शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

आंबेडकर भवन, नाईक प्रतिष्ठान, शादीखानाचे बांधकाम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 22:17 IST

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे प्रतिष्ठान, गहुली येथील स्मारक, रहेमतनगर येथील शादीखाना ही तीनही प्रमुख बांधकामे अर्धवट आहेत.

ठळक मुद्देपुसद तालुका : आमदार नीलय नाईकांना रिपाइंचे साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे प्रतिष्ठान, गहुली येथील स्मारक, रहेमतनगर येथील शादीखाना ही तीनही प्रमुख बांधकामे अर्धवट आहेत. ही कामे त्वरित पूर्ण व्हावी, यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या (ए) कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपाचे नवनियुक्त आमदार अ‍ॅड. नीलय नाईक यांना साकडे घातले.तीनही बांधकामे अर्धवट स्थितीत असल्याने समाजात कशी नाराजी आहे, याची जाणीव रिपाइंचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर (दिग्रस) यांच्या नेतृत्वातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भाजपा नेते आमदार नाईक यांना करुन दिली. या कामांमध्ये अनेक ठिकाणी भ्रष्टाचार असून त्याच्या चौकशीची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पुसदच्या संभाजीनगरात डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचे भवन उभारले जात आहे. मात्र गेल्या १५ वर्षांपासून ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे ही वास्तू समाजोपयोगी ठरलेली नाही. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडून पुसद नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती. त्यांनी निधी देण्यास तयारीही दर्शविली होती. मात्र स्थानिक राजकारण आडवे आल्याने निधी घेण्यास व सहकार्य करण्यास अनुकुलता दर्शविली गेली नाही. त्यामुळे ही वास्तू अपूर्ण असल्याचे कार्यकर्त्यांनी नीलय नाईक यांना सांगितले गेले.त्याच प्रमाणे हरितक्रांतीच प्रणेते वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुसद व त्यांचे मूळ गाव गहुली येथील स्मारकासाठी २०१३ मध्ये प्रशासकीय मान्यता देऊन एकरकमी १२ कोटींचा निधी प्राप्त झाला. मात्र निविदा प्रक्रियेनंतर साडेतीन वर्षांपासून बांधकाम अपूर्ण असल्याने या वास्तूचे हस्तांतरण झाले नाही. पर्यायाने त्याचा समाजासाठी उपयोग होऊ शकलेला नाही. कार्यकर्त्यांनी या कामाची पाहणी केली असता अंदाजपत्रकात तरतूद असूनही संरक्षक भिंत, लिफ्ट दिसून आली नाही. बाहेरील लॉन, झाडे खराब झाले असून त्यावर गाजर गवत, तरोटा उगविल्याचे चित्र पहायला मिळाले. या वास्तू परिसराचा प्रातविधीसाठीही वापर केला जात असल्याचे सांगितले गेले.सुशोभीकरणासाठी वापरल्या गेलेल्या पेवर ब्लॉकचा दर्जा संशयास्पद आहे. ते ठिसूळ असून त्याला कलर नसल्याचे दिसून आले. मुख्य इमारतीच्या आजूबाजूची अनेक कामे बाकी आहेत. मुख्य दरवाजाजवळ चिखल आढळून आला. या इमारतीच्या आतील भागातसुद्धा बांधकामात अनेक उणीवा असण्याची शक्यता या कार्यकर्त्यांनी निलय नाईकांकडे बोलून दाखविली.उपरोक्त दोन प्रमुख कामांप्रमाणेच पुसदच्या रहेमतनगर येथील वसंतनगरच्या शेजारी असलेल्या शादीखाना इमारतीचे बांधकाम दहा वर्षांपासून प्रलंबित आहे.मुस्लीम समाजातील गोरगरीबांना या शादीखानाच्या इमारतीची आवश्यकता आहे. मात्र इमारतच अपूर्ण असल्याने लग्न व सामाजिक कार्यासाठी इतरत्र धाव घ्यावी लागते. त्याचा मोठा आर्थिक बोझाही सहन करावा लागतो. तरी जातीने लक्ष देऊन उपरोक्त तीनही सामाजिक आवश्यकतेची कामे तातडीने पूर्ण करून घ्यावी, अशी मागणी रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे आमदार अ‍ॅडनीलय नाईक यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर रिपाइंचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, बाळासाहेब वाठोरे, लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले, गौतम रणवीर, प्रकाश खंडागळे, अनिल जाधव, समाधान आडे, सीताराम चव्हाण, सुनील राठोड, रवी राठोड, रोशन जमीर, मो.सोहील, अमजद खान, तमीजोद्दीन मो. अफसर आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरVasantrao Naikवसंतराव नाईक