शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

कन्टेनरमधून जनावर तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 23:52 IST

खुल्या वाहनातून जनावरांची वाहतूक केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, म्हणून आता जनावर तस्करांनी चक्क बंदीस्त कन्टेनरचा आधार घेतला आहे. यवतमाळ तालुक्यातील बारडतांडा आणि मंगरुळ येथे जनावरांची वाहतूक करणारे पाच कन्टेनर पकडण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देदीडशे जनावरांची सुटका : बारडतांडा व मंगरुळ येथे पाच कन्टेनर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी/मंगरुळ : खुल्या वाहनातून जनावरांची वाहतूक केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, म्हणून आता जनावर तस्करांनी चक्क बंदीस्त कन्टेनरचा आधार घेतला आहे. यवतमाळ तालुक्यातील बारडतांडा आणि मंगरुळ येथे जनावरांची वाहतूक करणारे पाच कन्टेनर पकडण्यात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. तब्बल दीडशे जनावरांची सुटका करण्यात आली.राज्यात गोवंश वाहतूक आणि हत्येला बंदी आहे. मात्र त्यानंतरही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात जनावरांची वाहतूक केली जाते. या चोरट्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांसह सामाजिक संस्थाही पुढाकार घेत आहे. त्यामुळे अशी वाहतूक करणे तस्करांना कठीण झाले. त्यावर आता त्यांनी नामीशक्कल लढविली आहे. बंदीस्त कन्टेनरमध्ये ३० ते ३५ जनावरे भरुन त्याची वाहतूक केली जाते. कन्टेनर बंदीस्त असल्याने कुणालाही संशय येत नाही. परंतु याचे बिंग शुक्रवारी फुटले. नागपूरवरून आदिलाबादकडे जाणारे पाच ट्रक बजरंग दलाचे कार्यकर्ते बाळू जगताप यांच्या मार्गदर्शनात मंगरुळ व बारडतांडा येथे अडविण्यात आले. कन्टेनर उघडले असता त्यात तब्बल दीडशेच्यावर जनावरे आढळून आली. अत्यंत दाटीवाटीने ही जनावरे कोंबली होती. या सर्व जनावरांची सुटका करून त्यांची रवानगी दिग्रस येथील गोरक्षणमध्ये करण्यात आली आहे. पाच कन्टेनर जप्त करण्यात आले आहे.यवतमाळ जिल्ह््यात पहिल्यांदाच कन्टेनरमधून जनावरांची वाहतूक उघडकीस आली. यामुळे आतापर्यंत अशा पद्धतीने अनेक जनावरांची तस्करी झाली असावी. 

टॅग्स :Crimeगुन्हा