शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

बँकांंना २१४२ कोटींचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 9:58 PM

यंदाचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बँकांनी कर्ज वाटपाची तयारी सुरू केली. यावर्षी जिल्ह्यातील बँकांना तब्बल दोन हजार १४२ कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी ७० टक्के कर्जाचे वितरण राष्ट्रीयीकृत बँकांना करावे लागणार आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम : कर्जवाटपाची सर्वाधिक जबाबदारी राष्ट्रीयीकृत बँकांवर

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदाचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बँकांनी कर्ज वाटपाची तयारी सुरू केली. यावर्षी जिल्ह्यातील बँकांना तब्बल दोन हजार १४२ कोटींचे कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी ७० टक्के कर्जाचे वितरण राष्ट्रीयीकृत बँकांना करावे लागणार आहे.कर्जमाफीच्या प्रक्रियेसोबतच आता कर्ज वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. सहकार विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने जिल्हा बँकेने कर्ज वितरण सुरू केले आहे. आत्तापर्यंत जिल्हा बँकेने चार कोटींचे कर्जवाटपसुद्धा केले. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांची गती धीमी आहे. कर्ज वितरण प्रक्रियेत सर्व शेतकऱ्यांना सामावून घेण्याच्या सूचना आहेत. तसे पत्र अग्रणी बँकेने सर्व बँकांच्या शाखांना पाठविले आहे.गतवर्षी बँकांना एक हजार ८३६ कोटी रूपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. यात यावर्षी २० टक्के वाढ करण्याचे निर्देश आहे. यात सर्वाधिक कर्जाचे वितरण राष्ट्रीयकृत बँका करणार आहे. या बँकांना एक हजार ४४० कोटींचे कर्ज वितरित करावे लागणार आहे. जिल्हा बँकेला ५३९ कोटींचे उद्दीष्ट असून विदर्भ कोकण बँकेला १६२ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले.खरीप हंगामात हळद पिकाला सर्वाधिक कर्ज देण्याचा निर्णय बँक स्तरावर घेण्यात आला. हळद पिकाला हेक्टरी ९० हजारांचे पीक कर्ज दिले जाणार आहे. कापसाला हेक्टरी ५२ हजार, तर कोरडवाहू कापसाला हेक्टरी ४२ हजारांचे कर्ज मिळणार आहे. सोयाबीनला २७ ते ३७ हजार ५०० रूपयांचे हेक्टरी पीक कर्ज मंजूर केले जाणार आहे. तुरीसाठी हेक्टरी २६ ते ३५ हजार रूपयांचे कर्ज मंजूर केले जाणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक कर्ज वाटपात वाढ करण्याचे निर्देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तथापि कर्जमाफी प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याने ज्यांचे कर्ज माफ झाले नाही, त्या शेतकऱ्यांना चिंता आहे.नवीन सभासदांना कर्जाची अपेक्षादरवर्षी थकीत कर्जाचे प्रमाण जादा असल्याने नवीन सभासदांना कर्जच वितरित केले जात नाही. मात्र यावर्षी कर्जमाफीमुळे बँकांची थकबाकी वसूल होणार आहे. त्यामुळे नवीन सभासदांना कर्ज मिळण्याची अशा पल्लवीत झाली आहे. अशा अनेक नवीन सभासदांना त्यांच्या बँकेकडून खरिपासाठी पीक कर्ज मिळण्याची प्रतीक्षा आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँक कर्ज वाटपास का-कू करतात, हे वास्तव आहे.ज्या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली, अशा शेतकऱ्यांना मागणीनुसार नव्याने कर्ज दिले जाणार आहे.- अर्चना माळवेप्रभारी जिल्हा उपनिबंधकराष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांना कर्ज वितरणाच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना कर्ज वितरित करण्याचे पत्र त्यांना देण्यात आले.- कैलास कुमरेव्यवस्थापक, अग्रणी बँक

टॅग्स :bankबँक