शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा झाल्या रद्द, तरी खेड्यापाड्यातील विद्यार्थी मात्र अभ्यासात मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या घरच्या घरीच अभ्यास व्हावा यासाठी व्हाॅटस्‌अपवर अभ्यासमाला पाठविली जात आहे. त्यात विद्यार्थ्यांना शाळेच्या यू-डायस क्रमांकासह नोंदणी करून प्रश्न सोडवावे लागतात. उपक्रमाच्या १९ व्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ५४ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमात नोंदणी केली होती.

ठळक मुद्दे‘स्वाध्याय’मध्ये १३ व्या क्रमांकावर भरारी : आठवडाभरात वाढले दीड लाख विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे शाळा बंद असूनही व्हाॅटस्अपद्वारे शिक्षण विभागाने स्वाध्याय उपक्रम सुरू केला आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील अत्यल्प विद्यार्थ्यांचा प्रतिसाद होता. त्यामुळे राज्यात यवतमाळचा क्रमांक शेवटी होता. मात्र गेल्या अवघ्या आठवडाभरात जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांनी स्वाध्याय मालिकेत सहभाग नोंदवून जिल्ह्याला १३ व्या क्रमांकावर विराजमान केले आहे.  विशेष म्हणजे पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द झाल्या आहे. तरीही खेड्यापाड्यातील विद्यार्थी दररोज मन लावून स्वाध्याय सोडवित आहे. पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या घरच्या घरीच अभ्यास व्हावा यासाठी व्हाॅटस्‌अपवर अभ्यासमाला पाठविली जात आहे. त्यात विद्यार्थ्यांना शाळेच्या यू-डायस क्रमांकासह नोंदणी करून प्रश्न सोडवावे लागतात. उपक्रमाच्या १९ व्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ५४ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमात नोंदणी केली होती. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळचा क्रमांक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या यादीत शेवटी होता. मात्र २० व्या आठवड्यात शिक्षण विभागाने सर्व संबंधित यंत्रणेच्या बैठका घेऊन विद्यार्थी सहभाग वाढविला. त्यातून तब्बल एक लाख ३४ हजार १९६ विद्यार्थ्यांनी स्वाध्यायसाठी नोंदणी करून एक लाख ३० हजार ३३९ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय यशस्वीपणे पूर्ण केला. त्यामुळे जिल्ह्याचा क्रमांक ३६ वरून थेट १३ असा वर चढला आहे. सध्या शुक्रवारपासून २१ व्या आठवड्याचा स्वाध्याय सोडविणे सुरू झाले असून प्रतिसाद वाढत आहे. रविवारपर्यंत ५६ हजार ६९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी करून ५७ हजार २४ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय पूर्ण केला. विशेष म्हणजे दर दोन तासांनी हा आकडा वाढत आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा होणार नसल्यातरी स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शिक्षण विभागाला परीक्षेशिवायही शक्य होणार आहे. 

सुरुवातीला जाणीवजागृती नसल्याने स्वाध्याय उपक्रमात विद्यार्थी सहभाग कमी होता. मात्र मागील आठवड्यापासून सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, साधन व्यक्ती यांच्या झूम मिटींग पंचायत समितीनिहाय तसेच केंद्रनिहाय घेतल्या. आता सहभाग वाढत आहे.- प्रमाेद सूर्यवंशीशिक्षणाधिकारी, यवतमाळ.

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा एप्रिलच्या शेवटी दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. यंदा कोरोनामुळे शाळेत फारसा अभ्यास करता न आलेल्या विद्यार्थ्यांना घर बसल्या स्वाध्याय मालिकेमुळे अभ्यास ‘पक्का’ करण्यास हातभार लागत आहे. मध्यंतरी नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीमध्ये काही दिवस वर्ग भरले होते. तेव्हाचे मार्गदर्शन लक्षात ठेवून आता मोबाईलवर येणारे प्रश्नसंच सोडवून परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना उजळणी करता येत आहे. त्यामुळेच या आठवड्यात स्वाध्याय उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 

 

टॅग्स :Schoolशाळाexamपरीक्षा