शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

वºहाडी बोली कविसंमेलन : हसता-हसता केले रसिकांना अंतर्मुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:39 IST

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : पिलू ठेवून खोप्यात चिऊ हिंडते चाऱ्याले गोठ्यामंदे काळी ...

ठळक मुद्देमाय असावी साऱ्याले

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) :पिलू ठेवून खोप्यातचिऊ हिंडते चाऱ्यालेगोठ्यामंदे काळी गायकशी चारे वासरालेहे पाहून वाटतेमाय असावी साऱ्यालेकवी जयंत चावरे यांनी सादर केलेली ‘माय’ कविता वऱ्हाडी बोली कविसंमेलनात सर्वाधिक भाव खाऊन गेली. चावरे यांनी आपल्या स्वरात ही कविता सादर केली. या कवितेने अनेकांच्या डोळ्यांना धारा लागल्या. माय म्हणजे काय, मायचे महती जयंत चावरे यांनी वऱ्हाडी बोलीतून मांडली.शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर, प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर शनिवारी सायंकाळी वऱ्हाडी बोली कविसंमेलन झाले. यावेळी नवोदित आणि गाजलेल्या कवींच्या कविता सादर करण्यात आल्या. शेतकरी, गावाकडच्या जुन्या परंपरा, आई, देश, कपाशी, भाऊबंदकी, कष्टकरी आणि वैदर्भीय माणूस यासारख्या अनेक विषयांना कवितेतून हात घातला.तुह्यं तू पाय मी माह्यावालं पायतो,आता तू काड्या कर तुले उभ्यानंच जायतो,रोज कोरू कोरू लेका लंबा केला धुरा,बोलत नाही म्हणून फायदा घेतं पुरा,जेवढी हाय जमीन तेव्हडी इमानदारीनं वायतो,आता तू काड्या कर तुले उभ्यानंच जायतोभाऊबंदकीचा व्यवहार सांगणारी ही कविता आठमुर्डीतील नीलेश तुरके या नवोदित कवीने सादर करताच हास्यकल्लोळ उडाला.गेले जमाने आंबे, चिचाचेबोरीच्या खाली बोरं वेचाचेकवा हुरडा तोंडाले पाणीभोंग्याले वाजे लग्नाचं गाणंमांडवासाठी भोकराचे पानंशेनाच गोंदन पुरनाची पोळीया नितीन देशमुखांच्या कवितेने ग्रामीण भागातील जीवन कसे बदलत चालले आहे याचे वर्णन केले. अनेकांना पूर्वीच्या काळातील इतिहासात नेण्याचे काम या कवितेने केले. ‘वान्नेरतोंडे’ या राजा धर्माधिकारी यांच्या कवितेने पाकिस्तानला उघडे पाडण्याचे काम केले.काय कामाच्या पार्ट्या,काय कामाचे पक्षदेश पेटला तरीखुर्च्याकडेच लक्षकुनी दाखवते नेहरूकुनी दाखवते गांधी,दाखवते केसर आणिहाती देते गेरूया कवितेमधून पाकिस्तानी कारवाया आणि त्याचा उद्रेक मांडण्याचा प्रयत्न केला. या कवितेला ‘वन्स मोअर’ मिळाला. पुसदचे दीपक आसेगावकर यांनी कापूस आणि सरकीच्या रूपात बहरणारे अजरामर प्रेम ही कविता सादर केली.यावेळी सुरेश गांजरे, राजा धर्माधिकारी, आशा आसुटकर, रमेश घोडे, विष्णू सोळंके, अलका तालणकर, सुनिता पखाले, बसवेश्वर माहूलकर, राजेश देवाळकर, विजय ढाले, डॉ. मार्तंड खुपसे, आंबादास घुले, ऋतू खापर्डे, डॉ. गिरीष खारकर यांच्याही कविता गाजल्या. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. शांतरक्षित गावंडे आणि डॉ. स्वप्नील मानकर यांनी केले.मिर्झांच्या कवितेने हास्यकल्लोळमिर्झा रफी अहेमद बेग यांनी सादर केलेल्या कवितेने माहोल केला. ‘शेतकऱ्यांनो आता घेवू नका फाशी’ ही कविता त्यांनी सादर केली. ‘शेतकऱ्यांवर प्रसंग फुटाने फाकाचे, अमीताब घालतो ३ लाखाचा गॉगल’ अशी गमतीदार रचना सादर करून त्यांनी अनेकांना विचार करण्यास भाग पाडले. याचवेळी माय मराठीचे गुणगान सांगणारी कविताही सादर केली. तर मिरा ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय कवितेमध्ये ‘असा वऱ्हाडी माणूस, कुदळ पावडे त्याचा साज’ ही भारदस्त कविता सादर केली.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन