शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

‘मजीप्रा’त बदल्यांमध्ये दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:10 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमरावती विभागात वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांचे बदली सत्र राबविण्यात आले. यात दुजाभाव झाला असल्याची ओरड सुरू आहे. प्रामुख्याने यवतमाळ विभागातील कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने इतरत्र हलविल्याचा आरोप केला जात आहे.

ठळक मुद्देअमरावती विभाग : आचारसंहिता संपताच ३० जणांना हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमरावती विभागात वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांचे बदली सत्र राबविण्यात आले. यात दुजाभाव झाला असल्याची ओरड सुरू आहे. प्रामुख्याने यवतमाळ विभागातील कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने इतरत्र हलविल्याचा आरोप केला जात आहे. काही विभागात मुक्कामी कर्मचाऱ्यांची अर्थात अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्यांची गर्दी आहे. त्यांची बदली करण्यात हा विभाग विसरला आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. अमरावती विभागात येत असलेल्या विभागीय कार्यालयातील ३० कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. यासाठी कर्मचाऱ्यांकडून पर्याय मागण्यात आले होते. प्रत्यक्षात बदली करताना पर्यायाव्यतिरिक्त गाव देण्यात आले. विशेष म्हणजे, अमरावती, अकोला विभागातील कर्मचाऱ्यांना त्याच जिल्ह्यात बदली दिली आहे. यवतमाळातील काही कर्मचाºयांना मात्र जिल्ह्याबाहेर फेकण्यात आले आहे.बदली झालेले कर्मचारी वर्षा-दोन वर्षात सेवानिवृत्त होणारे आहेत. शासकीय सेवेचा शेवटचा कार्यकाळ गृह जिल्ह्यातच व्हावा, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते आणि तसे संकेतही आहेत. तरीही येथील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. विनंती बदल्यांचाही विचार केला गेला नाही. या सर्व प्रकारामुळे आधीच कर्मचाऱ्यांची टंचाई असलेल्या यवतमाळ विभागात पुन्हा खड्डा पडला आहे. शिवाय बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी राजकीय अथवा इतर प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल, असेही बजावण्यात आले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील वर्ग तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या अन्यायकारक आहे. वरिष्ठांकडून याची दखल घेतली जावी.- राजाराम विठाळकर, सरचिटणीस, मजीप्रा कर्मचारी संघटना

टॅग्स :Waterपाणी