शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

शिधापत्रिका व रेशनच्या धान्यासाठी परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर प्राधान्यक्रमात आपले नाव यावे यासाठी नागरिकांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. तसेच नवीन कार्ड काढण्यासाठी आणि नावे टाकण्यासाठी तसेच जीर्ण झालेले कार्ड बदलून घेण्यासाठी झुंबड उडत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । ‘एमपीजे’ची यवतमाळ तहसील कार्यालयावर धडक, दलालांविरूद्ध सुरू केली मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिधापत्रिका आणि रेशनवरील धान्यासाठी गरजूंची परवड सुरू आहे. यवतमाळ तहसील कार्यालयात सुरू असलेल्या या प्रकाराविरूद्ध मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेलफेअरने धडक दिली. या कार्यालयात सुरू असलेला दलालांचा गोंधळ थांबविण्यासाठी त्यांनी मोहीम हाती घेतली आहे. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शैलेश काळे यांना देऊन कारवाईची मागणी केली.अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर प्राधान्यक्रमात आपले नाव यावे यासाठी नागरिकांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. तसेच नवीन कार्ड काढण्यासाठी आणि नावे टाकण्यासाठी तसेच जीर्ण झालेले कार्ड बदलून घेण्यासाठी झुंबड उडत आहे. मात्र तहसील कार्यालयात याविषयी योग्य आणि समाधानकारक माहिती दिली जात नाही. खिडकी क्र.८ चा कर्मचारी नवीन शिधापत्रिकेसाठी लागणारा नमूना अर्ज-१ उपलब्ध नसल्याचे सांगतो. बाहेर असलेल्या झेरॉक्स सेंटरमध्ये हा अर्ज मिळते अशी सूचना केली जाते. याठिकाणी पाच रुपये मोजावे लागते. वास्तविक नमूना अर्ज-१, ८, ९, १८ हे अर्ज शासकीय कार्यालयातच मिळायला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. शिधापत्रिकेसाठी गरजूंना अत्यंत किचकट आणि नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो. ही बाब एमपीजेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सैयद मोहसीन यांनी तहसील प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. नवीन रेशनकार्ड, नूतनीकरण, जीर्ण झालेले रेशन कार्ड, नावे समाविष्ट करणे आदी बाबींसाठी नागरिकांची होणारी परवड थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी एमपीजेचे शहर अध्यक्ष राशेद अनवर, ग्राहक संरक्षक समितीचे जिल्हा प्रमुख प्रशांत कुºहाडकर, शेख जुनैद, अक्रम मवाल, अजित बोरकर, अ. रफिक, शिवा आडे, अतिक शेख, विनोद मिरासे, मो. साजिद, ब्रह्मनंद काळे, मकसूद अली आदी उपस्थित होते.दलालांची कामे लवकरच मार्गी लागतातयवतमाळ तहसील कार्यालयात दलालांची कामे लवकरच होतात. हजार ते १५०० रुपये नागरिकांकडून उकळले जाते. नवीन कार्ड मिळवून देण्यासाठी हा दर दलालांनी निश्चित केला आहे. सामान्य नागरिक दिवसभर रांगेत उभे राहूनही कार्ड मिळत नाही. दलालाच्या माध्यमातून मात्र विनाविलंब कार्ड आणून दिले जाते.