शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

हेमाडपंथी वास्तूकलेचा प्राचीन वारसा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 22:02 IST

प्राचीन वास्तूकलेचा अद्भुत वारसा जपणाऱ्या हेमाडपंथी मंदिरांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. बहुतांश हेमाडपंथी शिवालयांमध्ये श्रावण मासात भाविक आस्थेने गर्दी करीत असले तरी या मंदिरांच्या दुरवस्थेकडे पुरातत्व विभागाने सपशेल दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देमंदिरांना तडे : पुरातत्व विभागाचे केवळ फलक, डागडुजीकडे दुुर्लक्ष

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्राचीन वास्तूकलेचा अद्भुत वारसा जपणाऱ्या हेमाडपंथी मंदिरांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. बहुतांश हेमाडपंथी शिवालयांमध्ये श्रावण मासात भाविक आस्थेने गर्दी करीत असले तरी या मंदिरांच्या दुरवस्थेकडे पुरातत्व विभागाने सपशेल दुर्लक्ष केले आहे. भाविकांच्या भावना जुळलेल्या मंदिरांचे अस्तित्व लयाला जाण्याचा धोका असतानाही पुरातत्व खात्याचा केवळ अधिकार गाजविणारा फलक मंदिरांपुढे मिरवत आहे. परंतु तडे गेलेल्या, खांब कलथून पडलेल्या मंदिरांची डागडुजी करण्यासाठी प्रशासनाला फुरसद नाही.विदर्भातील ९३ देखण्या हेमाडपंथी मंदिरांची गॅजेटमध्ये नोंद आहे. त्यातील ७ मंदिरे यवतमाळ जिल्ह्यात आहेत. नोंद नसलेल्या मंदिरांची संख्या विदर्भात २०० आहे. पुरातत्व विभागाने ताब्यात घेतलेल्या अनेक मंदिरांची पडझड सुरू झाली आहे. बाराव्या शतकात औरंगाबादजवळील देवगिरीचे राजे रामदेवराय यादव यांचे प्रधान हेमाद्रीपंत यांनी ही मंदिरे उभारली. या सर्व हेमाडपंथी मंदिरांची रचना एकसारखी आहे. काळेशार चिरेदार दगड एकावर एक रचून विशिष्ट पद्धतीने ते एकत्र जुळविण्यात आले आहे. या दगडांवर नक्षीकाम आहे. मंदिरांना आतून सुशोभित करण्यात आले आहे. शिखरामध्ये तप करण्यासाठी खोल्या उभारण्यात आल्या आहेत. नदी, संगम आणि कुंड आदींच्या शेजारी ही मंदिर आहेत.पूर्वी अतिशय घनदाट जंगलात ही मंदिरे होती. आता या ठिकाणी जंगल विरळ झाले. मात्र चांगल्या पायवाटाही राहिल्या नाही. पुरातत्व विभागाने मंदिरांपुढे आपल्या विभागाचे फलक लावले. मात्र पुरातत्व विभाग या मंदिराची देखभाल करण्यास विसरले आहे.मंदिरांचे दगड काही ठिकाणी सरकले आहेत. गाभाºयात पाणी गळत आहे. अनेक ठिकाणी तडे गेले. काही भागात कुंडांची पडझड झाली आहे. यामुळे सुरेख मंदिरांचा वारसा येणाºया पिढीला कसा दिसेल, हा प्रश्न आहे. पुरातत्व विभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.पुरातत्व विभागाच्या यादीतील मंदिरेपुरातत्व विभागाने जिल्ह्यातील सात हेमाडपंथी मंदिरे ताब्यात घेतली आहे. यामध्ये दारव्हा तालुक्यातील तपोनेश्वर, महागाव कसबा, राऊत सावंगी, येळाबारा, पांढरदेवी, रूईवाई आणि नेरमधील सोमेश्वर मंदिर यांची नोंद आहे. या मंदिरांची अवस्था बिकट आहे. तपोनेश्वर मंदिरात कळसावरून पाणी गळत आहे. दगडही सरकत आहेत. पांढरदेवी मंदिर, नेरच्या सोमेश्वर मंदिराचीही अशीच अवस्था आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या इतर मंदिरांचीही दैनावस्था आहे. दगडांची पडझड आणि कुंडांची पडझड पाहायला मिळते.

पुरातत्व विभागाकडे ताबा असलेल्या मंदिरात इतरांना हस्तक्षेप करता येत नाही. परंतु त्यांना त्यांच्या स्तरावर दुरूस्ती करता येते. त्या दृष्टीने उपाययोजना कराव्या. मंदिरांचे वास्तूशिल्प जपावे.- ज्ञानेश्वर महल्लेविश्वस्त, तपोनेश्वर संस्थान

टॅग्स :Templeमंदिर