शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आर्णी पाणीपुरवठ्याचे काम जीवन प्राधिकरणकडे

By admin | Updated: January 5, 2015 23:11 IST

येथील पाणीपुरवठा योजनेचे काम खासगी कंत्राटदारांमार्फत करावे की जीवन प्राधिकरणाने यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला. जिल्हाधिकाऱ्यांनी नळ योजनेचे काम जीवन प्राधिकरण करेल,

आर्णी : येथील पाणीपुरवठा योजनेचे काम खासगी कंत्राटदारांमार्फत करावे की जीवन प्राधिकरणाने यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला. जिल्हाधिकाऱ्यांनी नळ योजनेचे काम जीवन प्राधिकरण करेल, असा आदेश दिला आहे. शहराची ही योजना ४१ कोटी ८१ लाख रुपयांची आहे. आर्णी शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होते. ग्रामपंचायत आणि आता नगरपरिषद झाल्यानंतरही नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळेच आर्णी शहरासाठी अरुणावती प्रकल्पावरून पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर झाली. यात नगरपरिषद आर्णीने सदर काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्याचे ठरविले. नंतर मात्र एक विशेष सभा घेवून सदर काम खासगी कंत्राटदारांकडून करून घ्यावे, असे ठरविण्यात आले. परंतु नगरसेविका अंजली खंदार यांनी याला विरोध केला. पाणीपुरवठा योजनेचे काम खासगी कंत्राटदारांकडून करून न घेता शासनाच्या अख्त्यारित येणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करून घ्यावी, अशी भूमिका घेतली. यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. दोनही बाजू ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सदर काम जीवन प्राधिकरणाला द्यावे, असा आदेश दिला. त्यामुळे हा प्रश्न एकदाचा निकाली निघाला. आर्णी शहरासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून अरुणावती प्रकल्पावरून पाईप लाईन पाण्याच्या टाकीपर्यंत टाकणे, जलशुद्धीकरण प्लांट तयार करणे आदी बाबींचा समावेश या योजनेत आहे. लवकरच ही योजना मार्गी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)