शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रागाच्या भरात दुचाकीवर निघालेली युवती अडकली घाटात; पेट्रोल संपले आणि मोबाईल झाला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 06:00 IST

Yawatmal News ३० वर्षीय युवतीने घरातील किरकोळ वादाचा राग मनात धरून शनिवारी रात्री दुचाकीने प्रवास सुरू केला. जायचे कुठे हे माहीत नसताना ती यवतमाळजवळच्या मडकोना घाटात पोहोचली.

ठळक मुद्देपेट्रोल संपल्याने मडकोना घाटात अडकलीट्रक चालकाने दिली नियंत्रण कक्षाला खबरपोलिसांच्या सतर्कतेने तरुणी सुरक्षित

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुखवस्तू कुटुंबात राहणाऱ्या ३० वर्षीय युवतीने घरातील किरकोळ वादाचा राग मनात धरून शनिवारी रात्री दुचाकीने प्रवास सुरू केला. जायचे कुठे हे माहीत नसताना ती यवतमाळजवळच्या मडकोना घाटात पोहोचली. तिथे तिच्या दुचाकीचे पेट्रोल संपले, मोबाईल स्विच ऑफ झाला. मध्यरात्री भररस्त्यात उभ्या असलेल्या तरुणीला ग्रामीण पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले.

नागपूर येथील एजन्सी प्लाझा पटेलनगर येथे राहणारी तरुणी एम.एच.३१/एसडब्ल्यू-७४४९ या दुचाकीने यवतमाळकडे निघाली. तिच्या दुचाकीचे पेट्रोल संपल्याने मडकोना घाटात रस्त्याच्या बाजूला काळोखात बसून होती. हा प्रकार ट्रक चालकाच्या लक्षात येताच त्याने पोलीस नियंत्रण कक्षात माहिती दिली. नियंत्रण कक्षातून युवती बेवारस असल्याची सूचना ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय शिरभाते यांना मिळाली.

त्यांनी तात्काळ मडकोना घाट गाठला. महिला पोलीस शिपायाच्या मदतीने त्या युवतीला ताब्यात घेतले. चौकशी केली असता ती युवती कुठलीही माहिती देण्यास तयार नव्हती. तिचा मोबाईल चार्ज करून संपर्क केला असता तिच्या कुटुंबीयांकडून ओळख पटली. ती युवती शनिवारी दुपारपासून घरून बेपत्ता होती. याप्रकरणी रात्री ११ वाजता कुटुंबीयांनी गिट्टी खदाण पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. या सर्व गोष्टींची खातरजमा करून रविवारी त्या मुलीला ग्रामीण पोलिसांनी कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला.घरातील वाद नेमका कशासाठी, ही युवती एकटीच निघाली होती का आदी प्रश्न अद्याप कायम आहे. 

 

 

 

टॅग्स :Policeपोलिस