शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

सोयाबीनमध्ये सोडली जनावरे

By admin | Updated: October 1, 2014 23:30 IST

सोयाबीनचे पीक हाती येणार नसल्याची खात्री झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चक्क जनावरे सोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाऊस आणि किडींच्या

किडींचा प्रकोप : १० हजार हेक्टरवरील पीक हातचे गेले महागाव : सोयाबीनचे पीक हाती येणार नसल्याची खात्री झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चक्क जनावरे सोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. तालुक्यातील अनेक सोयाबीनच्या शेतात जनावरांचे कळप चरताना दिसून येत आहे.महागाव तालुक्यावर यंदाही निसर्गाची अवकृपा झाली. गतवर्षी अतिवृष्टीने संपूर्ण पीक मातीमोल झाले होते. यंदा पावसाने दडी मारल्याने पीक करपून गेले आहे. दुबार-तिबार पेरणीतून बचावलेले पीक सध्या विविध किडींच्या प्रादुर्भावात सापडले आहे. तालुक्यात २० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर मोझॅकचा हल्ला झाल्याने पीक पिवळे पडू लागले आहे. अशा स्थितीत शेंगाही भरल्या नाही. वरून ऊन्ह तापत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क आपल्या शेतांमध्ये जनावरे सोडल्याचे दिसत आहे. सोयाबीन वाळून मातीमोल होण्यापेक्षा जनावरांना तरी दोन घास मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. महागाव तालुक्यात कृषी विभागाने नुकसानीचा आकडा नुकताच घोषित केला. हा आकडा पाहून कृषिशास्त्रज्ञही चक्रावून गेले. रोगाची खात्री करण्यासाठी अकोला कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तालुक्यात दाखल झाले. त्यांनी हिवरा, सवना, कलगाव, अंबोडा परिसरात सोयाबीनची पाहणी केली. दुबार-तिबार केलेली पेरणी आणि काही प्रमाणात औषधाच्या मात्रा चुकल्या तर काही ठिकाणी बियाणे बनावट निघाले. त्यामुळे पिकावर मोझॅकचे आक्रमण झाले. परिणामी २० हजार हेक्टरपैकी १० हजार हेक्टरवरील सोयाबीन हातचे गेले. कृषी विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करून जिल्हा कृषी विभाग, कृषी विद्यापीठांना पाठविले. कृषी विभागाकडून सोयाबीन नुकसानीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकाराला कृषी विभाग, कृषी केंद्र संचालक की आणखी कोण जबाबदार असा प्रश्न शेतकरी करीत आहे. अनेक शेतकऱ्यांना लागवडीच्या वेळी बनावट भिजलेले बियाणे देण्यात आले होते. याकडे कृषी विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कंपनीला आणि प्रशासनाला पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. पंचायत समितीच्या कृषी विभागाने तालुक्यातील काही कृषी केंद्रातील बियाणे नमुना तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी अनुप एजंसी, पाटील बीज भंडार, मिता कृषी केंद्र, दत्त कृषी केंद्र सर्व मुडाणा आणि मीता एजंसी महागाव येथील नमुने अप्रमाणित असल्याचे पुढे आले. या कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु कोणतीही कारवाई अद्याप झाली नाही. आता तर शेतकऱ्यांना सोयाबीनमध्ये जनावरे सोडण्याची वेळ आली आहे. कोणत्याही शेतात गेल्यास सोयाबीनच्या पिकावर जनावरे ताव मारताना दिसत आहे. हतबल शेतकरी जनावरांना चारा म्हणून सोयाबीनच्या पिकात सोडत आहे. सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक आहे. अनेक शेतकऱ्यांनी उधार-उसणे आणि सोने-नाणे गहाण ठेऊन पेरणी केली. रात्र-रात्र जागून ओलित केले. परंतु किडींनी पूर्ण सोयाबीन उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे शेतात जनावरे सोडण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे कोणताही पर्याय सध्या तरी दिसत नाही. हतबल शेतकऱ्यांंना शासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)