शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

आत्महत्यांबाबत युती सरकार उदासीन

By admin | Updated: December 25, 2014 23:38 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकार दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांबाबत उदासीन असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

यवतमाळ : राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकार दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांबाबत उदासीन असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील देवदर्शनासाठी माहूरला गेले होते. तेथून परतल्यानंतर शासकीय विश्रामभवनावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात गारपीट झाली, मराठवाड्यातील पीक परिस्थिती समाधानकारक नाही, विदर्भातील शेती व पिके मातीमोल झाले आहे. असे असताना शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्रात भाजपाचे सरकार असूनही भरीव मदत दिली नाही. त्यामुळे आता शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. शासनाची ही उदासीनता जनतेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना भरीव मदतीकरिता बाध्य करण्यासाठी काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे ते म्हणाले. विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. त्यावरही विखे पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले, युती सरकारने घाईने अधिवेशन संपविले. एक महिना अधिवेशन चालविण्याची आमची इच्छा होती. मात्र सरकारने अल्पावधीत ते गुंडाळले. यावरून सामान्यांच्या प्रश्नावर युती सरकार गंभीर नसल्याचे दिसून येते. सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढू शकतात, असा आरोपही विखे पाटील यांनी केला. तत्पूर्वी त्यांनी येथे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, विजयाताई धोटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)