शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच पालिकेचा गोठा पूर्वपदावर

By admin | Updated: June 11, 2016 02:49 IST

शाळा, महाविद्यालय, विद्युत कार्यालय आणि नागरी वस्ती असलेला भाग यवतमाळ नगरपरिषदेने कचरा डेपो बनविला.

लाखो रुपये खर्च : दुर्गंधी रोखण्यासाठी सुगंधी पावडरचा वापर, पावसाळ्यात सहन करावा लागतो जीवघेणा त्रासयवतमाळ : शाळा, महाविद्यालय, विद्युत कार्यालय आणि नागरी वस्ती असलेला भाग यवतमाळ नगरपरिषदेने कचरा डेपो बनविला. काही तासांपुरता या भागाचा कायापालट झाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन होणार असल्याने स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करून ही जागा सुस्वरूप आणि सुगंधित केली. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच ही जागा पूर्वपदावर आली आहे. शहरातून गोळा होणारा ओला आणि सुका कचरा या जागेत आणून टाकला जात आहे. परिणामी याठिकाणी डुकरं आणि जनावरांचा मुक्त संचार वाढण्यासोबतच दुर्गंधी पसरली आहे. बसस्थानकाकडून आर्णी रोडकडे जाणाऱ्या एका मोकळ्या जागेत काही काळांपूर्वी नगरपरिषदेची वाहने, अडगळीतील वस्तू ठेवल्या जात होत्या. या जागेला कार्यशाळा म्हणून ओळखले जात होते. अलीकडे काही वर्षात मात्र ही ओळख पुसली जावून तिला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहराच्या विविध भागातून घंटागाड्यांद्वारे आणला गेलेला कचरा याठिकाणी टाकला जातो. त्यात रुग्णालयांमधील जैविक कचऱ्याचाही यात समावेश राहतो. कचरा वाढल्यानंतर जेसीबीने उचलून इतर ठिकाणी हलविला जातो. हे काम करताना मोठमोठे खड्डे तयार होते. पावसाळ्यात त्यात पाणी साचून कचरा सडतो. त्यामुळे वाढणाऱ्या दुर्गंधीने जीवघेणा त्रास होतो. या भागातील संपूर्ण पाणी थेट बसस्थानकाच्या नालीपर्यंत पोहोचते. याचा त्रास सदर भागात असलेल्या शाळा, महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी, आर्णी मार्गाने ये-जा करणारे नागरिक, विद्युत कंपनीतील अधिकारी, कर्मचारी आणि या भागात वास्तव्याला असलेल्या नागरिकांना होतो. हा प्रकार थांबविण्यात यावा, यासाठी परिसरातील नागरिकांनी पालिका ते जिल्हा प्रशासनापर्यंत पाठपुरावा करूनही उपयोग नाही.मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यासाठी ही जागा निश्चित करण्यात आली. संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. मुरूम, चुरी टाकून जागा एकसोय करण्यात आली. दुर्गंधी येणार नाही यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. या जागेत काहीतरी चांगले होणार, आज आहे त्या स्थितीत राहील, असे नागरिकांना अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच संपूर्ण कचरा या ठिकाणी आणून टाकला जात आहे. बलवंत राऊत, अशोक सिंघानिया, शेख जाकीर, राजू बत्रा, दीपक मानेकर, रशीदभाई, सुधाकर मानेकर, रऊफ बेग मिर्झा, प्रमोद राय, जऊरभाई, दिगांबर अवसरे, पुष्पाताई पलगंटवार, वर्षा राऊत, नीलूबाई खत्री, श्याम सोलंकी, गजानन राऊत, रामप्रसाद चौधरी, इमरान चाऊस, राजू खान, रफिकभाई आदींनी याठिकाणी कचरा टाकला जावू नये यासाठी मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी केली. पालिकेने मात्र याची दखल घेतली नाही. (वार्ताहर)