शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

यवतमाळ जि.प.चे कृषी परवाना अधिकार काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 11:07 IST

बियाणे, खते, कीटकनाशकांच्या परवाना व नूतनीकरणाचे अधिकार जिल्हा परिषदेकडून काढून घेतले जाणार आहे. तसा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने सादर केला आहे.

ठळक मुद्देआयुक्तांचा प्रस्ताव फवारणीबळी नंतरची सावधगिरीगुणवत्ता नियंत्रणाची स्वतंत्र यंत्रणा

राजेश निस्ताने ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : बियाणे, खते, कीटकनाशकांच्या परवाना व नूतनीकरणाचे अधिकार जिल्हा परिषदेकडून काढून घेतले जाणार आहे. तसा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने सादर केला आहे. या परवाने व कृषी गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र यंत्रणा स्थापन केली जाणार आहे.यवतमाळसह काही जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन सुमारे ३६ शेतकऱ्यांचा बळी गेला. या घटनेमुळे कृषीचे परवाने व गुणवत्ता नियंत्रण हा विषय पुन्हा एकदा अजेंड्यावर आला आहे.याच अनुषंगाने नुकतीच मुंबईत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी राज्यभरातील सर्व कृषी अधीक्षक, कृषी विकास अधिकाºयांची बैठक घेतली. त्यात राज्याचे कृषी सचिव बिजयकुमार यांनी जिल्हा परिषदेचे कृषी परवान्याचे अधिकार काढून घेण्याबाबतचा प्रस्ताव सादर करीत असल्याची माहिती मंत्र्यांना दिली.‘एडीओ’वर राजकीय दबावया नव्या प्रस्तावानुसार, सध्या जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्याकडे (एडीओ) परवान्यांचे अधिकार आहेत.पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांमार्फत हे प्रस्ताव ‘एडीओ’कडे पाठविले जातात. मात्र ‘एडीओ’ हे जिल्हा परिषदेच्या राजकारणात दबावाचे बळी ठरतात. म्हणूनच ‘एडीओ’कडे बियाणे, खते, कीटकनाशकांचे परवाने व गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी नको, अशी भूमिका आयुक्तालयाने घेतली आहे.बियाणे, खते व कीटकनाशकांच्या उत्पादन व साठ्याचे (गोदामे) परवाने पुण्याच्या कृषी आयुक्तालयातील संचालक गुणवत्ता नियंत्रण यांच्याकडून दिले जातात.जिल्ह्याला गुणवत्ता उपसंचालककृषी परवाने व गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर वर्ग-१ दर्जाचा अधिकारी उपसंचालक म्हणून दिला जाऊ शकतो. उपविभाग किंवा तालुकास्तरावरसुद्धा गुणवत्ता नियंत्रणाचे अधिकार हस्तांतरित केले जाऊ शकतात.सध्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एकच पूर्णवेळ अधिकारी आहे. शिवाय कृषीच्या एसडीओ व तालुका कृषी अधिकाºयांना तपासणीचे अधिकार आहे. गुणवत्ता नियंत्रणचा विभागीय अधिकारी सध्या वर्ग-२ चा आहे. हे पद सिनिअर वर्ग-१ चे केले जाऊ शकते.

टॅग्स :agricultureशेती