शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

हैदराबाद ‘एन्काऊंटर’नंतर यवतमाळात आनंदाची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

कायद्याचा विद्यार्थी असलेला एक तरुण म्हणाला, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत एखाद्याला मारून टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही. नाहीतर पोलीस कोणालाही डोळे मिटून मारून टाकतील. हैदराबादमधील बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात होती. पोलिसांकडे पुरावे असते, तर एन्काउंटर करण्याची वेळच आली नसती.

ठळक मुद्देयवतमाळच्या तरुणाईची भावना : बलात्कारासारखे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमांना असेच ‘ठोकले’ पाहिजे...

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलिसांनी गुन्हेगारांना पकडायचे... मग वकिलांनी कायद्याचा किस पाडून गुन्हेगारांना सोडवायचे.. किती दिवस चालायचे हे? त्यापेक्षा बलात्कारासारखे घृणास्पद गुन्हे करणाऱ्यांना असेच रस्त्यावर पळवून ‘ठोकले’ पाहिजे. सीमेबाहेरून देशाविरुद्ध काम करणाऱ्यांना सरकारने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून मारले. हैदराबादच्या पोलिसांनी देशात राहून देशाच्या सभ्येतला गालबोट लावणाऱ्यांना संपविले. हा सर्जिकल स्ट्राईक नव्हता, पण तो इंटरनल, टेक्निकल स्ट्राईक होता...यवतमाळातील तरुणाईच्या शब्दांना धार चढली होती. हैदराबादमध्ये एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिला क्रूरपणे मारण्यात आले. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी देशभरातून होत असतानाच यवतमाळकरांची जनभावनाही भडकली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी यातील चारही आरोपींना पोलिसांनी एन्काउंटर करून यमसदनी धाडले. ही वार्ता यवतमाळात धडकताच तरुणाईने आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली.‘आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांनीही अशा नराधमांना कापूनच काढले असते’ सळसळत्या तरुणाईचे हे उद्गार आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना अशाच शिक्षा दिल्या जात होत्या. दुष्कृत्य करणाऱ्यांना पोलिसांनी अद्दल घडवायची नाही तर काय, जेलमध्ये त्यांची बडदास्त ठेवायची काय? कायद्याचा धाकच उरला नसेल, तर बंदूकीने ‘ठोकणे’ हाच उपाय आहे... पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणाचे हे मत आगामी काळात गुन्हेगारांच्या मनात धडकी भरविणारे आहे.जोपर्यंत आपल्या देशात आसाराम, रामरहीमसारखे भोंदू आहेत, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाही, असा संतापही तरुणांनी व्यक्त केला. गुन्हेगारांना जेलमध्ये वर्षानुवर्षे सडवत ठेवण्यापेक्षा त्यांना एका झटक्यात जगाच्या पलिकडे पाठविले पाहिजे.पण तरुणाई म्हणजे, आले मनात तर बोलले क्षणात असेही कोणी म्हणण्याचे कारण नाही. कारण काही तरुणांच्या प्रतिक्रिया अत्यंत संयमितही आहेत. ते म्हणाले, आरोपींचा एन्काउंटर झाला हे चांगलेच झाले. पण साऱ्या गोष्टी कायद्याने झालेल्या कधीही चांगल्या असतात.कायद्याचा विद्यार्थी असलेला एक तरुण म्हणाला, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत एखाद्याला मारून टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही. नाहीतर पोलीस कोणालाही डोळे मिटून मारून टाकतील. हैदराबादमधील बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात होती. पोलिसांकडे पुरावे असते, तर एन्काउंटर करण्याची वेळच आली नसती.तरुणांनी केले मनमोकळेहैदराबादमधील एन्काऊंटरच्या निमित्ताने यवतमाळातील स्वप्नील शेंडे, रूपेश सोनटक्के, राहुल वानखेडे, सागर ढोरे, प्रज्वल मोरघडे, बुद्धराज दुपारे आदी तरुणांनी ‘लोकमत’कडे आपली मते दिलखुलास मांडली.

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरण