शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

वºहाडी बोली कविसंमेलन : हसता-हसता केले रसिकांना अंतर्मुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:39 IST

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : पिलू ठेवून खोप्यात चिऊ हिंडते चाऱ्याले गोठ्यामंदे काळी ...

ठळक मुद्देमाय असावी साऱ्याले

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) :पिलू ठेवून खोप्यातचिऊ हिंडते चाऱ्यालेगोठ्यामंदे काळी गायकशी चारे वासरालेहे पाहून वाटतेमाय असावी साऱ्यालेकवी जयंत चावरे यांनी सादर केलेली ‘माय’ कविता वऱ्हाडी बोली कविसंमेलनात सर्वाधिक भाव खाऊन गेली. चावरे यांनी आपल्या स्वरात ही कविता सादर केली. या कवितेने अनेकांच्या डोळ्यांना धारा लागल्या. माय म्हणजे काय, मायचे महती जयंत चावरे यांनी वऱ्हाडी बोलीतून मांडली.शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर, प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर शनिवारी सायंकाळी वऱ्हाडी बोली कविसंमेलन झाले. यावेळी नवोदित आणि गाजलेल्या कवींच्या कविता सादर करण्यात आल्या. शेतकरी, गावाकडच्या जुन्या परंपरा, आई, देश, कपाशी, भाऊबंदकी, कष्टकरी आणि वैदर्भीय माणूस यासारख्या अनेक विषयांना कवितेतून हात घातला.तुह्यं तू पाय मी माह्यावालं पायतो,आता तू काड्या कर तुले उभ्यानंच जायतो,रोज कोरू कोरू लेका लंबा केला धुरा,बोलत नाही म्हणून फायदा घेतं पुरा,जेवढी हाय जमीन तेव्हडी इमानदारीनं वायतो,आता तू काड्या कर तुले उभ्यानंच जायतोभाऊबंदकीचा व्यवहार सांगणारी ही कविता आठमुर्डीतील नीलेश तुरके या नवोदित कवीने सादर करताच हास्यकल्लोळ उडाला.गेले जमाने आंबे, चिचाचेबोरीच्या खाली बोरं वेचाचेकवा हुरडा तोंडाले पाणीभोंग्याले वाजे लग्नाचं गाणंमांडवासाठी भोकराचे पानंशेनाच गोंदन पुरनाची पोळीया नितीन देशमुखांच्या कवितेने ग्रामीण भागातील जीवन कसे बदलत चालले आहे याचे वर्णन केले. अनेकांना पूर्वीच्या काळातील इतिहासात नेण्याचे काम या कवितेने केले. ‘वान्नेरतोंडे’ या राजा धर्माधिकारी यांच्या कवितेने पाकिस्तानला उघडे पाडण्याचे काम केले.काय कामाच्या पार्ट्या,काय कामाचे पक्षदेश पेटला तरीखुर्च्याकडेच लक्षकुनी दाखवते नेहरूकुनी दाखवते गांधी,दाखवते केसर आणिहाती देते गेरूया कवितेमधून पाकिस्तानी कारवाया आणि त्याचा उद्रेक मांडण्याचा प्रयत्न केला. या कवितेला ‘वन्स मोअर’ मिळाला. पुसदचे दीपक आसेगावकर यांनी कापूस आणि सरकीच्या रूपात बहरणारे अजरामर प्रेम ही कविता सादर केली.यावेळी सुरेश गांजरे, राजा धर्माधिकारी, आशा आसुटकर, रमेश घोडे, विष्णू सोळंके, अलका तालणकर, सुनिता पखाले, बसवेश्वर माहूलकर, राजेश देवाळकर, विजय ढाले, डॉ. मार्तंड खुपसे, आंबादास घुले, ऋतू खापर्डे, डॉ. गिरीष खारकर यांच्याही कविता गाजल्या. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. शांतरक्षित गावंडे आणि डॉ. स्वप्नील मानकर यांनी केले.मिर्झांच्या कवितेने हास्यकल्लोळमिर्झा रफी अहेमद बेग यांनी सादर केलेल्या कवितेने माहोल केला. ‘शेतकऱ्यांनो आता घेवू नका फाशी’ ही कविता त्यांनी सादर केली. ‘शेतकऱ्यांवर प्रसंग फुटाने फाकाचे, अमीताब घालतो ३ लाखाचा गॉगल’ अशी गमतीदार रचना सादर करून त्यांनी अनेकांना विचार करण्यास भाग पाडले. याचवेळी माय मराठीचे गुणगान सांगणारी कविताही सादर केली. तर मिरा ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय कवितेमध्ये ‘असा वऱ्हाडी माणूस, कुदळ पावडे त्याचा साज’ ही भारदस्त कविता सादर केली.

 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन