शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

कृषिपंपाच्या जोडण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:39 IST

गेल्या दोन वर्षापासून अर्ज करूनही तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कृषी पंपाची वीज जोडणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे सिंचन करून जास्त पीक घेण्याचे स्वप्न भंगले आहे.

ठळक मुद्देमारेगाव तालुका : दोन वर्षांपासून शेतकरी प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : गेल्या दोन वर्षापासून अर्ज करूनही तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांना अजुनपर्यंत कृषी पंपाची वीज जोडणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे सिंचन करून जास्त पीक घेण्याचे स्वप्न भंगले आहे.देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यावर येत्या एका वर्षात मागेल त्या शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी देऊन शेतकऱ्यांचे सिंचन वाढवून उत्पन्नात वाढ करू, असे हिरवे स्वप्न राज्यातील शेतकऱ्यांना शासनाने दाखविले. वीज मंडळाकडून तत्काळ वीज जोडणी मिळणार, या आशेवर तालुक्यातील जवळपास ५०० शेतकऱ्यांनी सन २०१६ मध्ये वीज वितरण कंपनीकडे कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी डिमांड भरले होते. परंतु या शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षापासून कृषी पंपाची वीज जोडणी मिळाली नाही. यासंदर्भात अनेकदा शेतकऱ्यांनी वीज मंडळाच्या कार्यालयात चकरा मारून साहेब जोडणी कधी मिळणार, याची चौकशी केली. परंतु वेळोवेळी कार्यालयाती कर्मचाऱ्यांनी वरून आदेश नाही, टेंडर मिळाले नाही, मार्चपर्यंत टेंडर निघणार, असे मोघम स्वरूपातील उत्तरे शेतकऱ्यांना देण्यात आली. आता मार्च संपला तरी वीज कंपनीने कृषी पंपाचे टेंडर अजुनपर्यंत काढले नसल्याची माहिती वीज कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांचे स्वप्न हवेतच विरण्याची चिन्हे असून लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन गेल्या दोन वर्षापासून रखडलेले कृषी पंपाची वीज जोडणी करावी, अशी मागणी होत आहे.