शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्था खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरवर खरिपाच्या पिकांचे ३३ टक्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हे नुकसान भरून काढण्यासाठी ४१६ कोटी लागतील. प्रत्यक्षात जिल्ह्याला १०२ कोटी वळते झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के रक्कम जमा होणार आहे.

ठळक मुद्देचार हजारांची मदत ठरली तोकडी : नांगरणीचाही खर्च भागविणे कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाने झालेल्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना किमान ५० हजार रूपये तत्काळ लागणार आहेत. अशा स्थितीत तातडीची मदत म्हणून शेतकऱ्यांच्या हातात केवळ चार हजार रूपये पडले आहे. मिळालेल्या पैशातून शेतीचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील पाच लाख हेक्टरवर खरिपाच्या पिकांचे ३३ टक्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार हे नुकसान भरून काढण्यासाठी ४१६ कोटी लागतील. प्रत्यक्षात जिल्ह्याला १०२ कोटी वळते झाले आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात २५ टक्के रक्कम जमा होणार आहे. दोन हेक्टरच्या निकषानुसार नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला १६ हजार मिळणार आहे. यातील २५ टक्के रक्कम म्हणजे चार हजार रूपये शेतकºयांच्या खात्यात येणार आहे.कृषी अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी किमान ५० हजाराची मदत शेतकºयांना लागणार आहे. मजुरीचे दर १५० रूपयावर पोहचले आहे. शेतात रब्बीची पेरणी करण्यासाठी पाच एकरला किमान १० हजार रूपये लागतात. बियाणे, खत, पेरणी यासाठी पैसाच उरत नाही. सोयाबीनला एकरी २६ ते ३० हजाराचा खर्च आला. हा खर्चसुध्दा निघाला नाही. यासाठी घेतलेले कर्ज शेतकऱ्यांच्या माथी बसले आहे. या कर्जाची परतफेड करण्याची क्षमताही त्यांच्यात राहिली नाही.आता पुन्हा सावकाराच्या तगाद्याने अडचणीत असलेला शेतकरी गळफास आवळल्याशिवाय राहणार नाही, अशी स्थिती आहे. आत्महत्येचे लोण आणखी वाढण्याचा धोका व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियाचार हजारात काय होणार?तत्काळ मदत म्हणून चार हजार वळते झाले. शेतात लाखोचे नुकसान झाले. दिवाळीही करता आली नाही. आजपर्यंत झाले नसेल इतके येले सोयाबीनचे झाले आहे. अजूनही येले सुरूच आहे.- गजानन गुल्हाने, चाणी

जनभावनेचा अपमानशेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून अनेक दिग्गज गेले. राष्ट्रपती राजवट असल्याने जास्त मदत मिळेल असे वाटले. मात्र तोकडी मदत मिळाली. हा लोक जनभावनेचा अवमान आहे.- मनीष जाधव, महागाव,

शेतकऱ्यांचा वालीच नाहीशेतकरी संकटात असतांना त्यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारही जागेवर नाही. केंद्र शासनही भरीव मदत द्यायला तयार नाही. हमी केंद्र उघडलेले नाही. चहूबाजूने शेतकºयांची लुट सुरू आहे. असेच पुढे चालत राहील तर अवघड आहे- अश्विन लोणकर, बोरी ईजारा

कर्ज फेडायचे कसे?कर्जमाफीत बसलो, पण कर्जमाफीचा लाभ झाला नाही. आज ना उद्या माफी होईल म्हणून सावकाराकडून कर्ज घेतल. पिकावर फेडता येईल असे वाटल. परतीच्या पावसाने हातात काही पडल नाही. मजुरीचे दर वाढले. शेतमाल काहीच निघाला नाही. आता सावकाराची परत फेड कशी करायची असा प्रश्न आहे, रात्री झोपही लागत नाही.- राहुल दुपारते, माळकिन्ही.

शेतीला भविष्यच नाहीकुठलही सरकार येवो, शेतकऱ्यांच्या नावावर उदो उदो चालते. मात्र त्यांच्या पाठीशी कोणीच उभे राहत नाही. या संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाय योजना आणि मोठ्या पॅकेजची आवशकता आहे. तरच शेतीला भविष्य आहे. नाही त शेतीच काही खर नाही.- वसंतराव कोल्हे, बोरीअरब

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी