे. राकेश यादव व त्याच्या अन्य साथीदारांविरुद्ध नुकताच यवतमाळ शहर पोलीस ठाण्यातही अशाच स्वरूपाचा फसवणूक व अफरातफरीचा गुन्हा नोंदविला गेला आहे. त्यात आतापर्यंत एकच आरोपी अटक असून इतरांचा शोध सुरू आहे.गजानन धोंडगे यांचा लोहारा-वाघापूर बायपासवर २५ हजार चौरस फुटाचा भूखंड आहे. हा भूखंड राकेश यादव व टोळीने बनावट मालक उभा करुन परस्पर त्याची खरेदी करुन घेतली. त्यासाठी बोगस आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य कागदपत्रांचा वापर केला गेला. गैरमार्गाने खरेदी करून घेतलेल्या या एकाच भूखंडावर दोन बँकांमधून एकूण सात कोटी रुपयांचे कर्ज उचलले गेले. प्रत्यक्षात या भूखंडाची किंमत अडीच ते तीन कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.भूखंड घोटाळ्याची चौकशी एसआयटी (विशेष तपास पथक) मार्फत सुरू आहे. या चौकशीत आणखी किती तरी प्रकरणे पुढे येण्याची शक्यता एसआयटीचे प्रमुख यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली आहे.भूखंडधारकांची तलाठ्यांकडे गर्दी‘लोकमत’ने यवतमाळातील भूखंड घोटाळा उघडकीस आणल्यानंतर एका पाठोपाठ फसवणुकीची प्रकरणे उघड होत असून त्यात गुन्हेही नोंदविले जात आहे. भूखंड हडपण्याचे प्रकार पाहता कित्येक भूखंड मालकांनी आपली स्थावर मालमत्ता सुरक्षित आहे की नाही, ती खरोखरच आपल्या नावावर आहे का की परस्परच कुणी त्याची विल्हेवाट लावली, याची खातरजमा करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी संबंधित तलाठी कार्यालय गाठून सातबारा मिळविला जात आहे. याशिवाय फेरफार नोंदी तपासून दुय्यम निबंधक (खरेदी-विक्री) कार्यालयातूनही खातरजमा करून घेतली जात आहे. या तपासणीत आणखी काही मोठी प्रकरणे उघडकीस येणार असल्याची माहिती आहे.पुन्हा दोन गुन्हे प्रक्रियेतभूमाफियांचे अनेक कारनामे दरदिवशी एसआयटीपुढे येत आहेत. त्यातूनच या माफियांविरोधात आणखी दोन गुन्हे प्रक्रियेत आहेत. केवळ संबंधित आवश्यक कागदपत्रे फिर्यादीकडून प्राप्त होण्याची पोलिसांना तेवढी प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा