शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कृषिपंपाच्या जोडण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:39 IST

गेल्या दोन वर्षापासून अर्ज करूनही तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कृषी पंपाची वीज जोडणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे सिंचन करून जास्त पीक घेण्याचे स्वप्न भंगले आहे.

ठळक मुद्देमारेगाव तालुका : दोन वर्षांपासून शेतकरी प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : गेल्या दोन वर्षापासून अर्ज करूनही तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कृषी पंपाची वीज जोडणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे सिंचन करून जास्त पीक घेण्याचे स्वप्न भंगले आहे.देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यावर येत्या एका वर्षात मागेल त्या शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी देऊन शेतकऱ्यांचे सिंचन वाढवून उत्पन्नात वाढ करू, असे हिरवे स्वप्न राज्यातील शेतकऱ्यांना शासनाने दाखविले. वीज मंडळाकडून तत्काळ वीज जोडणी मिळणार, या आशेवर तालुक्यातील जवळपास ५०० शेतकऱ्यांनी सन २०१६ मध्ये वीज वितरण कंपनीकडे कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी डिमांड भरले होते. परंतु या शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षापासून कृषी पंपाची वीज जोडणी मिळाली नाही. यासंदर्भात अनेकदा शेतकऱ्यांनी वीज मंडळाच्या कार्यालयात चकरा मारून साहेब जोडणी कधी मिळणार, याची चौकशी केली. परंतु वेळोवेळी कार्यालयाती कर्मचाऱ्यांनी वरून आदेश नाही, टेंडर मिळाले नाही, मार्चपर्यंत टेंडर निघणार, असे मोघम स्वरूपातील उत्तरे शेतकऱ्यांना देण्यात आली. आता मार्च संपला तरी वीज कंपनीने कृषी पंपाचे टेंडर अजुनपर्यंत काढले नसल्याची माहिती वीज कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांचे स्वप्न हवेतच विरण्याची चिन्हे असून लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन गेल्या दोन वर्षापासून रखडलेले कृषी पंपाची वीज जोडणी करावी, अशी मागणी होत आहे.