शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

नगरपरिषद हद्दवाढीनंतर ग्रामपंचायती वाऱ्यावर

By admin | Updated: February 15, 2016 02:29 IST

शहरालगतच्या आठ ग्रामपंचायती महिनाभरापूर्वी नगरपरिषदेत समाविष्ठ झाल्या. ग्रामपंचायतीचे अधिकार गोठविण्यात आले.

प्रशासक कोण? : मूलभूत सुविधाही थांबल्या, नागरिकांत असंतोष सुरेंद्र राऊत  यवतमाळ शहरालगतच्या आठ ग्रामपंचायती महिनाभरापूर्वी नगरपरिषदेत समाविष्ठ झाल्या. ग्रामपंचायतीचे अधिकार गोठविण्यात आले. नगरपरिषद प्रशासक आल्याने वेळेत सोईसुविधा उपलब्ध होतील, अशी भाबडी आशा ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना होती. मात्र महिनाभरातच आता भ्रमनिरास झाला असून ग्रामपंचायत परिसरातील यंत्रणा पूर्णत: ठप्प आहे. आपला प्रशासक नेमका कोण असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. सुविधांसाठी कुणाकडे जावे अशी अवस्था आठही ग्रामपंचायतीतील नागरिकांची गत महिनाभरात झाली आहे. शहर विकासाच्या दृष्टीकोणातून यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्याची अधिसूचना २२ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. यानंतर वडगाव, लोहारा, पिंपळगाव, वाघापूर, मोहा, भोसा, उमरसरा आणि डोळंबा येथील ग्रामपंचायतींचे अधिकार गोठविण्यात आले. या बरोबरच ग्रामपंचायत कार्यालयांवर यवतमाळ नगरपरिषद विभागीय कार्यालय अशी नोंदही करण्यात आली. येथील ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. तर ग्रामपंचायतीत कार्यरत कर्मचारी व त्यांच्या अधिनस्त यंत्रणा पूर्णत: ठप्प झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रात कचरा गोळा करण्यासाठी फिरणाऱ्या घंटा गाड्या हद्दवाढीनंतर थांबल्या आहेत. अनेक ठिकाणी रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांना बंद करण्यात आले आहे. नगरपरिषद वाढीव क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या कार्यालयांना विभागीय कार्यालय असे संबोधत आहे. प्रत्यक्षात मात्र तेथील प्रशासकीय घडी बसविण्यासाठी कुठलेच ठोस प्रयत्न झाले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील बंद पथदिव्यांची तक्रार कुणाकडे करायची, सुरू असलेल्या घरकूल रमाई आवास, वैयक्तिक शौचालय, नळ जोडणी योजनेसंदर्भात कोणाकडे दाद मागायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा उचलण्याची व्यवस्था नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग लागले आहे. परिसरात एखादा प्राणी मृत झाल्यास तो उचलण्यासाठी कोणाकडे संपर्क करायचा असा प्रश्न स्थानिक नागरिकांना निर्माण झाला आहे. सरपंचासह १७ सदस्यांना शासनाकडून त्यांचे पद बरखास्त झाल्यासंदर्भात कुठलाही लेखी आदेश आलेला नाही. त्यामुळे नेमके काय करायचे हा संभ्रम त्यांच्यापुढे आहे. एकीकडे स्थानिक नागरिक अनेक तक्रारी घेऊन या सदस्य व सरपंचांकडे येत आहे. तर दुसरीकडे यंत्रणा काहीच ऐकून घेण्यास तयार नाही. ते सरळ नगरपरिषद कर्मचारी असल्याचे सांगताना दिसत आहे. अशा स्थितीत सामान्य माणसाने मुलभूत सोई-सुविधेसाठी कोणाकडे जावे हा प्रश्न आहे.