शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’ पाणीपुरवठा योजना दोन महिन्यांत पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

फिल्टर प्लांटचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य तीन टाक्या बांधून पूर्ण झाल्या असून दोन टाक्यांची चाचणी यशस्वी झाली आहे. १६ टाक्यांचे कामही पूर्ण झाले आहे. शहरातील पाइपलाइनचे काम लवकरच होणार आहे. त्यासाठी तीन झोन तयार केले असून सध्या दोन झोनचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. यवतमाळकरांची या रखडलेल्या कामामुळे होणारी अडचण लक्षात घेऊन आता हा प्रकल्प मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, असे संदीपान भुमरे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहर पाणीपुरवठ्यासाठी राबविण्यात येत असलेली अमृत योजना चार वर्षांपासून रखडलेली आहे. या योजनेसाठी शहराच्या विविध भागांत खड्डे खोदले असून हे खड्डे शहरवासीयांच्या जीवावर उठले आहेत. नुकताच एका नागरिकाचा खड्ड्याने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पालकमंत्री संदीपान भुमरे यांना विचारले असता योजना रखडल्याचे मान्य करतानाच पुढील दोन महिन्यांत ही योजना पूर्ण करून दाखवू, असा शब्द त्यांनी दिला. योजनेच्या पूर्णत्वासाठी वाढीव मनुष्यबळासह यंत्रसामग्री पुरविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. फिल्टर प्लांटचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य तीन टाक्या बांधून पूर्ण झाल्या असून दोन टाक्यांची चाचणी यशस्वी झाली आहे. १६ टाक्यांचे कामही पूर्ण झाले आहे. शहरातील पाइपलाइनचे काम लवकरच होणार आहे. त्यासाठी तीन झोन तयार केले असून सध्या दोन झोनचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. यवतमाळकरांची या रखडलेल्या कामामुळे होणारी अडचण लक्षात घेऊन आता हा प्रकल्प मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, असे संदीपान भुमरे यांनी सांगितले.यवतमाळ नगर परिषदेचा प्रशासकीय कारभार पूर्णत: विस्कटला होता. यावर उपाय म्हणून कार्यक्षम मुख्याधिकारी तेथे नियुक्त केले आहे. लवकरच शहरातील स्वच्छतेसह पालिकेची इतर यंत्रणाही सुरळीत होईल, असे भुमरे यांनी सांगितले. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रस्त्यांची अवस्था गंभीर बनली आहे. ही बाब सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. रस्ते दुरुस्तीसह रखडलेल्या रस्त्यांची कामे व्हावी, यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले. 

वरिष्ठ घेणार आघाडीचा निर्णय- जिल्ह्यातील नगर परिषदा, नगर पंचायती यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या संभाव्य निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र लढविणार काय, याबाबत विचारणा केली असता हा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील, असे भुमरे यांनी सांगितले. हा निर्णय घेताना शक्यतांची पडताळणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

मजीप्राच्या यंत्रणेकडे लक्ष- बेंबळा पाणीपुरवठा योजनेचे काम सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी कंत्राटदाराच्याच दावणीला आहे. आता पालकमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर मजीप्राची यंत्रणा किती कार्यतत्पर होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.  

 

टॅग्स :Waterपाणी