शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अखेर आझाद मैदानाने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:49 IST

शहरातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या आझाद मैदानाला भेलपुरीच्या दुकानांनी वेढले होते. खाद्य पदार्थांची चौपाटी येथे तयार झाली होती. त्यामुळे आझाद मैदानाची ओळख पुसल्या गेली होती.

ठळक मुद्देरहदारी बंद : उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील ऐतिहासिक स्थळ असलेल्या आझाद मैदानाला भेलपुरीच्या दुकानांनी वेढले होते. खाद्य पदार्थांची चौपाटी येथे तयार झाली होती. त्यामुळे आझाद मैदानाची ओळख पुसल्या गेली होती. स्वातंत्र्य लढ्याच्या सभांचे साक्षीदार असलेले आझाद मैदान अगदी घाणीने बरबटले होते. उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांच्या एका आदेशाने संपूर्ण मैदान मोकळे झाले असून कित्येक दशकानंतर या गुदमरलेल्या मैदानाने मोकळा श्वास घेतला.आझाद मैदानाचा विस्तार किती हे सुद्धा लक्षात येत नव्हते, इतकी दुकानांची गर्दी याठिकाणी झाली होती. खाद्य पदार्थांचा कुमट वास या परिसरात भिनभिनत होता. मैदान हे मैैदानच राहावे. आता याठिकाणी लगतच्या महात्मा जोतिबा फुले नगरपरिषद शाळेच्या मुलांना हक्काचे मैदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. आझाद मैदान परिसरात नेहरू उद्यान, जलतरण तलाव आणि आता प्रस्तावित असलेले तारांगण होत आहे. हा सर्व परिसर शैक्षणिक व खेळाशी निगडीत असताना येथे खाद्य पदार्थांच्या दुकानांमुळे एक प्रकारची कोंडी निर्माण झाली होती. आता पूर्ण परिसर खेळ व क्रीडा साठीच वापरणार असल्याचे स्वप्नील तांगडे यांनी सांगितले. मैदानातून होणारी रहदारी बंद करण्यासाठी येथील फाटकांना सील लावले आहे. केवळ एकमेव प्रवेशद्वार खुले ठेवले आहे. या कारवाईमुळे व्यवसायिकांत रोष आहे तर जनसामान्यांकडून याचे स्वागत होत आहे.

टॅग्स :Aazad Maidanआझाद मैदान