शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

मतविभाजन टाळण्यासाठी युती अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:26 IST

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने राज्यातील ४८ मतदारसंघात संघटन मजबूत केले आहे. याचा फायदा मित्र पक्षालाही होणार आहे. मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षासोबतची युती अटळ आहे, ......

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : भाजपाच्या संघटनात्मक बांधणीचा मित्र पक्षालाही फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने राज्यातील ४८ मतदारसंघात संघटन मजबूत केले आहे. याचा फायदा मित्र पक्षालाही होणार आहे. मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षासोबतची युती अटळ आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी रविवारी सायंकाळी येथे झालेल्या पत्रपरिषदेत दिली.भाजपा मागील चार वर्षात केलेल्या विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढविणार आहे. वेगळ््या विदर्भ राज्याच्या मागणीचे भाजपाने नेहमीच समर्थन केले आहे. मात्र निवडणुका डोळ््यासमोर ठेवून विभाजन करता येणार नसल्याचेही खासदार रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले. २०१४ च्या लोकसभेत भाजपाचा विजय हा लाटेमुळे झाल्याचा खुलासा पराभूत काँग्रेसने केला होता. विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत या सर्वच निवडणुकीत काँग्रेस पराभूत झाली.राज्यातील ८१ नगरपरिषद, १५ महानगरपालिका, १२ जिल्हा परिषद आणि पाच हजार ग्रामपंचायतीचे सरपंच भाजपाचे आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी ९२ हजार बुथपैकी ८८ हजार बुथवर भाजपा पोहोचली आहे. येथे वन बुथ २५ युथ संकल्पना राबविली जात आहे. प्रत्येक बुथवर किमान १२ कुटुंब जोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी यांचे मतदान सकाळी १० पर्यंतच करून घेण्याच्याही सूचना आहेत. याचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत असल्याचे खासदार दानवे यांनी याप्रसंगी सांगितले. पक्ष संघटना मजबूत केल्या तरच निवडणूक जिंकता येते. नशिबावर निवडणूक जिंकण्याचे दिवस गेल्याचेही दानवे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पत्रकारांपुढे विविध विषय मांडले.पत्रपरिषदेला भाजपाचे राज्य सरचिटणीस आमदार डॉ. रामदास आंबटकर, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी मंत्री संजय देशमुख यावेळी उपस्थित होते.प्रेमासाईला ओळखत नाहीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रेमासाई यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. यावर रावसाहेब दानवे म्हणाले, देशात एकही उमेदवारी निश्चित नाही. राज्य आणि केंद्रातील पार्लमेंट्री बोर्डाकडूनच उमेदवारी निश्चित केली जाते. प्रेमासाई ही कोण व्यक्ती आहे, तिला मी ओळखत नसल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवे