शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
5
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
6
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
7
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
8
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
9
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
10
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
11
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
12
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
13
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
14
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
15
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
16
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
17
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
18
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
19
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
20
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्यांबाबत युती सरकार उदासीन

By admin | Updated: December 25, 2014 23:38 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकार दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांबाबत उदासीन असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

यवतमाळ : राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकार दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांबाबत उदासीन असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. विखे पाटील देवदर्शनासाठी माहूरला गेले होते. तेथून परतल्यानंतर शासकीय विश्रामभवनावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात गारपीट झाली, मराठवाड्यातील पीक परिस्थिती समाधानकारक नाही, विदर्भातील शेती व पिके मातीमोल झाले आहे. असे असताना शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्रात भाजपाचे सरकार असूनही भरीव मदत दिली नाही. त्यामुळे आता शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. शासनाची ही उदासीनता जनतेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना भरीव मदतीकरिता बाध्य करण्यासाठी काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे ते म्हणाले. विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. त्यावरही विखे पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले, युती सरकारने घाईने अधिवेशन संपविले. एक महिना अधिवेशन चालविण्याची आमची इच्छा होती. मात्र सरकारने अल्पावधीत ते गुंडाळले. यावरून सामान्यांच्या प्रश्नावर युती सरकार गंभीर नसल्याचे दिसून येते. सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढू शकतात, असा आरोपही विखे पाटील यांनी केला. तत्पूर्वी त्यांनी येथे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, विजयाताई धोटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)