शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘शकुंतले’ साठी आंदोलन पेटले, पण यवतमाळकर गप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 05:00 IST

यवतमाळातील दर्जेदार कापूस परदेशात नेण्यासाठी ब्रिटिशांनी शंभर वर्षापूर्वी येथून मूर्तिजापूरपर्यंत (अकोला) ही रेल्वे सुरू केली होती. क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीकडे रेल्वेच्या देखभालीचा कारभार होता. भारत स्वतंत्र झाल्यावरही शकुंतला रेल्वे या ब्रिटिश कंपनीच्याच ताब्यात राहिली. कंपनीचा करार आता संपुष्टात येऊनही भारतीय रेल्वेने शकुंतला अद्याप ताब्यात घेतलेली नाही. उलट गेल्या पाच वर्षांपासून ही रेल्वे बंद पडलेली आहे.

अविनाश साबापुरे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असतानाही यवतमाळची शान असलेली शकुंतला रेल्वे मात्र अजूनही ब्रिटिश गुलामगिरीची शताब्दी भोगत आहे. याविरुद्ध ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर अमरावती आणि अकोला जिल्ह्यातून शकुंतलाचे अस्तित्व टिकविण्यासाठी लोकचळवळ उभी झाली आहे. मात्र यवतमाळकर अजूनही मूग गिळून गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यवतमाळातील दर्जेदार कापूस परदेशात नेण्यासाठी ब्रिटिशांनी शंभर वर्षापूर्वी येथून मूर्तिजापूरपर्यंत (अकोला) ही रेल्वे सुरू केली होती. क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीकडे रेल्वेच्या देखभालीचा कारभार होता. भारत स्वतंत्र झाल्यावरही शकुंतला रेल्वे या ब्रिटिश कंपनीच्याच ताब्यात राहिली. कंपनीचा करार आता संपुष्टात येऊनही भारतीय रेल्वेने शकुंतला अद्याप ताब्यात घेतलेली नाही. उलट गेल्या पाच वर्षांपासून ही रेल्वे बंद पडलेली आहे. सुस्थितीत असलेले रेल्वे रूळ, पूल, रेल्वेस्थानक व अन्य मालमत्ता सध्या बेवारस स्थितीत आहे. जिल्ह्यातील गोरगरीब, आदिवासी, मजूर, दूध विक्रेते आदींच्या दृष्टीने ही रेल्वे परत सुरू होणे गरजेचे आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठविला. १५ ऑगस्ट रोजी ‘देश स्वतंत्र झाला तरी शकुंतला शंभर वर्षांपासून पारतंत्र्यातच’ हे वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर अमरावती येथील शेतकरी नेते विजय विल्हेकर यांनी अमरावती व अकोल्यातील नागरिकांना एकत्र आणून शकुंतला बचाव आंदोलनाचे रणशिंग फुंकले. शकुंतला एक्सप्रेस प्रवासी मंडळ स्थापन करून अमरावतीत दोन बैठकाही घेण्यात आल्या. त्यानंतर बुधवारी मूर्तिजापूर रेल्वे स्थानक गाठून या आंदोलकांनी मध्य रेल्वे भुसावळचे क्षेत्रीय उपप्रबंधक यांना निवेदन पाठविले. ब्रिटिश गुलामीतून शकुंतलेला मुक्त करून भारत सरकारने ही रेल्वे पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. निवदेनातून या लोकचळवळीचा श्रीगणेशा झाला असला तरी हा प्रश्न धसास लावण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाणार आहे, त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन विजय विल्हेकर यांनी केले. वर्षभरात तीन लाख नागरिकांचा प्रवास ही नॅरोगेज रेल्वे मेळघाटातील तसेच यवतमाळातील आदिवासी, शेतकरी आणि मजुरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ती बंद असल्याने अनेकांचा रोजगार बुडाला. मेळघाटात कुपोषण वाढले, असा दावा आंदोलकांनी केला आहे. या रेल्वेने परिसरातील मजूर अचलपूर, मूर्तिजापूर येथे पोहोचून देशाच्या विविध प्रांतात रोजगारासाठी जात होते. रेल्वे मार्गावरील मालमत्ताही आता समाजकंटकांच्या तावडीत सापडली आहे. १९६०-६१ साली तीन लाख ११ हजार प्रवाशांनी शकुंतलातून प्रवास केल्याची नोंद बनोसा रेल्वे स्थानकात आढळते. तर २३३ मेट्रिक टन मालाची वाहतूक झाल्याचेही कळते. यावरून या रेल्वेचे महत्त्व स्पष्ट होत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

शकुंतलेच्या अस्तित्व टिकविण्यासाठी यवतमाळकरांनीही या आंदोलनात जुळावे. शकुंतलेच्या मार्गावरील यवतमाळ, अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांकडून ठराव घेतले जाईल. तूर्त अंजनगाव आणि मूर्तिजापूरच्या नगराध्यक्षांनी त्याला संमतीही दिली आहे. या मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या सफाईचा कार्यक्रमही राबविला जाईल. पुढच्या काळात आंदोलन अधिक तीव्र होईल.             - विजय विल्हेकर, शकुंतला बचाव आंदोलनाचे प्रणेते

 

टॅग्स :Shakuntala Trainशकुंतला रेल्वेrailwayरेल्वे