शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

बोथबोडन येथे हवा सिंचन प्रकल्प

By admin | Updated: July 18, 2015 02:15 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त बोथबोडन या गावात शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सिंचन प्रकल्प तयार करण्याची आवश्यकता असून गावकरी त्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे.

यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त बोथबोडन या गावात शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सिंचन प्रकल्प तयार करण्याची आवश्यकता असून गावकरी त्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. या प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात शेतजमीन गेलेल्या शेतकऱ्यांना अतिशय तोकडा मोबदला मिळाला. यामुळे गावाच्या स्मशानभूमी परिसरात प्रस्तावित असलेल्या प्रकल्पासाठी जमीन देण्यासाठी कुणीही तयार नाही. हे दोन प्रकल्प वेळेत पूर्ण केले तर बोथबोडनच्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज होणार आहे. तरच येथील आत्महत्याही थांबू शकते, असा आशावाद येथील ग्रामस्थांना आहे. बोथबोडन हे गाव २००७ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री मनीशंकर अय्यर यांच्या भेटीने चर्चेत आले. त्यानंतर श्रीश्री रविशंकर यांनी तब्बल १५ दिवस येथे योग शिबिर व श्रमदानाचे कार्यक्रम राबविले. प्रत्येकाच्या शेतात खड्डा खोदण्यात आला. काही मोजक्या शेतकऱ्यांनी या खड्ड्याला विहिरीत रुपांतर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्या व्यतिरिक्त या खड्ड्याचा कोणताही फायदा झाला नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. बोथबोडनमध्ये १८ जुलै २००८ रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट दिली. तेथूनच गावात मदतीचा ओघ सुरू झाला. गरज भासल्यास स्थानिक काँग्रेस आमदार व खासदारांशी संपर्क करण्यास त्यांनी सांगितले. शेतकरी विधवांशी चर्चा केली. त्यांच्याकडे स्वत:चा मोबाईल क्रमांक दिला. गावातील कॅन्सर रुग्ण सुरेश नानकचंद छत्ताणी यांनी मदतीसाठी कॉल केल्यानंतर राहुल गांधींकडून त्यांना उपचारासाठी मदतही मिळाली. याशिवाय नागपूर येथील सिन्हा, माथूर, कपूर या बड्या आसामींनी बोथबोडन येथे येऊन मदत केली. यावेळी गावातील दुफळीमुळे योग्य विकास आराखडा त्यांच्याकडे सादर करता आला नाही, अशी खंतही ग्रामस्थांकडूनच व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मदतीतून पंजाब जाधव, नरसिंग राठोड, बाबूलाल पवार यांना प्रत्येकी साडेतीन लाखांची मदत करण्यात आली. त्यांनी शेतात मोटारपंप व विहिरी खोदून सिंचन सुरू केले आहे. याशिवाय गावात शासनाकडून २५० दुधाळ जनावरे वितरित करण्यात आली. त्यापैकी केवळ २५ टक्के लाभार्थ्यांनी ही जनावरे जोपासली. आज त्यांची स्थिती समाधानकारक आहे. ज्यांनी जनावरे मिळताच विकून टाकली त्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, असेही येथील ग्रामस्थ कबूल करतात. शिवसेनेचे आमदार संजय राठोड व दिवाकर रावते यांनी गावात येवून दिवाळी साजरी केली. त्यानंतर निवडणूक काळात आमदार मदन येरावार यांनी येथे पायधूळ झाडली, एवढेच युतीचे योगदान.६० वर्षीय शेतकऱ्याने केली आत्महत्याबोथबोडन येथील आनंदा कनिराम राठोड (६०) या शेतकऱ्याने बुधवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्याकडे पाच एकर शेती असून बँकेचे कर्ज आहे. यावरून गावातील आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे दिसून येते.सामाजिक ऐक्याची गरज गावात सामाजिक एकवाक्यता निर्माण करण्याची गरज आहे. परिस्थितीशी झगडत असलेले कुटुंब आणि शेतकरी आत्महत्या झालेले कुटुंब असे सरळ दोन गट येथे पहायला मिळते. गावात एकवाक्यता आणणे हेच सर्वात मोठे आव्हान हेच असल्याचे येथील माजी सरपंच अनुप चव्हाण यांनी सांगितले.