शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

दडपशाही झुगारुन शवयात्रा काढलीच

By admin | Updated: July 15, 2017 02:22 IST

सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर पोलिसांनी प्रचंड दडपशाही आणि कार्यकर्त्यांची धरपकड करूनही

शेतकऱ्यांचे आंदोलन यशस्वी : कार्यकर्त्यांची रात्रीपासूनच जिल्हाभर धरपकड, बच्चू कडूंचा सहभाग लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर पोलिसांनी प्रचंड दडपशाही आणि कार्यकर्त्यांची धरपकड करूनही शेतकरी आंदोलकांनी अखेर सरकारची प्रतिकात्मक शवयात्रा काढलीच. कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकऱ्यांचे हे आंदोलन यशस्वी झाले. शासनाने कर्जमाफी जाहीर केली. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती दमडीही पडली नाही. उलट वेगवेगळे व जाचक निकष लावून २०१२ पूर्वीचे थकबाकीदार असलेल्या अर्ध्या अधिक शेतकऱ्यांना या माफीपासून वंचित ठेवले गेले. सरकारची ही घोषणा फसवी असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी शुक्रवार १४ जुलै रोजी ‘सरकारची प्रतिकात्मक शवयात्रा’ आंदोलनाची घोषणा केली होती. त्यासाठी जिल्हाभर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली. दरम्यान हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सत्ताधारी नेत्यांनी पोलीस व प्रशासनाला हाताशी धरुन पुरेपूर प्रयत्न केले. आंदोलन करा, मात्र शवयात्रा काढू नका, असा प्रस्ताव आंदोलकांपुढे ठेवला गेला. मात्र हा प्रस्ताव झुगारण्यात आला. म्हणून या आंदोलनात सहभागी होऊ शकणाऱ्या संभाव्य कार्यकर्त्यांची रात्रीपासूनच धरपकड सुरू करण्यात आली. पहाटेपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात शेतकरी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. शहराबाहेरील सर्व मार्गांवर वाहनांची तपासणी करून कार्यकर्त्यांना तेथेच ताब्यात घेतले जात होते. पोलिसांनी अखेरपर्यंत तिरडी निघू नये यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची शोधाशोध केली. परंतु पोलिसांची ही दडपशाही झुगारुन गनिमीकाव्याने आधी उमरसरा व नंतर येथील जयहिंद चौकात सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली. त्यामुळे पोलिसांचे प्रयत्न फेल ठरले. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे प्रहार युवा शक्ती संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू चक्क मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने यवतमाळ बसस्थानकावर पोहोचले. तेथून दुचाकीने त्यांनी शासकीय विश्रामगृह गाठले. शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप, चंद्रकांत वानखडे, आंदोलनाचे निमंत्रक देवानंद पवार आदी तेथे पोहोचले होते. कार्यकर्त्यांचीही तेथे प्रचंड गर्दी झाली. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शवयात्रा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे तिरडी व साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतरही कार्यकर्त्यांनी शवयात्रेचा निर्धार कायम ठेवत चौघांनी एका कार्यकर्त्याला प्रेतयात्रेसारखे उचलून काही अंतर चालले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नेत्यांनी युती सरकार, जिल्हा प्रशासन, आंदोलनाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचे वयोवृद्ध नेते, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे प्रमुख, पोलीस आदींचा खरपूस समाचार घेतला. या आंदोलनासाठी यवतमाळ शहर व जिल्हाभरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामध्ये आमदार बच्चू कडू, माजी आमदार वामनराव चटप, चंद्रकांत वानखडे, शेतकरी संघटनेचे विजय विल्हेकर, गजानन अहमदाबादकर, माजी आमदार विजयाताई धोटे, वामनराव कासावार, राहुल ठाकरे, प्रवीण देशमुख, वसंत घुईखेडकर, मनीष पाटील, प्रफुल्ल मानकर, बाजार समिती सभापती रवींद्र ढोक, स्वामिनीचे महेश पवार, मनिषा काटे आदी सहभागी झाले होते. पुढील आंदोलने भगतसिंगांच्या मार्गाने - बच्चू कडू ४शासकीय विश्रामगृहाबाहेर कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार बच्चू कडू म्हणाले, आम्ही महात्मा गांधींच्या मार्गाने शांततेने आंदोलनाची घोषणा केली होती. परंतु सत्ताधारी नेते, पोलीस व प्रशासनाने कार्यकर्त्यांची आधीच धरपकड करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निषेधार्ह आणि ब्रिटीश राजवटीला लाजविणारा आहे. त्यामुळेच यापुढे शहीद भगतसिंगांच्या मार्गाने आंदोलने केली जातील. थेट पालकमंत्र्यांच्या घराला निशाणा बनविले जाईल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. आमदार बच्चू कडू यांच्या दमदार व सडेतोड भाषणामुळे उपस्थितांमध्ये जोश संचारला होता. विश्रामगृहावर आंदोलकांनी जीवंत कार्यकर्त्याला खांद्यावर उचलून शवयात्रा काढत सर्वांचे लक्ष वेधले. पोलिसांदेखत आंदोलकांनी तिरडीवर सरकारचा प्रतिकात्मक मृतदेह ठेऊन समोर आगटे धरुन शवयात्रा काढली.