शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिग्रस तालुक्याला हवा विकास

By admin | Updated: June 4, 2017 01:12 IST

गेल्या ३० वर्षापूर्वी उदयास आलेल्या दिग्रस तालुक्याला विकासाचे ग्रहण लागले आहे.

मोठा उद्योग नाही : सिंचनाची व्यवस्था तोकडी, शेतकरी-मजूर सापडले संकटातप्रकाश सातघरे । लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : गेल्या ३० वर्षापूर्वी उदयास आलेल्या दिग्रस तालुक्याला विकासाचे ग्रहण लागले आहे. तालुक्यात एकही मोठा उद्योग नसल्याने बेरोजगारांच्या हातांना काम मिळेनासे झाले आहे. सिंचनाही व्यवस्था तोकडी असल्याने शेतकऱ्यांसह मजुरांवरही संकट ओढवले आहे. गेल्या ३० वर्षांपूर्वी दिग्रस तालुक्याची निर्मिती झाली. निर्मितीपासूनच हा तालुका विकासात माघारला. तालुक्यात एकही मोठा उद्योग नाही. अनेक लहान उद्योगही नावापुरतेच सुरू आहे. येथील एमआयडीसीचा परिसर भकास पडला आहे. २५ वर्षांपूर्वी येथे एमआयडीसी स्थापना करण्यात आली. मात्र या एमआयडीसीत अद्याप एकही मोठा उद्योग सुरू होऊ शकला नाही. केवळ मोजकेच काही लघु उद्योग सुरु आहे. त्यातूनही बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणे कठीण झाले आहे. एमआयडीसीचा फलक तालुक्यातील बेरोजगारांना वाकुल्या दाखवित आहे. उद्योगांअभावी तालुक्यातील बेरोजगारांना इतरत्र भटकावे लागत आहे. दिग्रस शहरासह तालुक्यातही कुठेच प्रक्रिया उद्योग नाही. सूत गिरणी अथवा एखादा कारखानाही नाही. त्यामुळे तालुक्यातील कामगारांच्या हातांना काम नाही. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कपाशीचे घेतले जाते. मात्र जिनिंग आणि प्रेसिंगशिवाय तालुक्यात अद्याप सूत गिरणीही उभी राहू शकली नाही. जिनिंग प्रेसिंगही सध्या डबघाईस आल्या आहेत. त्यावरील कामगारही बेरोजगार होत आहे. आधीच उद्योग नसल्याने बेरोजगार दिशाहीन झाले आहे. त्यात सुरू असलेले काही लघु उद्योगही बंद पडत असल्याने रोजगाराची भीषण समस्या निर्माण झाली आहे. तालुक्यातील जिनिंग-प्रेसिंग उद्योगाला पुनरूज्जीवित करण्याची गरज निर्माण झाली आहे.शहराला लागून अरुणावती प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता प्रचंड आहे. मात्र योग्य धोरण नसल्याने त्यावरून सिंचन करणेही कठीण झाले आहे. सोबतच नियोजनशून्यतेमुळे शहराला पाणी मिळणेही कठीण झाले आहे. तालुक्यात सिंचनाच्या सुविधा तोकड्या आहेत. भरपूर पाणी असूनही शेतकऱ्यांना ओलित करता येत नाही. जवळपास ७० टक्के शेती कोरडवाहू आहे. मात्र सिंचनाअभावी शेतकऱ्यांचेही हाल होत आहे. बेरोजगार, शेतकरी, मजूर सर्वांनाच उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. रस्त्यांची दुरवस्था दिग्रस तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. अनेक गावांचे जोड रस्ते उखडले आहेत. अनेक रस्त्यांचे केवळ गाजावाजा करून भूमिपूजन उरकण्यात आले. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कामच सुरू झाले नाही. यापूर्वीचे काही रस्ते आता शेवटच्या घटका मोजत आहे. या रस्त्यांवर सर्वत्र उखडलेली गिट्टी पसरली आहे. रस्त्यांअभावी गावांचा विकासही खुंटला आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारांची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. कामाअभावी बेरोजगारांसह मजुरांनाही परजिल्हा व परप्रांतात स्थलांतरण करावे लागत आहे. क्रीडासंकूल रखडलेकाही वर्षांपूर्वी दिग्रसमध्ये थाटामाटात क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र अद्याप काम सुरू झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील क्रीडापटूंची निराशा झाली आहे. कबड्डी आणि खो-खोमध्ये राज्याला नामवंत खेळाडू देणाऱ्या तालुक्यात साधे क्रीडा संकूलही पूर्ण झाले नाही. यामुळे क्रीडा प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात तब्बल ९५२ घरकुलांचे कामही आरोप-प्रत्यारोपांमुळे रेंगाळले आहे.