शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

अखेर आर्णी पाणीपुरवठ्याचे काम जीवन प्राधिकरणकडे

By admin | Updated: January 5, 2015 23:11 IST

येथील पाणीपुरवठा योजनेचे काम खासगी कंत्राटदारांमार्फत करावे की जीवन प्राधिकरणाने यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला. जिल्हाधिकाऱ्यांनी नळ योजनेचे काम जीवन प्राधिकरण करेल,

आर्णी : येथील पाणीपुरवठा योजनेचे काम खासगी कंत्राटदारांमार्फत करावे की जीवन प्राधिकरणाने यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला. जिल्हाधिकाऱ्यांनी नळ योजनेचे काम जीवन प्राधिकरण करेल, असा आदेश दिला आहे. शहराची ही योजना ४१ कोटी ८१ लाख रुपयांची आहे. आर्णी शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होते. ग्रामपंचायत आणि आता नगरपरिषद झाल्यानंतरही नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळेच आर्णी शहरासाठी अरुणावती प्रकल्पावरून पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर झाली. यात नगरपरिषद आर्णीने सदर काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देण्याचे ठरविले. नंतर मात्र एक विशेष सभा घेवून सदर काम खासगी कंत्राटदारांकडून करून घ्यावे, असे ठरविण्यात आले. परंतु नगरसेविका अंजली खंदार यांनी याला विरोध केला. पाणीपुरवठा योजनेचे काम खासगी कंत्राटदारांकडून करून न घेता शासनाच्या अख्त्यारित येणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करून घ्यावी, अशी भूमिका घेतली. यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. दोनही बाजू ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सदर काम जीवन प्राधिकरणाला द्यावे, असा आदेश दिला. त्यामुळे हा प्रश्न एकदाचा निकाली निघाला. आर्णी शहरासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून अरुणावती प्रकल्पावरून पाईप लाईन पाण्याच्या टाकीपर्यंत टाकणे, जलशुद्धीकरण प्लांट तयार करणे आदी बाबींचा समावेश या योजनेत आहे. लवकरच ही योजना मार्गी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)