शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

अपघातग्रस्तांच्या जखमेवर कृषी विभागाचे मीठ

By admin | Updated: February 20, 2015 01:52 IST

नागपूर येथे वर्षभरापूर्वी आयोजित कृषी प्रदर्शनावरून परतीच्या प्रवासावर असलेल्या तालुक्यातील नांदगव्हा येथील शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात झाला.

लोकमत विशेषसंजय भगत महागावनागपूर येथे वर्षभरापूर्वी आयोजित कृषी प्रदर्शनावरून परतीच्या प्रवासावर असलेल्या तालुक्यातील नांदगव्हा येथील शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात पाच जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले. शासनाने मदत घोषीत करूनही अद्यापपर्यंत पूर्ण रक्कम मिळाली नाही. जखमी शेतकऱ्यांचे कुटुंबिय प्रशासनाचे उंबरठे झिजवित आहे. नागपूर येथे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तालुक्यातील नांदगव्हाण येथील शेतकरी गेले होते. ११ फेब्रुवारी २०१४ रोजी वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला. चार जण जागीच ठार झाले तर एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सात जण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मृतांच्या वारसाला पाच लाख रुपये तर जखमीला दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी मृतांच्या वारसांना मदत मिळाली, मात्र सात जखमींपैकी पाच शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयापर्यंतच मदत मिळाली.उर्वरित दीड लाख रुपये मदत अद्यापही मिळाली नाही. तसेच बालू फरीदा पवार आणि पूनमचंद राठोड या जखमी शेतकऱ्यांना तर एक रुपयाही मिळाला नाही. जखमी शेतकऱ्यांचा अहवाल यवतमाळ कृषी विभागाने सहसंचालक निधी व लेखा विभागाला पाठविलाच नसल्याची गंभीर बाब वर्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर उघडकीस आली. जखमींपैकी दोन शेतकऱ्यांच्या नावाची नोंदच नाही. तर उर्वरित पाच शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देऊन बोळवण करण्यात आली. आता या घटनेला वर्ष झाले आहे. परंतु कृषी विभाग जखमी शेतकऱ्यांच्या जखमीवरच मिठ चोळत आहे. या शेतकऱ्यांना कधी मदत मिळेल हे स्पष्ट नसल्याने संताप व्यक्त होत आहे.