शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

संरक्षित वनक्षेत्रात नांगर

By admin | Updated: December 9, 2014 22:57 IST

एरव्ही सामान्य माणसाने जंगलात प्रवेश केला तरी त्याला नियम सांगणाऱ्या वन अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने यवतमाळ वनवृत्तात शेकडो हेक्टर वन जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण करण्यात आले आहे.

वनप्रशासन मेहेरबान : शेकडो हेक्टर जंगलात अतिक्रमणयवतमाळ : एरव्ही सामान्य माणसाने जंगलात प्रवेश केला तरी त्याला नियम सांगणाऱ्या वन अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने यवतमाळ वनवृत्तात शेकडो हेक्टर वन जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणासाठी आधी सागवान व आडजात वृक्षांच्या हजारो झाडांची राजरोसपणे कत्तलही करण्यात आली आहे. वन अधिकाऱ्यांच्या साक्षीने सुरू असलेला हा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. यवतमाळ वनवृत्तांतर्गत अकोला, पुसद, यवतमाळ व पांढरकवडा हे चार वन विभाग आहेत. त्याअंतर्गत ३१ वनपरिक्षेत्र, १११ वनवर्तूळ आणि ५५९ बीट आहेत. त्यापैकी २५ टक्के बीटमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे. यवतमाळ वनवृत्ताचे क्षेत्र २ लाख ९२ हजार ८४९.९५ हेक्टर एवढे आहे. वनाचे कायदे कठोर आहेत. संरक्षित वन क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल तरी संबंधित वन विभाग प्रमुखांची पूर्व परवानगी घ्यावी लागते. वन खात्याच्या परवानगीशिवाय जंगलांमध्ये मानवी प्रवेश होऊ शकत नाही. तसा प्रयत्न झाल्यास भारतीय वन अधिनियमानुसार कारवाई होते. वन खात्याचे अधिकारी सामान्य माणसाला या अधिनियमातील तरतुदीचे वेळोवेळी स्मरण करून देताना दिसतात. तर दुसरीकडे याच वन अधिकाऱ्यांच्या डोळ्यात देखत चक्क संरक्षित वन क्षेत्रात शेकडो हेक्टरमध्ये शेतीसाठी अतिक्रमण केले जात असल्याची अनेक प्रकरणे वनवृत्तात पहायला मिळतात. त्यात सर्वाधिक अतिक्रमण हे पांढकवडा आणि यवतमाळ वन विभागात असल्याची माहिती आहे. त्यातही जोडमोहा, वडगाव व घाटंजी वनपरिक्षेत्रात हे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहेत. जंगलांना लागून अनेक गावे, वस्त्या आहेत. याच वस्त्यांमधील लोक वनांमध्ये अतिक्रमण करीत आहे. या अतिक्रमणासाठी आधी या जंगलातील सागवान व आडजात वृक्षांची अनधिकृतरीत्या तोड केली जाते. त्यानंतर त्या जमिनीवर वखर, नांगर फिरवून बियाण्यांची पेरणी केली जाते. शासनाच्या या जमिनीवर कृषी उत्पन्न घेण्याचा सपाटा वन वृत्तात सुरू आहे. मात्र त्याला वन विभागाकडून कोणतीही आडकाठी केली जात नाही. पाहता पाहता शेकडो हेक्टर जंगल अतिक्रमणधारकांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. वनवृत्तात सुमारे दहा टक्के क्षेत्र अतिक्रमणधारकांच्या घशात अडकल्याचे सांगितले जाते. जोडमोहा वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. २४५, ३६५, ३६८, ३२६ यामध्ये शेकडो हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण केले गेले आहे. वडगाव व आर्णी वन परिक्षेत्रातही जंगल नष्ट करून अतिक्रमण झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)