शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद हद्दवाढीनंतर ग्रामपंचायती वाऱ्यावर

By admin | Updated: February 15, 2016 02:29 IST

शहरालगतच्या आठ ग्रामपंचायती महिनाभरापूर्वी नगरपरिषदेत समाविष्ठ झाल्या. ग्रामपंचायतीचे अधिकार गोठविण्यात आले.

प्रशासक कोण? : मूलभूत सुविधाही थांबल्या, नागरिकांत असंतोष सुरेंद्र राऊत  यवतमाळ शहरालगतच्या आठ ग्रामपंचायती महिनाभरापूर्वी नगरपरिषदेत समाविष्ठ झाल्या. ग्रामपंचायतीचे अधिकार गोठविण्यात आले. नगरपरिषद प्रशासक आल्याने वेळेत सोईसुविधा उपलब्ध होतील, अशी भाबडी आशा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना होती. मात्र महिनाभरातच आता भ्रमनिरास झाला असून ग्रामपंचायत परिसरातील यंत्रणा पूर्णत: ठप्प आहे. आपला प्रशासक नेमका कोण असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. सुविधांसाठी कुणाकडे जावे अशी अवस्था आठही ग्रामपंचायतीतील नागरिकांची गत महिनाभरात झाली आहे. शहर विकासाच्या दृष्टीकोणातून यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्याची अधिसूचना २२ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. यानंतर वडगाव, लोहारा, पिंपळगाव, वाघापूर, मोहा, भोसा, उमरसरा आणि डोळंबा येथील ग्रामपंचायतींचे अधिकार गोठविण्यात आले. या बरोबरच ग्रामपंचायत कार्यालयांवर यवतमाळ नगरपरिषद विभागीय कार्यालय अशी नोंदही करण्यात आली. येथील ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. तर ग्रामपंचायतीत कार्यरत कर्मचारी व त्यांच्या अधिनस्त यंत्रणा पूर्णत: ठप्प झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रात कचरा गोळा करण्यासाठी फिरणाऱ्या घंटा गाड्या हद्दवाढीनंतर थांबल्या आहेत. अनेक ठिकाणी रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना बंद करण्यात आले आहे. नगरपरिषद वाढीव क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या कार्यालयांना विभागीय कार्यालय असे संबोधत आहे. प्रत्यक्षात मात्र तेथील प्रशासकीय घडी बसविण्यासाठी कुठलेच ठोस प्रयत्न झाले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील बंद पथदिव्यांची तक्रार कुणाकडे करायची, सुरू असलेल्या घरकूल रमाई आवास, वैयक्तिक शौचालय, नळ जोडणी योजनेसंदर्भात कोणाकडे दाद मागायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा उचलण्याची व्यवस्था नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले आहे. परिसरात एखादा प्राणी मृत झाल्यास तो उचलण्यासाठी कोणाकडे संपर्क करायचा असा प्रश्न स्थानिक नागरिकांना निर्माण झाला आहे. सरपंचासह १७ सदस्यांना शासनाकडून त्यांचे पद बरखास्त झाल्यासंदर्भात कुठलाही लेखी आदेश आलेला नाही. त्यामुळे नेमके काय करायचे हा संभ्रम त्यांच्यापुढे आहे. एकीकडे स्थानिक नागरिक अनेक तक्रारी घेऊन या सदस्य व सरपंचांकडे येत आहे. तर दुसरीकडे यंत्रणा काहीच ऐकून घेण्यास तयार नाही. ते सरळ नगरपरिषद कर्मचारी असल्याचे सांगताना दिसत आहे. अशा स्थितीत सामान्य माणसाने मुलभूत सोई-सुविधेसाठी कोणाकडे जावे हा प्रश्न आहे.