शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

सर्जिकल स्ट्राईकनंतर सामान्यांचे पाकिस्तानवर शरसंधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:37 IST

‘पाकिस्तानले आस्संच पाह्यजे ना भाऊ. तेले सबूत कितीबी द्या, थो मानतच नाई. आता केला नं आपून सर्जिकल स्ट्राईक! घर मे घुस के मारा!! मांगं छब्बीस ग्याराच्या टाईमले भारतानं सबूत देल्ले होते.

ठळक मुद्देयवतमाळकरांचा आवाज गरजला : ‘भारत माता की जय’, सबूत देऊनई मानत नाई... आता घे म्हणा शेक्कून

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘पाकिस्तानले आस्संच पाह्यजे ना भाऊ. तेले सबूत कितीबी द्या, थो मानतच नाई. आता केला नं आपून सर्जिकल स्ट्राईक! घर मे घुस के मारा!! मांगं छब्बीस ग्याराच्या टाईमले भारतानं सबूत देल्ले होते. तरी पाकिस्तान मने का कसाबले आमी धाडलंच नाई. आता सबूत गिबूत नाई बाबू. डायरेक बदलाच. घे शेक्कून!’ हे शब्द आहेत रस्त्यावर पंक्चर दुरुस्तीचे काम करणाऱ्या सर्वसामान्य यवतमाळकर माणसाचे अन् पाकिस्तानवर खवळलेल्या सर्वसामान्य भारतीयाचे.मंगळवारी पहाटेच्या वेळेस भारतीय वायू सेनेने पाकिस्तानच्या हद्दीत शिरून दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी काश्मिरात ४४ भारतीय जवानांच्या पाठीवर वार केला होता. त्या भेकड हल्ल्याने भारतीय जनमानस अस्वस्थ होते. पण मंगळवारी भारतीय जवानांनी ३०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी धाडून ‘सूतसमेत’ वसुली केली. या सर्जिकल स्ट्राईकची खबर कळताच यवतमाळात भारतीय जवानांबद्दलचा अभिमान दाटून आला. रस्त्यावर राबणारे, हातगाडी चालविणारे, शेतात घाम गाळणारे असे सारेच आनंदून गेले. महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये तर पाकिस्तान मुर्दाबादचे नारे दणाणले आणि ‘भारत माता की जय’ असा गगनभेदी जयजयकार झाला.गोली के बदले गोली, हेच बरोबरदहशतवाद्यांचा खात्मा केल्याच्या कारवाईबाबत मुख्य बाजारपेठेत चहाटपरी चालविणारा व्यावसायिक म्हणाला, ‘त्यायले तं पह्यलेच उडवाले पाह्यजे होतं साल्यायले. कवाचे तरास देऊन राह्यले आपल्या भारताले.’ दाते महाविद्यालयाच्या परिसरात जमलेले बिकॉमचे विद्यार्थी म्हणाले, ‘एका गालावर मारलं तं दुसरा गाल पुढे करायचा, हे आता जमत नाही. महात्मा गांधीजींचा काळ वेगळा होता. आता प्रेमानं चर्चा करतो म्हटलं तर पाकिस्तान ऐकतच नाही. गोली के बदले गोली, हेच बरोबर झालं.’ तर अमोलकचंद महाविद्यालयातील तरुण म्हणाले, ‘पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे, हे आता सिद्ध झाले आहे. तेथील दहशतवाद्यांनी आपल्या जवानांना मारले, ते साऱ्या जगाने पाहिले, तरी पाकिस्तानची मग्रूरी संपत नाही. आज भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर बॉम्ब टाकले ते बरेच झाले. पाकिस्तानच्या मनातही धाक निर्माण झाला पाहिजे, की भारत काहीही करू शकतो.’पाक जनतेचाही दहशतवाद्यांना सपोर्टबसस्थानक परिसरातील व्यावसायिक म्हणाले, पाकिस्तानच्या जनतेचीही यात चूक आहे. तेथील लोक दहशतवाद्यांना सपोर्ट करतात. इतर देशांमध्ये आर्मीला खूप प्राधान्य दिले जाते. आपल्या देशातही तसे व्हायला पाहिजे. तर एक आॅटोचालक म्हणाला, ‘मी तं काई टीव्ही पाह्यली नाई. पण पाकिस्तानले झोडपलं आसन तं बरंच झालं.’...तरीही संयम कायमसर्वसामान्य भारतीयांनी सर्जिकल स्ट्राईकवर आनंद व्यक्त केला. मात्र हा आनंद व्यक्त करतानाही संयम राखणाºया प्रतिक्रिया उमटल्या. गोधनी रोडवर उसाचा रस विकणारा व्यावसायिक म्हणाला, ‘आपली दुश्मनी आतंकवाद्यांसोबत हाये. पाकिस्तानच्या जनतेनं आपलं काही घोडं मारलं नाई. तिथं आपलेच भाऊ बहीण हाये. हमले करणाºयायचा जो काही वाद हाये थो निपटवला पाहिजे अन् दोन्ही देशातले लोक सेफ राहिले पाहिजे.’ असाच काहीसा संयमी सूर अमोलकचंद महाविद्यालयातील तरुणींनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ‘आपले सैन्य कोणत्याही कार्यवाहीसाठी सक्षम आहे. पण आजवर आपण चर्चेनेच प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. तरीही तो सुटत नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली. काहीही असो, युद्ध मात्र दोन्ही देशांना परवडणारे नाही.’तरुणी म्हणाल्या, अ‍ॅक्शन आवश्यकचभारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर जसे सारे तरुण खूश झाले, तशा महिला आणि तरुणींमध्येही आनंदाची लाट आली. तरुणी म्हणाल्या, ‘पाकिस्तानविरुद्ध अशा अ‍ॅक्शन घेतल्याच पाहिजे. तेथील टेरर कॅम्पवर भारताने बॉम्ब टाकून धाक निर्माण केला आहे. पण आता आपल्या सरकारने असा काही निर्णय घेतला पाहिजे, पाकिस्तानची समस्या कायमचीच संपली पाहिजे. नाहीतर पुन्हा एखाद दुसरा आतंकवादी भारतात येत राहील आणि लपून छपून हल्ले करत राहील.’