शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
5
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
6
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
7
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
8
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
9
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
10
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
11
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
12
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
13
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
14
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
15
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
16
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
17
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
18
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
19
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
20
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?

संरक्षित वनक्षेत्रात नांगर

By admin | Updated: December 9, 2014 22:57 IST

एरव्ही सामान्य माणसाने जंगलात प्रवेश केला तरी त्याला नियम सांगणाऱ्या वन अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने यवतमाळ वनवृत्तात शेकडो हेक्टर वन जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण करण्यात आले आहे.

वनप्रशासन मेहेरबान : शेकडो हेक्टर जंगलात अतिक्रमणयवतमाळ : एरव्ही सामान्य माणसाने जंगलात प्रवेश केला तरी त्याला नियम सांगणाऱ्या वन अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने यवतमाळ वनवृत्तात शेकडो हेक्टर वन जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणासाठी आधी सागवान व आडजात वृक्षांच्या हजारो झाडांची राजरोसपणे कत्तलही करण्यात आली आहे. वन अधिकाऱ्यांच्या साक्षीने सुरू असलेला हा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. यवतमाळ वनवृत्तांतर्गत अकोला, पुसद, यवतमाळ व पांढरकवडा हे चार वन विभाग आहेत. त्याअंतर्गत ३१ वनपरिक्षेत्र, १११ वनवर्तूळ आणि ५५९ बीट आहेत. त्यापैकी २५ टक्के बीटमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे. यवतमाळ वनवृत्ताचे क्षेत्र २ लाख ९२ हजार ८४९.९५ हेक्टर एवढे आहे. वनाचे कायदे कठोर आहेत. संरक्षित वन क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल तरी संबंधित वन विभाग प्रमुखांची पूर्व परवानगी घ्यावी लागते. वन खात्याच्या परवानगीशिवाय जंगलांमध्ये मानवी प्रवेश होऊ शकत नाही. तसा प्रयत्न झाल्यास भारतीय वन अधिनियमानुसार कारवाई होते. वन खात्याचे अधिकारी सामान्य माणसाला या अधिनियमातील तरतुदीचे वेळोवेळी स्मरण करून देताना दिसतात. तर दुसरीकडे याच वन अधिकाऱ्यांच्या डोळ्यात देखत चक्क संरक्षित वन क्षेत्रात शेकडो हेक्टरमध्ये शेतीसाठी अतिक्रमण केले जात असल्याची अनेक प्रकरणे वनवृत्तात पहायला मिळतात. त्यात सर्वाधिक अतिक्रमण हे पांढकवडा आणि यवतमाळ वन विभागात असल्याची माहिती आहे. त्यातही जोडमोहा, वडगाव व घाटंजी वनपरिक्षेत्रात हे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहेत. जंगलांना लागून अनेक गावे, वस्त्या आहेत. याच वस्त्यांमधील लोक वनांमध्ये अतिक्रमण करीत आहे. या अतिक्रमणासाठी आधी या जंगलातील सागवान व आडजात वृक्षांची अनधिकृतरीत्या तोड केली जाते. त्यानंतर त्या जमिनीवर वखर, नांगर फिरवून बियाण्यांची पेरणी केली जाते. शासनाच्या या जमिनीवर कृषी उत्पन्न घेण्याचा सपाटा वन वृत्तात सुरू आहे. मात्र त्याला वन विभागाकडून कोणतीही आडकाठी केली जात नाही. पाहता पाहता शेकडो हेक्टर जंगल अतिक्रमणधारकांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. वनवृत्तात सुमारे दहा टक्के क्षेत्र अतिक्रमणधारकांच्या घशात अडकल्याचे सांगितले जाते. जोडमोहा वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. २४५, ३६५, ३६८, ३२६ यामध्ये शेकडो हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण केले गेले आहे. वडगाव व आर्णी वन परिक्षेत्रातही जंगल नष्ट करून अतिक्रमण झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)