शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या फुलांवर अळ्यांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 22:45 IST

गतवर्षीपासून बीटी कपाशीवर अळ्यांचे आक्रमण वाढले आहे. एवढेच नाही तर, यावर्षी कपाशीच्या बहुतांश फुलावर अळ्यांचा पादुर्भाव आढळून येत आहे. बोंडअळीच्या संकेतामुळे शेतकरी वर्गामध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबोंडअळीची भीती : कळंब तालुक्यातील शेतकरी चिंतेत, कृषीच्या मार्गदर्शनाची गरज

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गतवर्षीपासून बीटी कपाशीवर अळ्यांचे आक्रमण वाढले आहे. एवढेच नाही तर, यावर्षी कपाशीच्या बहुतांश फुलावर अळ्यांचा पादुर्भाव आढळून येत आहे. बोंडअळीच्या संकेतामुळे शेतकरी वर्गामध्ये धास्ती निर्माण झाली आहे.बीटी कपाशीवर कुठलीही अळी येणार नाही, असा दावा कंपन्यांकडून केला गेला. मागील वर्षी हा दावा फोल ठरला. त्यामुळे अनेकांच्या शेतीची वाताहत झाली. परंतु कपाशीला सक्षम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी पुन्हा यावर्षी कपाशीची लागवड केली. नाही म्हटले तरी प्रत्येक कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीची धाकधुक होतीच. ती आता खरी ठरायला लागली आहे. अनेकांच्या शेतातील कपाशी फुलावर आली. या फुलात अळी आढळून येत आहे. हीच अळी बोंडामध्ये प्रवेश करुन पूर्ण बोंड खराब करते, याचा मागील वर्षी अनुभव आलेला आहे.बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळे व प्रकाश सापळे (लाईट स्ट्रॅप) लावण्याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी ही उपाययोजना अंमलात आणली. परंतु या प्रयोगामुळे बोंडाची अळी पूर्णत: आटोक्यात येईल, अशी स्थिती नाही. कारण बहुतांश फुलात अळीचा पादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय पातळीवरुन अळीला आटोक्यात आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन औषधांची गरज आहे. कपाशीवर बोंडअळीचे प्रमाण अधिक वाढण्यापूर्वी या उपाययोजना आवश्यक आहे.शेतकरी दशोधडीला लागणार - आनंदराव जगतापयावर्षीही फुलावर अळी आली. हीच अळी बोंडात जाते. माझ्या शेतात सर्व उपाययोजना करुनही अळी आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे अळीच येणार नाही, असे संशोधन करुन बियाणे निर्माण करणे गरजेचे आहे. नाही तर शेतकरी वर्ग दशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती परसोडीचे सरपंच तथा प्रगतिशील शेतकरी आनंदराव जगताप यांनी दिली.शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरुच- कृषी अधिकारीअळीला अटकाव करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळत आहे. अळीला नष्ट करण्यासाठी निंबोळी अर्काचा फवारा मारण्याचा सल्ला देण्यात येत आहे, अशी माहीती पंचायत समितीचे कृषी अधिकारी किशोर अंबरकर यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती