शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवतंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या साहित्यालाही हवा गुणवत्तेचा निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:46 IST

नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साहित्यालाही गुणवत्तेचे निकष असायला पाहिजेत, अशी अपेक्षा डॉ. जयंत कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.

ठळक मुद्दे ‘नवतंत्रज्ञानाधारित साहित्याच्या नव्या वाटा’

स्नेहा मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्राच्या कक्षा अधिक रुंदावत आहेत, तंत्रज्ञानातील सृजनशीलतेचा वापर आपण केला पाहिजे मात्र तो करत असताना या नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या साहित्यालाही गुणवत्तेचे निकष असायला पाहिजेत, अशी अपेक्षा डॉ. जयंत कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी दुपारी ‘नवतंत्रज्ञानाधारित साहित्याच्या नव्या वाटा’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी, मोहिनी मोडक, प्रा. क्षितीज पाटुकले उपस्थित होते. याप्रसंगी, प्रा.क्षितीज पाटुकले म्हणाले की, आपल्या साहित्याला प्राध्यापकीय धाटणीतून बाहेर काढण्याचे काम तंत्रज्ञान करत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाला शस्त्र मानून सर्वच क्षेत्रात त्याचा वापर केला पाहिजे. एकीकडे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जागतिक पातळीवर प्रकाशन संस्था कोसळत आहेत, अशी ओरड होत आहे. मात्र या क्षेत्राचा सकारात्मक पद्धतीने विचार आणि अवलंबन केले पाहिजे. साहित्यिक आणि प्रकाशक ही यातील संवादाची दरी दूर करण्यासाठी साहित्यिकाने अद्ययावत झाले पाहिजे. साहित्यिकांनी आपले साहित्य ‘रेडी टू प्रिंट’ स्वरुपात प्रकाशकाकडे नेले पाहिजे, जेणेकरुन प्रकाशकावरील भारही कमी होईल आणि साहित्यिकाकडे आपले साहित्य ई- माध्यमात उपलब्ध होईल. अजूनही आपल्याकडे साहित्यविश्वातील तंत्रज्ञान क्षेत्राच्या जाणिवेचा अभाव आहे, ही दुर्दैवी बाब आहे. या उलट साहित्यिकांनी असा विचार केला पाहिजे की, तंत्रज्ञानामुळे साहित्यिक सक्तीने पर्यावरणस्नेही होईल ही स्वागर्ताह बाब आहे. पूर्वी कोणत्याही सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा कोणत्याही घटना, घडामोडींविषयी व्यक्त होण्याची जी भीती होती ती आता तंत्रज्ञानाने पुसून टाकली आहे. तसेच, वाचनसंस्कृतीच्या विस्तारासाठीही तंत्रज्ञान क्षेत्राच्या सहाय्याने अनेक प्रयत्न होत आहेत. एकंदरित, तंत्रज्ञान क्षेत्राविषयी नकारात्मक विचार न करता सकारात्मकतेचा विचार केला पाहिजे.

‘कॉपी पेस्ट’ साहित्यिकांची संख्या वाढतेययावेळी, मोहिनी मोडक म्हणाल्या की, कवितेतला ‘क’सुद्धा माहीत नसणारे कवी सध्या अरुणा ढेरे यांनी व्यक्त व्हावे की नाही याविषयी चर्चा करतात तेव्हा त्या व्यक्त होण्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. तंत्रज्ञानामुळे ‘कॉपी पेस्ट’ करणाºया साहित्यिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय, ही चिंतेची बाब आहे. इंग्रजी साहित्य क्षेत्राच्या तुलनेत मराठी साहित्य विश्वात अधिकाधिक डिजिटलायझेशन होण्याची गरज आहे. शिवाय, तंत्रज्ञान क्षेत्रात नवनवीन प्रयोग सातत्याने होत आहेत, त्याला वाचकांनीही प्रतिसाद दिला पाहिजे.चर्चेच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, तंत्रज्ञान आणि साहित्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नवनवीन प्रयोग होत आहेत, मात्र त्यात आपण बरेच मागे आहोत. चीन आणि जपानमध्ये एखाद्या रोबोच्या माध्यमातून सृजनशील साहित्य निर्माण करण्यापर्यंत मजल पोहोचली आहे. परंतु, आपल्याकडे मात्र अजून तरी साहित्य व लेखकांचे लिहिते होण्याचे काम त्यांच्या हातून जाणार नाही, अशीच परिस्थिती आहे. एकंदरित नवतंत्रज्ञान आणि साहित्य क्षेत्राचा माणूस हाच केंद्रबिंदू असावा.बहिष्कारामुळे केवळ तीनच वक्तेनयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीच्या मुद्द्यामुळे या चचेर्तील अतुल कहाते, बालाजी सुतार, डॉ.अजय देशपांडे, श्रीकांत बोजेवार, समन्वयक किरण येले हे अनुपस्थित होते. त्यामुळे केवळ तीन वक्त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले.युवापिढीने फिरवली पाठनवंतत्रज्ञानाधारित साहित्याच्या नव्या वाटा हा विषय तरुणपिढीशी संलग्न असल्याने या चर्चेला तरुण साहित्यप्रेमींनी आवर्जून हजेरी लावणे अपेक्षित होते. मात्र दुर्दैवाने युवापिढीने या चर्चेकडे पाठ फिरवल्याने केवळ जुन्या पिढीतील साहित्य रसिकांनी येथे उपस्थिती दर्शविली होती.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन