शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

कपाशीच्या फुलांवर अळ्यांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:45 IST

गतवर्षीपासून बीटी कपाशीवर अळ्यांचे आक्रमण वाढले आहे. एवढेच नाही तर, यावर्षी कपाशीच्या बहुतांश फुलावर अळ्यांचा पादुर्भाव आढळून येत आहे. बोंडअळीच्या संकेतामुळे शेतकरी वर्गामध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबोंडअळीची भीती : कळंब तालुक्यातील शेतकरी चिंतेत, कृषीच्या मार्गदर्शनाची गरज

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गतवर्षीपासून बीटी कपाशीवर अळ्यांचे आक्रमण वाढले आहे. एवढेच नाही तर, यावर्षी कपाशीच्या बहुतांश फुलावर अळ्यांचा पादुर्भाव आढळून येत आहे. बोंडअळीच्या संकेतामुळे शेतकरी वर्गामध्ये धास्ती निर्माण झाली आहे.बीटी कपाशीवर कुठलीही अळी येणार नाही, असा दावा कंपन्यांकडून केला गेला. मागील वर्षी हा दावा फोल ठरला. त्यामुळे अनेकांच्या शेतीची वाताहत झाली. परंतु कपाशीला सक्षम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी पुन्हा यावर्षी कपाशीची लागवड केली. नाही म्हटले तरी प्रत्येक कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीची धाकधुक होतीच. ती आता खरी ठरायला लागली आहे. अनेकांच्या शेतातील कपाशी फुलावर आली. या फुलात अळी आढळून येत आहे. हीच अळी बोंडामध्ये प्रवेश करुन पूर्ण बोंड खराब करते, याचा मागील वर्षी अनुभव आलेला आहे.बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळे व प्रकाश सापळे (लाईट स्ट्रॅप) लावण्याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी ही उपाययोजना अंमलात आणली. परंतु या प्रयोगामुळे बोंडाची अळी पूर्णत: आटोक्यात येईल, अशी स्थिती नाही. कारण बहुतांश फुलात अळीचा पादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय पातळीवरुन अळीला आटोक्यात आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन औषधांची गरज आहे. कपाशीवर बोंडअळीचे प्रमाण अधिक वाढण्यापूर्वी या उपाययोजना आवश्यक आहे.शेतकरी दशोधडीला लागणार - आनंदराव जगतापयावर्षीही फुलावर अळी आली. हीच अळी बोंडात जाते. माझ्या शेतात सर्व उपाययोजना करुनही अळी आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे अळीच येणार नाही, असे संशोधन करुन बियाणे निर्माण करणे गरजेचे आहे. नाही तर शेतकरी वर्ग दशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती परसोडीचे सरपंच तथा प्रगतिशील शेतकरी आनंदराव जगताप यांनी दिली.शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरुच- कृषी अधिकारीअळीला अटकाव करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळत आहे. अळीला नष्ट करण्यासाठी निंबोळी अर्काचा फवारा मारण्याचा सल्ला देण्यात येत आहे, अशी माहीती पंचायत समितीचे कृषी अधिकारी किशोर अंबरकर यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती