शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच पालिकेचा गोठा पूर्वपदावर

By admin | Updated: June 11, 2016 02:49 IST

शाळा, महाविद्यालय, विद्युत कार्यालय आणि नागरी वस्ती असलेला भाग यवतमाळ नगरपरिषदेने कचरा डेपो बनविला.

लाखो रुपये खर्च : दुर्गंधी रोखण्यासाठी सुगंधी पावडरचा वापर, पावसाळ्यात सहन करावा लागतो जीवघेणा त्रासयवतमाळ : शाळा, महाविद्यालय, विद्युत कार्यालय आणि नागरी वस्ती असलेला भाग यवतमाळ नगरपरिषदेने कचरा डेपो बनविला. काही तासांपुरता या भागाचा कायापालट झाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन होणार असल्याने स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करून ही जागा सुस्वरूप आणि सुगंधित केली. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच ही जागा पूर्वपदावर आली आहे. शहरातून गोळा होणारा ओला आणि सुका कचरा या जागेत आणून टाकला जात आहे. परिणामी याठिकाणी डुकरं आणि जनावरांचा मुक्त संचार वाढण्यासोबतच दुर्गंधी पसरली आहे. बसस्थानकाकडून आर्णी रोडकडे जाणाऱ्या एका मोकळ्या जागेत काही काळांपूर्वी नगरपरिषदेची वाहने, अडगळीतील वस्तू ठेवल्या जात होत्या. या जागेला कार्यशाळा म्हणून ओळखले जात होते. अलीकडे काही वर्षात मात्र ही ओळख पुसली जावून तिला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहराच्या विविध भागातून घंटागाड्यांद्वारे आणला गेलेला कचरा याठिकाणी टाकला जातो. त्यात रुग्णालयांमधील जैविक कचऱ्याचाही यात समावेश राहतो. कचरा वाढल्यानंतर जेसीबीने उचलून इतर ठिकाणी हलविला जातो. हे काम करताना मोठमोठे खड्डे तयार होते. पावसाळ्यात त्यात पाणी साचून कचरा सडतो. त्यामुळे वाढणाऱ्या दुर्गंधीने जीवघेणा त्रास होतो. या भागातील संपूर्ण पाणी थेट बसस्थानकाच्या नालीपर्यंत पोहोचते. याचा त्रास सदर भागात असलेल्या शाळा, महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी, आर्णी मार्गाने ये-जा करणारे नागरिक, विद्युत कंपनीतील अधिकारी, कर्मचारी आणि या भागात वास्तव्याला असलेल्या नागरिकांना होतो. हा प्रकार थांबविण्यात यावा, यासाठी परिसरातील नागरिकांनी पालिका ते जिल्हा प्रशासनापर्यंत पाठपुरावा करूनही उपयोग नाही.मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यासाठी ही जागा निश्चित करण्यात आली. संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. मुरूम, चुरी टाकून जागा एकसोय करण्यात आली. दुर्गंधी येणार नाही यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. या जागेत काहीतरी चांगले होणार, आज आहे त्या स्थितीत राहील, असे नागरिकांना अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच संपूर्ण कचरा या ठिकाणी आणून टाकला जात आहे. बलवंत राऊत, अशोक सिंघानिया, शेख जाकीर, राजू बत्रा, दीपक मानेकर, रशीदभाई, सुधाकर मानेकर, रऊफ बेग मिर्झा, प्रमोद राय, जऊरभाई, दिगांबर अवसरे, पुष्पाताई पलगंटवार, वर्षा राऊत, नीलूबाई खत्री, श्याम सोलंकी, गजानन राऊत, रामप्रसाद चौधरी, इमरान चाऊस, राजू खान, रफिकभाई आदींनी याठिकाणी कचरा टाकला जावू नये यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी केली. पालिकेने मात्र याची दखल घेतली नाही. (वार्ताहर)