शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

अखेर शाळाबंदीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 22:04 IST

पटसंख्या घटल्याचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेने तब्बल ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शिक्षकांवर बदलीची तर शेकडो विद्यार्थ्यांवर शिक्षणच तुटण्याची वेळ आली होती. अखेर प्रचंड विरोध झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी मंगळवारी ८१ पैकी ५९ शाळा बंद करण्याच्या जिल्हा परिषदेच्या निर्णयाला ब्रेक लावला आहे.

ठळक मुद्देआयुक्तांचा आदेश : पाठपुराव्याने जिल्हा परिषदेला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पटसंख्या घटल्याचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेने तब्बल ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शिक्षकांवर बदलीची तर शेकडो विद्यार्थ्यांवर शिक्षणच तुटण्याची वेळ आली होती. अखेर प्रचंड विरोध झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी मंगळवारी ८१ पैकी ५९ शाळा बंद करण्याच्या जिल्हा परिषदेच्या निर्णयाला ब्रेक लावला आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाने २ मे रोजी जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करून इतरत्र समायोजन करण्याचा निर्णय घेतला होता. यात ५० प्राथमिक तर ३१ उच्च प्राथमिक शाळांचा समावेश होता. विशेष म्हणजे शिक्षण विभागाच्या या निर्णयाला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीही विरोध दर्शविला. मात्र शिक्षक, पदाधिकाऱ्यांच्या, शाळा व्यवस्थापन समितीच्या, गावकºयांच्या विरोधानंतरही शिक्षण विभागाने प्रत्यक्ष समायोजनही सुरू केले होते.अखेर सर्व शिक्षक संघटनांच्या महासंघाने या संदर्भात अमरावती येथे विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. तर त्याच वेळी सोमवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीतही शाळाबंदीच्या निर्णयावर स्थगिती आणण्याचा ठराव घेण्यात आला. शिक्षण सभापती नंदिनी दरणे यांच्या अध्यक्षतेखाली कालिंदा पवार, प्रीती काकडे, लताबाई कठाळे, मधुकर काठोळे यांनी हा ठराव घेतला. बैठकीनंतर समिती सदस्यांनी लगेच सीईओंची भेट घेऊन निर्णय रद्द करण्याची मागणी केली. आता ८१ पैकी ५९ शाळा पूर्ववत सुरू राहणार आहे.पटसंख्येचा निकष चुकलाविभागीय आयुक्तांनी या शाळांबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल मागितला होता. या अहवालानुसार ८१ पैकी पहिली ते पाचवीच्या नऊ आणि सहावी ते आठवीच्या १३ शाळांमधील पटसंख्या दहा पेक्षा कमी आहे. त्यामुळे या २२ शाळा समायोजित करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी कायम ठेवला आहे. मात्र उर्वरित ५९ शाळांमधील पटसंख्या दहा पेक्षा अधिक आहे. त्यामुळे या शाळांचे समायोजन शिक्षण उपसंचालकांच्या निर्देशानुसार झालेले नाही, असा ठपका ठेवत विभागीय आयुक्तांनी या शाळा पूर्ववत सुरू ठेवण्याचा आदेश मंगळवारी सीईओंना दिला आहे.

टॅग्स :Educationशिक्षण