शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हैदराबाद ‘एन्काऊंटर’नंतर यवतमाळात आनंदाची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

कायद्याचा विद्यार्थी असलेला एक तरुण म्हणाला, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत एखाद्याला मारून टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही. नाहीतर पोलीस कोणालाही डोळे मिटून मारून टाकतील. हैदराबादमधील बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात होती. पोलिसांकडे पुरावे असते, तर एन्काउंटर करण्याची वेळच आली नसती.

ठळक मुद्देयवतमाळच्या तरुणाईची भावना : बलात्कारासारखे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमांना असेच ‘ठोकले’ पाहिजे...

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलिसांनी गुन्हेगारांना पकडायचे... मग वकिलांनी कायद्याचा किस पाडून गुन्हेगारांना सोडवायचे.. किती दिवस चालायचे हे? त्यापेक्षा बलात्कारासारखे घृणास्पद गुन्हे करणाऱ्यांना असेच रस्त्यावर पळवून ‘ठोकले’ पाहिजे. सीमेबाहेरून देशाविरुद्ध काम करणाऱ्यांना सरकारने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून मारले. हैदराबादच्या पोलिसांनी देशात राहून देशाच्या सभ्येतला गालबोट लावणाऱ्यांना संपविले. हा सर्जिकल स्ट्राईक नव्हता, पण तो इंटरनल, टेक्निकल स्ट्राईक होता...यवतमाळातील तरुणाईच्या शब्दांना धार चढली होती. हैदराबादमध्ये एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिला क्रूरपणे मारण्यात आले. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी देशभरातून होत असतानाच यवतमाळकरांची जनभावनाही भडकली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी यातील चारही आरोपींना पोलिसांनी एन्काउंटर करून यमसदनी धाडले. ही वार्ता यवतमाळात धडकताच तरुणाईने आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली.‘आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांनीही अशा नराधमांना कापूनच काढले असते’ सळसळत्या तरुणाईचे हे उद्गार आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना अशाच शिक्षा दिल्या जात होत्या. दुष्कृत्य करणाऱ्यांना पोलिसांनी अद्दल घडवायची नाही तर काय, जेलमध्ये त्यांची बडदास्त ठेवायची काय? कायद्याचा धाकच उरला नसेल, तर बंदूकीने ‘ठोकणे’ हाच उपाय आहे... पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणाचे हे मत आगामी काळात गुन्हेगारांच्या मनात धडकी भरविणारे आहे.जोपर्यंत आपल्या देशात आसाराम, रामरहीमसारखे भोंदू आहेत, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाही, असा संतापही तरुणांनी व्यक्त केला. गुन्हेगारांना जेलमध्ये वर्षानुवर्षे सडवत ठेवण्यापेक्षा त्यांना एका झटक्यात जगाच्या पलिकडे पाठविले पाहिजे.पण तरुणाई म्हणजे, आले मनात तर बोलले क्षणात असेही कोणी म्हणण्याचे कारण नाही. कारण काही तरुणांच्या प्रतिक्रिया अत्यंत संयमितही आहेत. ते म्हणाले, आरोपींचा एन्काउंटर झाला हे चांगलेच झाले. पण साऱ्या गोष्टी कायद्याने झालेल्या कधीही चांगल्या असतात.कायद्याचा विद्यार्थी असलेला एक तरुण म्हणाला, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत एखाद्याला मारून टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही. नाहीतर पोलीस कोणालाही डोळे मिटून मारून टाकतील. हैदराबादमधील बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात होती. पोलिसांकडे पुरावे असते, तर एन्काउंटर करण्याची वेळच आली नसती.तरुणांनी केले मनमोकळेहैदराबादमधील एन्काऊंटरच्या निमित्ताने यवतमाळातील स्वप्नील शेंडे, रूपेश सोनटक्के, राहुल वानखेडे, सागर ढोरे, प्रज्वल मोरघडे, बुद्धराज दुपारे आदी तरुणांनी ‘लोकमत’कडे आपली मते दिलखुलास मांडली.

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरण