शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

लाखोंच्या केळी बनल्या जनावरांचा चारा; यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 07:00 IST

कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. मागणीच नसल्याने व्यापाऱ्यांकडून केळीची उचल झाली नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या केळी जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्याची वेळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.

ठळक मुद्देमागणी नसल्याने व्यापाऱ्यांची पाठ मेहनतीवर फेरले पाणी

हमीद खाँ पठाण ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. याचा परिणाम केळी पिकावरही प्रचंड प्रमाणात झाला आहे. मागणीच नसल्याने व्यापाऱ्यांकडून केळीची उचल झाली नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या केळी जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.वीज समस्या, पाणीटंचाई, नैसर्गिक संकट, बदलते वातावरण यावर मात करत शेतकऱ्यांनी केळीचे बगीचे फुलविले. त्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. लाखो रुपये खर्च करून जोपासणा केली. यातून मोठे उत्पन्न येईल, अशी आशा असतानाच लॉकडाऊनमुळे त्यावर पाणी फेरले गेले. केळीची किरकोळ विक्री करण्याचाही प्रयत्न झाला. हा प्रयोग यशस्वी होत नसल्याचे लक्षात येताच जनावरांचा चारा म्हणून केळी वापरल्या गेल्या.परिसरातील सर्वच फलोत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळाचा तडाखाही बगीच्यांना बसला आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

लॉकडाऊनपूर्वी मिळाला चांगला भाववडगाव (जंगल) येथील गजानन पोटे यांनी आपल्या तीन एकर शेतात केळीची लागवड केली. यातून सहा ते सात लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. लॉकडाऊनपूर्वी केळीची पहिली खेप सुमारे ९० हजार रुपयांनी विक्री झाली. त्यावेळी बाजारभावही चांगला होता. लॉकडाऊन झाल्यापासून केळीचे काढणीला आलेले पीक जागीच खराब होत आहे. त्यामुळे त्यांनी ही केळी जनावरांपुढे चारा म्हणून टाकणे सुरू केले.

टॅग्स :agricultureशेतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस