शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनमध्ये सोडली जनावरे

By admin | Updated: October 1, 2014 23:30 IST

सोयाबीनचे पीक हाती येणार नसल्याची खात्री झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चक्क जनावरे सोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाऊस आणि किडींच्या

किडींचा प्रकोप : १० हजार हेक्टरवरील पीक हातचे गेले महागाव : सोयाबीनचे पीक हाती येणार नसल्याची खात्री झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चक्क जनावरे सोडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. तालुक्यातील अनेक सोयाबीनच्या शेतात जनावरांचे कळप चरताना दिसून येत आहे.महागाव तालुक्यावर यंदाही निसर्गाची अवकृपा झाली. गतवर्षी अतिवृष्टीने संपूर्ण पीक मातीमोल झाले होते. यंदा पावसाने दडी मारल्याने पीक करपून गेले आहे. दुबार-तिबार पेरणीतून बचावलेले पीक सध्या विविध किडींच्या प्रादुर्भावात सापडले आहे. तालुक्यात २० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर मोझॅकचा हल्ला झाल्याने पीक पिवळे पडू लागले आहे. अशा स्थितीत शेंगाही भरल्या नाही. वरून ऊन्ह तापत आहे. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क आपल्या शेतांमध्ये जनावरे सोडल्याचे दिसत आहे. सोयाबीन वाळून मातीमोल होण्यापेक्षा जनावरांना तरी दोन घास मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. महागाव तालुक्यात कृषी विभागाने नुकसानीचा आकडा नुकताच घोषित केला. हा आकडा पाहून कृषिशास्त्रज्ञही चक्रावून गेले. रोगाची खात्री करण्यासाठी अकोला कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तालुक्यात दाखल झाले. त्यांनी हिवरा, सवना, कलगाव, अंबोडा परिसरात सोयाबीनची पाहणी केली. दुबार-तिबार केलेली पेरणी आणि काही प्रमाणात औषधाच्या मात्रा चुकल्या तर काही ठिकाणी बियाणे बनावट निघाले. त्यामुळे पिकावर मोझॅकचे आक्रमण झाले. परिणामी २० हजार हेक्टरपैकी १० हजार हेक्टरवरील सोयाबीन हातचे गेले. कृषी विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करून जिल्हा कृषी विभाग, कृषी विद्यापीठांना पाठविले. कृषी विभागाकडून सोयाबीन नुकसानीवर शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकाराला कृषी विभाग, कृषी केंद्र संचालक की आणखी कोण जबाबदार असा प्रश्न शेतकरी करीत आहे. अनेक शेतकऱ्यांना लागवडीच्या वेळी बनावट भिजलेले बियाणे देण्यात आले होते. याकडे कृषी विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. कंपनीला आणि प्रशासनाला पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. पंचायत समितीच्या कृषी विभागाने तालुक्यातील काही कृषी केंद्रातील बियाणे नमुना तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी अनुप एजंसी, पाटील बीज भंडार, मिता कृषी केंद्र, दत्त कृषी केंद्र सर्व मुडाणा आणि मीता एजंसी महागाव येथील नमुने अप्रमाणित असल्याचे पुढे आले. या कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु कोणतीही कारवाई अद्याप झाली नाही. आता तर शेतकऱ्यांना सोयाबीनमध्ये जनावरे सोडण्याची वेळ आली आहे. कोणत्याही शेतात गेल्यास सोयाबीनच्या पिकावर जनावरे ताव मारताना दिसत आहे. हतबल शेतकरी जनावरांना चारा म्हणून सोयाबीनच्या पिकात सोडत आहे. सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक आहे. अनेक शेतकऱ्यांनी उधार-उसणे आणि सोने-नाणे गहाण ठेऊन पेरणी केली. रात्र-रात्र जागून ओलित केले. परंतु किडींनी पूर्ण सोयाबीन उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे शेतात जनावरे सोडण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे कोणताही पर्याय सध्या तरी दिसत नाही. हतबल शेतकऱ्यांंना शासनाने मदत करावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)