शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या केळी बनल्या जनावरांचा चारा; यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 07:00 IST

कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. मागणीच नसल्याने व्यापाऱ्यांकडून केळीची उचल झाली नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या केळी जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्याची वेळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देमागणी नसल्याने व्यापाऱ्यांची पाठ मेहनतीवर फेरले पाणी

हमीद खाँ पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. याचा परिणाम केळी पिकावरही प्रचंड प्रमाणात झाला आहे. मागणीच नसल्याने व्यापाऱ्यांकडून केळीची उचल झाली नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या केळी जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.वीज समस्या, पाणीटंचाई, नैसर्गिक संकट, बदलते वातावरण यावर मात करत शेतकऱ्यांनी केळीचे बगीचे फुलविले. त्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. लाखो रुपये खर्च करून जोपासणा केली. यातून मोठे उत्पन्न येईल, अशी आशा असतानाच लॉकडाऊनमुळे त्यावर पाणी फेरले गेले. केळीची किरकोळ विक्री करण्याचाही प्रयत्न झाला. हा प्रयोग यशस्वी होत नसल्याचे लक्षात येताच जनावरांचा चारा म्हणून केळी वापरल्या गेल्या.परिसरातील सर्वच फलोत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळाचा तडाखाही बगीच्यांना बसला आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

लॉकडाऊनपूर्वी मिळाला चांगला भाववडगाव (जंगल) येथील गजानन पोटे यांनी आपल्या तीन एकर शेतात केळीची लागवड केली. यातून सहा ते सात लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. लॉकडाऊनपूर्वी केळीची पहिली खेप सुमारे ९० हजार रुपयांनी विक्री झाली. त्यावेळी बाजारभावही चांगला होता. लॉकडाऊन झाल्यापासून केळीचे काढणीला आलेले पीक जागीच खराब होत आहे. त्यामुळे त्यांनी ही केळी जनावरांपुढे चारा म्हणून टाकणे सुरू केले.

टॅग्स :agricultureशेतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस