शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

...अन् भुकेला पिंपळाचे पान केले

By admin | Updated: April 16, 2016 01:52 IST

माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांचा आवश्यकता असते. त्याहीपेक्षा समाज जगविण्यासाठी महत्वाची असते विचार भूक.

समता पर्व : कविसंमेलनात सम्यक क्रांतीचा जयघोष, सामाजिक समरसतेवरच्या काव्यफुलांची मेजवानीयवतमाळ : ‘मी सुखाला आज येथे दान केलेहे दु:खाचे केवढे सन्मान केले...चंद्र शोधाया निघालो भाकरीचाअन् भुकेला पिंपळाचे पान केले..माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांचा आवश्यकता असते. त्याहीपेक्षा समाज जगविण्यासाठी महत्वाची असते विचार भूक. व्यवस्थेने लादलेल्या भांडवली धोरणाने सामाजिक विषमतेचे अंतर वाढत असले तरी चळवळ जगविण्यासाठी आंबेडकरवादी विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. येथील समता पर्वात सम्यक क्रांतीचा जयघोष विविध कवींनी आपल्या कविता सादर केल्या. गजलकार विनोद बुरबुरे, किरण मडावी यांनी कविसंमेलनाला एक वैचारिक उंची प्राप्त करून दिली. राष्ट्रीय वास्तव उजागर करणारे सत्या यावेळी अधोरेखीत करण्यात आले. वाटणी झाली अशी माझ्या घराचीमाय काश्मीर, बाप भारत मी कराचीवावटळ भगवी पुन्हा जोमात आलीठेव मित्रा तू तयारी संगराची...विषमतेला खतपाणी घालणाऱ्या अराजक वृत्तींचा संचार लोकशाही मूल्यावर घाला घालीत आहे. अशा वेळी लढणे हाच एक पर्याय आपल्याजवळ शिल्लक आहे. एका देशात सुखाने नांदणाऱ्यांना धर्म, पंथ, जातीच्या आणि प्रांताच्या नावावर वाटणी करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा कवींनी दिला. प्रा. शांतरक्षित गावंडे यांनी आपली गजल सदृश रचना सादर केली. प्रत्येक माणसाचा आम्हास गर्व आहेया रे या बहुजनांनो समतेचे पर्व आहेसमजा समाज निर्मितीसाठी समता पर्वात स्वाभिमानाने सहभागी होण्याची हाक दिली. हाच धागा पकडून डॉ. शीतल मडावी यांनी स्त्रीमुक्तीचा सन्मान केवळ संविधानात असून, शनी प्रदूषणाचे स्तोम वेठीस धरल्याचे सांगितले. समतेचा तुझा संदेश संविधनातला दुमदुमला आसमंत चक्क जेव्हा शनी प्रदूषणातही तूच देऊ शकतो स्त्रियांना हक्कप्रमोद कांबळे यांनी ‘आम्हा उन्हातले तुच झाड होता, आम्ही तहानलेले तूच महाड होता’, या काव्यपंक्ती सादर केल्या. संमेलनाचे अध्यक्ष हेमंत कांबळे यांनी ‘आता आपणच निर्धाराचा पहाड होऊ, गावच्या गावपणासाठी संघर्षाचा महाड होऊ’ या काव्यपंक्ती सादर केल्या. कविसंमेलनात प्रकाश खरतडे, इंदूताई मोहुर्लेकर, सुनंदा मडावी, पुष्पा नागपुरे, मनीषा तिरणकर यांनी कविता प्रस्तुत केल्या. कविसंमेलनाला उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक वानखेडे, किशोर भगत, दीपक नगराळे, अंकुश वाकडे, दिनेश कांबळे, संतोष डोमाळे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)