शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

वºहाडी बोली कविसंमेलन : हसता-हसता केले रसिकांना अंतर्मुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:39 IST

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : पिलू ठेवून खोप्यात चिऊ हिंडते चाऱ्याले गोठ्यामंदे काळी ...

ठळक मुद्देमाय असावी साऱ्याले

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) :पिलू ठेवून खोप्यातचिऊ हिंडते चाऱ्यालेगोठ्यामंदे काळी गायकशी चारे वासरालेहे पाहून वाटतेमाय असावी साऱ्यालेकवी जयंत चावरे यांनी सादर केलेली ‘माय’ कविता वऱ्हाडी बोली कविसंमेलनात सर्वाधिक भाव खाऊन गेली. चावरे यांनी आपल्या स्वरात ही कविता सादर केली. या कवितेने अनेकांच्या डोळ्यांना धारा लागल्या. माय म्हणजे काय, मायचे महती जयंत चावरे यांनी वऱ्हाडी बोलीतून मांडली.शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर, प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर शनिवारी सायंकाळी वऱ्हाडी बोली कविसंमेलन झाले. यावेळी नवोदित आणि गाजलेल्या कवींच्या कविता सादर करण्यात आल्या. शेतकरी, गावाकडच्या जुन्या परंपरा, आई, देश, कपाशी, भाऊबंदकी, कष्टकरी आणि वैदर्भीय माणूस यासारख्या अनेक विषयांना कवितेतून हात घातला.तुह्यं तू पाय मी माह्यावालं पायतो,आता तू काड्या कर तुले उभ्यानंच जायतो,रोज कोरू कोरू लेका लंबा केला धुरा,बोलत नाही म्हणून फायदा घेतं पुरा,जेवढी हाय जमीन तेव्हडी इमानदारीनं वायतो,आता तू काड्या कर तुले उभ्यानंच जायतोभाऊबंदकीचा व्यवहार सांगणारी ही कविता आठमुर्डीतील नीलेश तुरके या नवोदित कवीने सादर करताच हास्यकल्लोळ उडाला.गेले जमाने आंबे, चिचाचेबोरीच्या खाली बोरं वेचाचेकवा हुरडा तोंडाले पाणीभोंग्याले वाजे लग्नाचं गाणंमांडवासाठी भोकराचे पानंशेनाच गोंदन पुरनाची पोळीया नितीन देशमुखांच्या कवितेने ग्रामीण भागातील जीवन कसे बदलत चालले आहे याचे वर्णन केले. अनेकांना पूर्वीच्या काळातील इतिहासात नेण्याचे काम या कवितेने केले. ‘वान्नेरतोंडे’ या राजा धर्माधिकारी यांच्या कवितेने पाकिस्तानला उघडे पाडण्याचे काम केले.काय कामाच्या पार्ट्या,काय कामाचे पक्षदेश पेटला तरीखुर्च्याकडेच लक्षकुनी दाखवते नेहरूकुनी दाखवते गांधी,दाखवते केसर आणिहाती देते गेरूया कवितेमधून पाकिस्तानी कारवाया आणि त्याचा उद्रेक मांडण्याचा प्रयत्न केला. या कवितेला ‘वन्स मोअर’ मिळाला. पुसदचे दीपक आसेगावकर यांनी कापूस आणि सरकीच्या रूपात बहरणारे अजरामर प्रेम ही कविता सादर केली.यावेळी सुरेश गांजरे, राजा धर्माधिकारी, आशा आसुटकर, रमेश घोडे, विष्णू सोळंके, अलका तालणकर, सुनिता पखाले, बसवेश्वर माहूलकर, राजेश देवाळकर, विजय ढाले, डॉ. मार्तंड खुपसे, आंबादास घुले, ऋतू खापर्डे, डॉ. गिरीष खारकर यांच्याही कविता गाजल्या. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. शांतरक्षित गावंडे आणि डॉ. स्वप्नील मानकर यांनी केले.मिर्झांच्या कवितेने हास्यकल्लोळमिर्झा रफी अहेमद बेग यांनी सादर केलेल्या कवितेने माहोल केला. ‘शेतकऱ्यांनो आता घेवू नका फाशी’ ही कविता त्यांनी सादर केली. ‘शेतकऱ्यांवर प्रसंग फुटाने फाकाचे, अमीताब घालतो ३ लाखाचा गॉगल’ अशी गमतीदार रचना सादर करून त्यांनी अनेकांना विचार करण्यास भाग पाडले. याचवेळी माय मराठीचे गुणगान सांगणारी कविताही सादर केली. तर मिरा ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय कवितेमध्ये ‘असा वऱ्हाडी माणूस, कुदळ पावडे त्याचा साज’ ही भारदस्त कविता सादर केली.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन